शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: जुन्या पेन्शनचे टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2022 09:01 IST

केंद्र सरकारने धाेरणात्मक बाब म्हणून २००४ साली जुनी अर्थात ओपीएस म्हणजे तेव्हाची निवृत्तिवेतन याेजना बंद केली.

वित्त खाते सांभाळणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात स्पष्ट केले की, जुनी पेन्शन योजना लागू करणे शक्य नाही. तसे केले तर राज्याच्या तिजोरीवर वर्षाकाठी किमान एक लाख दहा हजार कोटींचा जास्तीचा बोजा पडेल. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार व निवृत्तिवेतन देणेच शक्य होणार नाही. विकासकामे, विशेषत: मोठ्या खर्चाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना निधीच मिळणार नाही. इतर झाडून सगळ्या मुद्द्यांवर शिंदे-फडणवीस सरकारशी रोज पंगा घेणाऱ्या विरोधी पक्षांची महाविकास आघाडी सरकारच्या या भूमिकेशी मात्र सहमती दिसते. देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे दोन आजी-माजी उपमुख्यमंत्री आर्थिक शिस्तीच्या मुद्द्यावर एका सुरात बोलत आहेत. हे चित्र खरेच सुखावह आहे. कारण, दोघांना वास्तव माहीत आहे. 

केंद्र सरकारने धाेरणात्मक बाब म्हणून २००४ साली जुनी अर्थात ओपीएस म्हणजे तेव्हाची निवृत्तिवेतन याेजना बंद केली आणि न्यू पेन्शन स्कीम म्हणजेच एनपीएसची पर्यायी व्यवस्था अमलात आणली. बहुतेकांना आठवत असेल, की दोन हजारच्या त्या दशकात केंद्र व राज्य अशा सगळ्याच सरकारांपुढे गंभीर आर्थिक संकट उभे होते. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढण्याची वेळ आली होती. ओव्हरड्राफ्ट आणि बजेट कट हे शब्द रोज ऐकायला यायचे. तेव्हा, सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य आणि सोबत सरकारी तिजोरी दोन्ही आनंदी ठेवण्यासाठी अभ्यासाअंती दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात नवी पेन्शन योजना आली. जुनी पेन्शन योजना म्हणजे सरकारी नोकरीत पाऊल टाकले की तहहयात आर्थिक विवंचना नावाची गोष्टच नाही, असे चित्र होते. एकतर या योजनेत सेवेत असताना कर्मचाऱ्याचे काहीही योगदान नव्हते. उलट जीपीएफमधील गुंतवणूक करून प्राप्तिकराचा लाभ घेतला तरी निवृत्तीनंतर पुन्हा ती गुंतवणूक सव्याज पुन्हा कर्मचाऱ्यालाच मिळायची. 

नव्या योजनेत मात्र कर्मचाऱ्याला त्याच्या वेतनातील १० टक्के बेसिक पेचे योगदान द्यावे लागते. महत्त्वाचे म्हणजे आधीच्या योजनेत शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के इतकी रक्कम दरमहा निवृत्तिवेतनाच्या रूपात मृत्यूपर्यंत मिळायची. कर्मचाऱ्याचे निधन झाल्यानंतर मागे राहिलेली पत्नी किंवा पतीला ती पेन्शन त्यांच्या मृत्यूपर्यंत मिळत राहायची. पुन्हा केंद्र सरकारच्या महागाई भत्त्यातील वाढीनुसार पेन्शनच्या रकमेत थेट भर पडणार आणि सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी नवा वेतन आयोग लागू झाला, की तो पेन्शनलाही लागू होणार, असे नानाविध फायदे जुन्या पेन्शन योजनेत मिळायचे. म्हणूनच देशभरातील निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी कंबर कसली आहे आणि गैरभाजप राज्य सरकारांनी आम्ही ती जुनी योजना लागू करू अशी आश्वासने द्यायला, मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये चर्चा करायला व झालेच तर तत्त्वत: ती योजना अमलात आणण्याचा निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. 

काँग्रेसचे सरकार असलेली राजस्थान, छत्तीसगड ही आधीची राज्ये, नुकतीच सत्ता मिळालेले हिमाचल प्रदेश आणि आम आदमी पक्षाची सत्ता असलेले पंजाब या राज्यांनी जुन्या पेन्शन योजनेचा निर्णय घेतला आहे. तथापि, तिचा तिजोरीवर पडणारा बोजा त्या राज्यांना सोसेल का, हा प्रश्न आहे. म्हणून नव्या योजनेच्या मध्यवर्ती फंडातून किंवा अन्य मार्गाने केंद्र सरकारने आर्थिक भार उचलावा, अशी मागणी होत आहे. महाराष्ट्राच्या सरकारप्रमाणेच अजून तरी केंद्र सरकार नवी पेन्शन योजनाच पुढे नेण्याबद्दल ठाम आहे. परंतु, आता असे संकेत दिले आहेत की, राज्या-राज्यांमध्ये जुन्या योजनेची मागणी होत असल्याने राजकीय कारणांसाठी केंद्र सरकार जुन्या व नव्या योजनेचा सुवर्णमध्य शोधण्याच्या विचारात आहे. ३१ डिसेंबर २००३ पूर्वी ज्या नोकऱ्यांची जाहिरात प्रकाशित झाली असेल, त्यातील नियुक्त कर्मचाऱ्यांना नव्या योजनेतच काही अधिक लाभ देण्याचा विचार सुरू आहे. हे एकप्रकारे लांगूलचालनच म्हणावे लागेल. राजकीय पक्षांना आर्थिक शिस्तीपेक्षा सत्तेची गरज अधिक असतेच. दरम्यान, कर्मचाऱ्यांवरील उधळपट्टी टाळतानाच लोकप्रतिनिधींना मिळणारे पगार, भत्ते, इतर खर्च व निवृत्तिवेतन याबद्दलही आपण वास्तववादी असायला हवे. कर्मचाऱ्यांपेक्षा सामान्य जनतेच्या पोटापाण्याच्या प्रश्नांना जसे प्राधान्य हवे, तसेच जनतेचे सेवक म्हणवून घेणाऱ्यांपेक्षाही गावखेड्यांचा, शहरांचा विकास महत्त्वाचा मानला जावा.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :State Governmentराज्य सरकार