शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

जुन्या योजना, नवे भाषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:43 IST

प्रथेप्रमाणे संसदेच्या संयुक्त बैठकीपुढे राष्ट्रपतींचे अभिभाषण झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे पहिलेच भाषण असल्याने ते काय बोलणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अर्थात राष्ट्रपतींच्या भाषणातून केंद्र सरकार आगामी काळात काय कामे करू इच्छिते, विविध प्रश्नांवर सरकारची काय भूमिका आहे, याचे दर्शन घडत असते.

प्रथेप्रमाणे संसदेच्या संयुक्त बैठकीपुढे राष्ट्रपतींचे अभिभाषण झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे पहिलेच भाषण असल्याने ते काय बोलणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अर्थात राष्ट्रपतींच्या भाषणातून केंद्र सरकार आगामी काळात काय कामे करू इच्छिते, विविध प्रश्नांवर सरकारची काय भूमिका आहे, याचे दर्शन घडत असते. त्यामुळे हे भाषण सरकारनेच केलेले असते. पुढील वर्षी लोकसभेच्या आणि काही राज्यांत विधानसभा निवडणुका असल्याने मधल्या काळात सरकार काय करणार, हे या भाषणातून कळेल, अशी अपेक्षा होती. पण कोविंद यांच्या या अभिभाषणाने निराशाच केली. मोदी सरकारने आपल्या शिल्लक काळात नव्या योजना वा नव्या कामांऐवजी आहे तेच पूर्ण करण्यावर भर दिला, हे त्याचे कारण. त्यामुळे जुन्याच घोषणा, भूमिका आणि निर्णय यांची जंत्रीच राष्ट्रपतींच्या भाषणातून हाती लागली. शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा मोदी सरकारने २0१४ साली केली होती. तिचा उल्लेख यावर्षीच्या अभिभाषणात कशासाठी हे समजू शकले नाही. हे उत्पन्न नेमके दुप्पट कसे होणार, याचा तरी त्यात उल्लेख हवा होता. ट्रिपल तलाक विधेयकाचेही तसेच. ते लोकसभेत संमत झाले आहे आणि आता राज्यसभेत येईल. त्याचे कायद्यात रूपांतर होईल, हे सर्वांनाच माहीत आहे. पुन्हा तेच सांगून राष्ट्रपतींनी काय साधले कुणास ठाऊक! जनधन योजनेद्वारे उघडलेली नवी खाती, आधारमुळे विविध योजनांच्या रकमा थेट संबंधितांच्या खात्यात जमा होणे, आवास योजनेद्वारे गरिबांच्या घरांसाठी ६ टक्के सवलत, वन रँक वन पेन्शन, पंतप्रधान पीक विमा योजना, उज्ज्वला योजनेखाली ३ कोटींहून अधिक कुटुंबांना गॅसजोडणी, रस्त्यांद्वारे देशातील ८३ टक्के गावे जोडून पूर्ण, या साºया घोषणा व योजना याआधीच्या आहेत. त्या सुरू आहेत. साडेतीन लाख संशयाच्या भोवºयातील कंपन्यांचे परवाने रद्द करणे असो की, सौभाग्य योजनेद्वारे वीजजोडी असो, त्यात नवे असे काहीच नाही. या योजना जाहीर झाल्यापासून आतापर्यंत त्यांत किती प्रगती झाली, याचा पाढाच या भाषणात होता. अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण नव्हे, तर सक्षमीकरण करणार, ही भूमिका सरकारने कैक वेळा मांडून झाली आहे. तरी तिचाही उल्लेख पुन्हा भाषणात होता. राष्ट्रपतींच्या भाषणातून मोदी सरकारची पुढील दिशा समजेल, ही अपेक्षा या जुन्या घोषणांमुळे फोलच ठरली. लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी चर्चा, संवाद होणे गरजेचे आहे, असे रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. मुळात याची खरोखर गरज आहे का, यापासून त्या एकत्र घेणे खरोखर शक्य आहे का, असे अनेक प्रश्न आहेत. निवडणूक आयोगानेही असे लगेच शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. मुळात दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या मुद्यांवर, विषयांवर लढवल्या जातात. त्या एकत्र लढवून राष्ट्रीय व राज्य पातळीवरील मुद्यांमध्ये गल्लत व गोंधळ होण्याचीच शक्यता अधिक. तरी त्यावर चर्चा व्हायला हरकत नाही. राष्ट्रपतींनी प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेल्या भाषणात सहिष्णुतेचा मुद्दा मांडला होता. पद्मावत, गोरक्षण, बिघडता सामाजिक सलोखा या पार्श्वभूमीवर मोदी सरकारची काय भूमिका आहे, हे राष्ट्रपतींच्या भाषणातून समजू शकले असते. पण सरकार व राष्ट्रपतींनी ती संधी सोडली. उत्तर भारतातील वाढते बलात्कार आणि धार्मिक तणाव, देशभर वाढणाºया शेतकºयांच्या आत्महत्या यांवर राष्ट्रपतींच्या भाषणात एकही शब्द नसल्याने अनेकांना धक्काच बसला. त्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या संसदेतील पहिल्या भाषणातून काहीच हाती गवसले नाही, असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदParliamentसंसदIndiaभारतGovernmentसरकार