शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

पुन्हा एकदा बोंडअळीचा घाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 06:24 IST

बीटी तंत्रज्ञानाचा योग्यरीत्या वापर न केल्यास बोंडअळीचा प्रादुर्भाव थांबविणे अशक्य आहे.

गतवर्षी कपाशीवरील कीटकनाशक फवारणीने विदर्भात अनेक शेतकरी व शेतमजुरांचे बळी घेतले. त्यामुळे हादरलेल्या राज्य सरकारने कीटकनाशक फवारणीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली. तरीदेखील यावर्षीही अकोला जिल्ह्यात फवारणीने एका शेतकºयाचा बळी घेतलाच! फवारणीमुळे कीटकनाशकाची बाधा झालेले अनेक शेतकरी-शेतमजूर अकोला व यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत.भारतात कपाशीच्या लागवडीखालील क्षेत्र केवळ पाच टक्के आहे; पण कीटकनाशकांचा तब्बल ५५ टक्के वापर केवळ कपाशीसाठी होतो. देशात कपाशीच्या संकरित बियाण्यांची लागवड सुरू झाल्यापासून कीटकनाशकांचा वापर वाढत गेला आणि बीटी कपाशीच्या आगमनानंतर तर कीटकनाशकांच्या वापराने कळस गाठला! प्रमुख कपाशी उत्पादक देशांपैकी केवळ भारतातच कपाशीच्या संकरित वाणांचा पेरा होतो. इतर देशांमध्ये प्रामुख्याने सरळ वाणांचा पेरा होतो. कपाशीचे देशी सरळ वाण अनेक प्रकारच्या रोगराईचा, तसेच हवामानातील बदलांचा सामना करण्यास सक्षम होते; पण त्यांच्यापासून मिळणारा धागा कमी लांबीचा होता. कापड उद्योगाची मागणी लांब धाग्याच्या कापसाची असल्याने देशात कपाशीच्या संकरित वाणांचे आगमन झाले आणि कापूस उत्पादक शेतकरी महागडे बियाणे व कीटकनाशकांच्या दुष्टचक्रात फसत गेला. शेतकºयाला कीटकनाशकांच्या पाशातून बाहेर काढण्याच्या नावाखाली पुढे बीटी कपाशीचे आगमन झाले. प्रारंभीची एक-दोन वर्षे कीटकनाशकांचा वापर कमी झालादेखील; मात्र पुढे बीटी कपाशीवरही कीटकनाशकांची बेसुमार फवारणी करण्याची पाळी शेतकºयांवर आली. कीटकनाशकांची फवारणीच आज शेतकºयाच्या जीवावर उठली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या १४ देशांमध्ये बीटी कपाशीचा पेरा होतो, त्यापैकी केवळ भारतातच बीटी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे.बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे आज बीटी कपाशीच्या नावाने बोटे मोडण्यात येत असली तरी, प्रारंभीची काही वर्षे बीटी कपाशीने शेतकºयांचे चांगभले केले, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. कोणतेही तंत्रज्ञान वापरण्याची एक पद्धत असते. ती मोडित काढल्यास त्या तंत्रज्ञानाचे लाभ मिळत नाहीत. कुणी उघड्या मैदानात वातानुकूलन यंत्र बसवतो म्हटले तर मैदानातील हवा थंड होईल का? बीटी कपाशी तंत्रज्ञानाचेही तसेच आहे. ‘रेफ्युज एरिया’मध्ये गैर बीटी कपाशीची लागवड आणि १८० दिवसांपेक्षा जास्त काळ पीक शेतात उभे न ठेवणे, या बीटी तंत्रज्ञान वापरातील महत्त्वपूर्ण शिफारशींना भारतात हरताळ फासण्यात आला आणि त्यामुळे बोंडअळीत बीटी जीन प्रतिरोधक क्षमता निर्माण झाली, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात शेतकºयांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी गतवर्षीपासून पावले उचलण्यास प्रारंभ केला; परंतु या उपाययोजनांचे परिणाम तत्काळ दिसणे अशक्य आहे. अत्यंत कठोरपणे व सातत्य राखून उपाययोजना राबविल्या तरच आगामी काही वर्षांमध्ये चांगले परिणाम दिसू शकतील.- रवी टाले

 

टॅग्स :cottonकापूस