शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
3
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
4
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
5
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
6
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
7
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
8
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
9
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
10
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
11
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
12
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
13
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
14
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
15
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
16
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
17
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
18
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
19
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
20
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा बोंडअळीचा घाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 06:24 IST

बीटी तंत्रज्ञानाचा योग्यरीत्या वापर न केल्यास बोंडअळीचा प्रादुर्भाव थांबविणे अशक्य आहे.

गतवर्षी कपाशीवरील कीटकनाशक फवारणीने विदर्भात अनेक शेतकरी व शेतमजुरांचे बळी घेतले. त्यामुळे हादरलेल्या राज्य सरकारने कीटकनाशक फवारणीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली. तरीदेखील यावर्षीही अकोला जिल्ह्यात फवारणीने एका शेतकºयाचा बळी घेतलाच! फवारणीमुळे कीटकनाशकाची बाधा झालेले अनेक शेतकरी-शेतमजूर अकोला व यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत.भारतात कपाशीच्या लागवडीखालील क्षेत्र केवळ पाच टक्के आहे; पण कीटकनाशकांचा तब्बल ५५ टक्के वापर केवळ कपाशीसाठी होतो. देशात कपाशीच्या संकरित बियाण्यांची लागवड सुरू झाल्यापासून कीटकनाशकांचा वापर वाढत गेला आणि बीटी कपाशीच्या आगमनानंतर तर कीटकनाशकांच्या वापराने कळस गाठला! प्रमुख कपाशी उत्पादक देशांपैकी केवळ भारतातच कपाशीच्या संकरित वाणांचा पेरा होतो. इतर देशांमध्ये प्रामुख्याने सरळ वाणांचा पेरा होतो. कपाशीचे देशी सरळ वाण अनेक प्रकारच्या रोगराईचा, तसेच हवामानातील बदलांचा सामना करण्यास सक्षम होते; पण त्यांच्यापासून मिळणारा धागा कमी लांबीचा होता. कापड उद्योगाची मागणी लांब धाग्याच्या कापसाची असल्याने देशात कपाशीच्या संकरित वाणांचे आगमन झाले आणि कापूस उत्पादक शेतकरी महागडे बियाणे व कीटकनाशकांच्या दुष्टचक्रात फसत गेला. शेतकºयाला कीटकनाशकांच्या पाशातून बाहेर काढण्याच्या नावाखाली पुढे बीटी कपाशीचे आगमन झाले. प्रारंभीची एक-दोन वर्षे कीटकनाशकांचा वापर कमी झालादेखील; मात्र पुढे बीटी कपाशीवरही कीटकनाशकांची बेसुमार फवारणी करण्याची पाळी शेतकºयांवर आली. कीटकनाशकांची फवारणीच आज शेतकºयाच्या जीवावर उठली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या १४ देशांमध्ये बीटी कपाशीचा पेरा होतो, त्यापैकी केवळ भारतातच बीटी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे.बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे आज बीटी कपाशीच्या नावाने बोटे मोडण्यात येत असली तरी, प्रारंभीची काही वर्षे बीटी कपाशीने शेतकºयांचे चांगभले केले, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. कोणतेही तंत्रज्ञान वापरण्याची एक पद्धत असते. ती मोडित काढल्यास त्या तंत्रज्ञानाचे लाभ मिळत नाहीत. कुणी उघड्या मैदानात वातानुकूलन यंत्र बसवतो म्हटले तर मैदानातील हवा थंड होईल का? बीटी कपाशी तंत्रज्ञानाचेही तसेच आहे. ‘रेफ्युज एरिया’मध्ये गैर बीटी कपाशीची लागवड आणि १८० दिवसांपेक्षा जास्त काळ पीक शेतात उभे न ठेवणे, या बीटी तंत्रज्ञान वापरातील महत्त्वपूर्ण शिफारशींना भारतात हरताळ फासण्यात आला आणि त्यामुळे बोंडअळीत बीटी जीन प्रतिरोधक क्षमता निर्माण झाली, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात शेतकºयांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी गतवर्षीपासून पावले उचलण्यास प्रारंभ केला; परंतु या उपाययोजनांचे परिणाम तत्काळ दिसणे अशक्य आहे. अत्यंत कठोरपणे व सातत्य राखून उपाययोजना राबविल्या तरच आगामी काही वर्षांमध्ये चांगले परिणाम दिसू शकतील.- रवी टाले

 

टॅग्स :cottonकापूस