शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

‘कासोधा’च्या निमित्ताने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 01:24 IST

शेतक-यांच्या आर्थिक हक्कांसाठी आयोजित कापूस-सोयाबीन-धान (कासोधा) परिषद रविवारी अकोल्यात पार पडली. राज्यातील शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आहेत.

शेतक-यांच्या आर्थिक हक्कांसाठी आयोजित कापूस-सोयाबीन-धान (कासोधा) परिषद रविवारी अकोल्यात पार पडली. राज्यातील शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आहेत. बरे, एखाद्या विशिष्ट प्रदेशातील वा विशिष्ट पीक घेणारा शेतकरीच अडचणीत आहे असे नव्हे, तर संपूर्ण राज्यातील शेतक-यांवरच संकटाचे ढग आहेत. पश्चिम विदर्भ-मराठवाड्यातील कापूस, तूर व सोयाबीन उत्पादक जेवढा संकटात आहे, तेवढाच पूर्व विदर्भातील धान उत्पादक, पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक आणि उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरीही संकटात आहे. त्यांचे प्रश्न भले वेगवेगळे असतील; मात्र ते सगळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत, हा धागा समान आहे. स्वाभाविकपणे सर्वच शेतकरी सरकारकडे मोठ्या अपेक्षेने बघत होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, राज्य सरकारनेही कृषी कर्जमाफीची घोषणा केली; मात्र प्रत्येक गोष्ट ‘आॅनलाईन’ करण्याच्या आणि प्रत्येक गोष्टीसाठी ‘आधार कार्ड लिंकिंग’ अनिवार्य करण्याच्या सरकारच्या आग्रहामुळे कर्जमाफी योजनेचा एवढा बट्ट्याबोळ झाला की कर्जमाफी नको, पण ‘आॅनलाईन व लिंकिंग’ आवर म्हणण्याची पाळी शेतकºयावर आली. या पार्श्वभूमीवर कासोधा परिषद पार पडली. एकूण १६ ठरावांवर परिषदेत मंथन झाले. बहुतांश ठराव सरकारकडे काही तरी मागणारे आहेत. एकीकडे सरकार नाकर्ते आहे म्हणायचे, शेतकºयांच्या प्रश्नांवर असंवेदनशील आहे म्हणायचे आणि त्याच सरकारकडे आर्थिक स्वरूपाच्या मागण्या करायच्या हे जरा अनाकलनीय वाटते. विद्यमान सरकार असो वा आधीचे दुसºया विचारधारेचे सरकार, शेतकºयांच्या आर्थिक मागण्यांवर त्यांचा प्रतिसाद कसा असतो, हे सर्वविदित आहे. त्यामुळे शेतकºयाला पंगू बनविणाºया सरकारी कुबड्या फेकून देऊन त्याला स्वत:च्या पायावर कसे उभे करता येईल, यावर परिषदेत मुक्त चिंतन झाले असते, तर ते जास्त स्वागतार्ह ठरले असते. एक बच्चू कडू वगळता परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आलेले इतर सर्वच नेते सध्या केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून दुखावलेले आहेत. त्यामुळे परिषदेच्या आयोजनामागील हेतूबाबत शंका निर्माण करण्यास नाहक वाव मिळतो. आयोजकांनी ते टाळले असते तर अधिक बरे झाले असते. त्यामुळे परिषदेची आणि आयोजकांची विश्वासार्हता वाढण्यास मदतच झाली असती. गत काही काळापासून किमान विदर्भात तरी शेतकरी चळवळीचा प्रवाह ठप्प झाल्यासारखा भासत आहे. ‘कासोधा’च्या निमित्ताने तो वाहता झाला, तर आयोजकांचा प्रयास यशस्वी झाला, असे म्हणता येईल.

टॅग्स :Farmerशेतकरी