शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

अब कौन ‘सहारा’?

By admin | Updated: February 7, 2017 23:17 IST

सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबांचे हजारो कोटी रुपये कवड्या मोजून परत करण्याच्या ‘सहाराश्री’ सुब्रतो रॉय यांच्या वेळकाढू युक्त्यांना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दणका दिला हे बरेच झाले.

सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबांचे हजारो कोटी रुपये कवड्या मोजून परत करण्याच्या ‘सहाराश्री’ सुब्रतो रॉय यांच्या वेळकाढू युक्त्यांना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दणका दिला हे बरेच झाले. याच सर्वसामान्य लोकांच्या बळावर ‘सहारा’ने आपले साम्राज्य उभे केले आणि नंतर त्यांना वाऱ्यावरही सोडले. करोडो रुपये कमावणाऱ्या आपल्या क्रिकेटपटूंच्या अंगात याच सहाराचे जर्सी कधीकाळी झळकत होते.

जवळपास तीन कोटी लोकांनी पै-पैसा गोळा करून जमवलेल्या या पैशावर सहारांनी नुसता डल्लाच मारला नाही, तर हा पैसा त्यांना परत द्यावा लागू नये यासाठी जमेल त्या साऱ्या कुलंगड्याही त्यांनी केल्या. अजूनही त्यांचे तेच सुरू आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने लोणावळ्यातील त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट अ‍ॅम्बी व्हॅलीवरच जप्तीचे आदेश दिल्यानंतर सर्वसामान्यांचा सहारा हिरावून घेणाऱ्या ‘सहारा’ परिवाराचे आता धाबे दणाणले आहे. सर्वसामान्य लोकांच्या तब्बल २४ हजार कोटी रुपयांवर सहारांनी डल्ला मारला. १५ टक्के व्याजासह सहारांना ही रक्कम समभागधारकांना द्यावी लागणार असून, ही रक्कम आजच्या घडीला ४८ हजार कोटी इतकी झाली आहे. त्यातील केवळ ११ हजार कोटी रुपयांची रक्कम सहाराने जमा केली आहे. या ४८ हजार कोटी रुपयांतीलही २४ हजार कोटी रुपयांची केवळ मूळ रक्कमच आम्ही जुलै २०१९ पर्यंत भरू शकू, असा हात वर करण्याचा प्रकारही सहारांनी केला.

खरे तर ही सारीच रक्कम एकरकमी भरणे सहज शक्य होते. पण २०१० ला त्यांच्यावर खटला दाखल झाल्यापासून त्यांनी केवळ वेळकाढूपणाच केला. त्याआधी म्हणजे २००८ ते २०११ या कालावधीत सामान्य लोकांनी मोठ्या आशेने त्यांच्याकडे गुंतवलेला पैसा ते आजही वापरत आहेत. सर्वाेच्च न्यायालयाने जप्तीचा आदेश दिलेल्या अ‍ॅम्बी व्हॅली प्रोजेक्टची किंमत ३९ हजार कोटी रुपयांची असल्याचा अंदाज आहे. सहारांच्याच म्हणण्यानुसार या प्रकल्पाची किंमत एक लाख कोटी रुपये आहे. कोणतेही कर्ज व बोजा नसलेल्या अनेक मालमत्ताही सहारांकडे आहेत.

आठवडाभरात या मालमत्तांची यादी द्या, त्या विकून आम्ही भागधारकांचे पैसे चुकवू नाहीतर तुम्हाला पुन्हा जेलची हवा तर खावी लागेलच, शिवाय अ‍ॅम्बी व्हॅलीच आम्ही लिलावात काढू असे न्यायालयाने सुनावले आहे. दरवेळी दोनचारशे कोटी रुपये जमा करून न्यायालयाचा वेळ घेणाऱ्या सहाराला न्यायालयाने आता चांगलाच चाप लावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना आपला पैसा त्यातल्यात्यात लवकर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण प्रत्येक वेळी न्यायालयालाच दंडुका का उगारावा लागतो, आपल्या यंत्रणा त्यावेळी काय करत असतात हा प्रश्न कधी तरी सुटेल का? प्रश्नच आहे..