शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पुराणातील उड्डाणे अन्...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 03:13 IST

‘डिजिटल इंडिया’ ही केवळ घोषणा नसून त्याची पाळंमुळं पुराणात इतकी खोलवर रुजलेली आहेत

नंदकिशोर पाटील|

फार फार वर्षांपूर्वी या भारतभूमीत दूरसंचाराचं आधुनिक माध्यम इंटरनेट अस्तित्वात होतं, हे भाजपाचे त्रिपुरामधील मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनी सांगून टाकलं ते एका अर्थानं बरंच झालं! आजवर हे गुपित दडवून ठेवल्याने महाभारत, रामायण काळातील अनेक घटना-घडामोडींविषयी अकारण गैरसमज होता. आता पुराणातील सगळ्या कथा-गोष्टी कशा सोप्या आणि विश्वासार्ह झाल्या आहेत! जन्मजात शंकेखोर स्वभावामुळे आपण खरंच महाभारत घडलं असेल का? कौरव शंभरच होते की आणखी किती? हनुमंतांनी लंकेतील सीतेचा शोध कशावरून लावला? अशा नानाविध शंका उपस्थित करत असू. पण विप्लव कुमार देव, सत्यपाल सिंह, वासुदेव देवनानी या महानुभवांनी आपले हे अज्ञान एकदाचे दूर केले, त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानायला हवेत. ‘डिजिटल इंडिया’ ही केवळ घोषणा नसून त्याची पाळंमुळं पुराणात इतकी खोलवर रुजलेली आहेत, हे या तिघांच्या नवसंशोधनामुळे जगाला आता कळले असेल. त्यामुळे या तिघांना नोबेल पारितोषिक मिळाले तर नवल वाटायला नको! संघशाखेतील या नवसंशोधकांचा ‘ग्लोबेल्स’ ते ‘नोबेल’ हा प्रवास थक्क करणारा आहे. कधीकाळी पोलीस दलात असताना गुन्हेगारांचा माग काढणारे सत्यपाल सिंह यांनी मनुष्यबळ विकास खात्याचे मंत्री होताच थेट डार्विन आणि न्यूटनलाच चॅलेंज दिले. माणसांची उत्पत्ती माकडांपासून झाली, हा डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आणि न्यूटनने लावलेला गतीच्या नियमांचा शोध त्यांना अजिबात मान्य नाही. त्यामुळे तो पाठ्यपुस्तकातून तात्काळ काढून टाकला पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. तर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनच्या कैक वर्षे आधी दुसऱ्या ब्रह्मगुप्ताने लावला होता, असा राजस्थानचे शिक्षणमंत्री असलेले वासुदेव देवनानी यांचा दावा आहे. शिक्षणमंत्र्यांचे हे अगाध ज्ञान पाहून शिक्षक आणि विद्यार्थीही चकित झाले म्हणतात! विप्लव कुमार देव म्हणतात तेही खरंच म्हणा. इंटरनेट असल्याखेरीस महाभारतातील संजयास कुरुक्षेत्रावरील युद्धाचा आँखो देखा हाल धृतराष्ट्राला ऐकवता नसता आला. कदाचित तेव्हा फेसबुक लाईव्हची देखील सोय असावी. पण आंधळ्या धृतराष्ट्राकडे बघून संजयाने तो मोह टाळला असेल. पांडव इनमिन पाच. पण शंभर कौरवांशी एकाचवेळी संवाद करणंं हे गांधारीसाठी केवढं दिव्य? पण व्हॉट्सअपमुळं ते शक्य झालं असावं! ‘कौरवाज्’ नावाचा ग्रुप त्यांनी व्हॉट्सअप वर बनवला होता, असा मेसेज फिरत आहे. महाभारत काळात टेस्टट्युब बेबीचंही तंत्रज्ञान अस्तित्वात असावं. कर्णाचा जन्म हा पुरावा आहे. प्लास्टिक सर्जरी ही तर त्याहून जुनी. मानवी धड आणि हत्तीचं शिर असलेलं गणेशाचं रूप हे याच तंत्रज्ञानातून तयार झालं आहे, असं स्वत: पंतप्रधानांनी म्हटलं आहे. महाभारत काळात घडलेल्या घटनांचे जुने संदर्भ त्या काळातील संगणक सर्व्हररून डाऊनलोड केले तर कदाचित महर्षी व्यासांनी लिहून ठेवलेल्या महाभारतापेक्षा वेगळंच महाभारत जगासमोर येईल. द्रौपदी वस्त्रहरण आणि कठुआ, उन्नावमध्ये घडलेल्या घटनांमध्येही एक साम्य आहे. त्यावेळी भीष्म, द्रोणाचार्य आणि आता पंतप्रधान मोदींचे मौन !!

टॅग्स :Internetइंटरनेट