शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
4
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
5
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
6
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
7
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
8
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
9
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
10
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
11
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
12
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
13
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
14
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
15
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
16
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
17
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
18
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
19
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
20
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण

पुन्हा एकदा बोंडअळीचा घाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 6:22 AM

बीटी तंत्रज्ञानाचा योग्यरीत्या वापर न केल्यास बोंडअळीचा प्रादुर्भाव थांबविणे अशक्य आहे.

गतवर्षी कपाशीवरील कीटकनाशक फवारणीने विदर्भात अनेक शेतकरी व शेतमजुरांचे बळी घेतले. त्यामुळे हादरलेल्या राज्य सरकारने कीटकनाशक फवारणीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली. तरीदेखील यावर्षीही अकोला जिल्ह्यात फवारणीने एका शेतकºयाचा बळी घेतलाच! फवारणीमुळे कीटकनाशकाची बाधा झालेले अनेक शेतकरी-शेतमजूर अकोला व यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत.भारतात कपाशीच्या लागवडीखालील क्षेत्र केवळ पाच टक्के आहे; पण कीटकनाशकांचा तब्बल ५५ टक्के वापर केवळ कपाशीसाठी होतो. देशात कपाशीच्या संकरित बियाण्यांची लागवड सुरू झाल्यापासून कीटकनाशकांचा वापर वाढत गेला आणि बीटी कपाशीच्या आगमनानंतर तर कीटकनाशकांच्या वापराने कळस गाठला! प्रमुख कपाशी उत्पादक देशांपैकी केवळ भारतातच कपाशीच्या संकरित वाणांचा पेरा होतो. इतर देशांमध्ये प्रामुख्याने सरळ वाणांचा पेरा होतो. कपाशीचे देशी सरळ वाण अनेक प्रकारच्या रोगराईचा, तसेच हवामानातील बदलांचा सामना करण्यास सक्षम होते; पण त्यांच्यापासून मिळणारा धागा कमी लांबीचा होता. कापड उद्योगाची मागणी लांब धाग्याच्या कापसाची असल्याने देशात कपाशीच्या संकरित वाणांचे आगमन झाले आणि कापूस उत्पादक शेतकरी महागडे बियाणे व कीटकनाशकांच्या दुष्टचक्रात फसत गेला. शेतकºयाला कीटकनाशकांच्या पाशातून बाहेर काढण्याच्या नावाखाली पुढे बीटी कपाशीचे आगमन झाले. प्रारंभीची एक-दोन वर्षे कीटकनाशकांचा वापर कमी झालादेखील; मात्र पुढे बीटी कपाशीवरही कीटकनाशकांची बेसुमार फवारणी करण्याची पाळी शेतकºयांवर आली. कीटकनाशकांची फवारणीच आज शेतकºयाच्या जीवावर उठली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या १४ देशांमध्ये बीटी कपाशीचा पेरा होतो, त्यापैकी केवळ भारतातच बीटी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे.बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे आज बीटी कपाशीच्या नावाने बोटे मोडण्यात येत असली तरी, प्रारंभीची काही वर्षे बीटी कपाशीने शेतकºयांचे चांगभले केले, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. कोणतेही तंत्रज्ञान वापरण्याची एक पद्धत असते. ती मोडित काढल्यास त्या तंत्रज्ञानाचे लाभ मिळत नाहीत. कुणी उघड्या मैदानात वातानुकूलन यंत्र बसवतो म्हटले तर मैदानातील हवा थंड होईल का? बीटी कपाशी तंत्रज्ञानाचेही तसेच आहे. ‘रेफ्युज एरिया’मध्ये गैर बीटी कपाशीची लागवड आणि १८० दिवसांपेक्षा जास्त काळ पीक शेतात उभे न ठेवणे, या बीटी तंत्रज्ञान वापरातील महत्त्वपूर्ण शिफारशींना भारतात हरताळ फासण्यात आला आणि त्यामुळे बोंडअळीत बीटी जीन प्रतिरोधक क्षमता निर्माण झाली, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात शेतकºयांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी गतवर्षीपासून पावले उचलण्यास प्रारंभ केला; परंतु या उपाययोजनांचे परिणाम तत्काळ दिसणे अशक्य आहे. अत्यंत कठोरपणे व सातत्य राखून उपाययोजना राबविल्या तरच आगामी काही वर्षांमध्ये चांगले परिणाम दिसू शकतील.- रवी टाले

 

टॅग्स :cottonकापूस