शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
5
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
6
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
7
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
8
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
9
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
10
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
11
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
12
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
13
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
14
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
15
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
16
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
17
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
18
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
19
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

...आता उमेदवार शोधण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 16:37 IST

मिलिंद कुलकर्णी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्वाभाविकपणे विधानसभा निवडणुकीची चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. भाजप-शिवसेनेने २०१४ च्या कामगिरीची पुनरावृत्ती केल्याने ...

मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्वाभाविकपणे विधानसभा निवडणुकीची चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. भाजप-शिवसेनेने २०१४ च्या कामगिरीची पुनरावृत्ती केल्याने त्यांची स्थिती भक्कम आहे. मोदी लाटेचा लाभ विधानसभा निवडणुकीतही मिळविण्यासाठी दोन्ही पक्षांचे प्रयत्न राहतील. सुमारे अडीच महिने राज्य सरकारच्या हाती असल्याने जनहिताचे, लोकप्रिय निर्णय घेऊन जनमत आणखी आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न केले जातील.प्रश्न काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस आघाडीचा राहील. राष्टÑवादीने महाराष्टÑात गेल्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही चार जागा जिंकल्या. याउलट काँग्रेसची एक जागा कमी झाली. खान्देशच्यादृष्टीने विचार केला तर पक्षीय ताकद ही नंदुरबार व धुळे जिल्ह्यात चांगली आहे, मात्र जळगाव जिल्ह्यात तशी स्थिती नाही, हे लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी निश्चितीवरुन दिसून आले. राष्टÑवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचे नाव निश्चित होण्यापूर्वी पक्षाने कितीतरी नावांचा विचार केला होता. काही प्रतिष्ठीतांची नावे माध्यमांमध्ये पोहोचवून जनमानसाचा कानोसा घेण्यात आला होता. रावेरला तर राष्टÑवादीला सक्षम उमेदवार न मिळाल्याने अखेर ही जागा काँग्रेसला द्यायला राजी व्हावे लागले. माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांनी पक्ष मेळाव्यात अलीकडे केलेले विधान पक्षस्थितीचे अचूक मूल्यमापन करणारे आहे. या निवडणुकीत नेते व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले नाही, तर रावेरप्रमाणे जळगावसाठी उमेदवार शोधण्याची वेळ येऊ शकते. कोणी उमेदवारी घ्यायला तयार होणार नाही.दुर्देवाने दोन्ही पक्ष, त्यांचे पक्षश्रेष्ठी, नेते आणि कार्यकर्ते हे अजूनही जुन्या मानसिकतेतून बाहेर पडत नाही. तुमचा प्रतिस्पर्धी हा तगडा, नियोजनपूर्वक वाटचाल करणारा आणि साम, दाम, दंड भेद नीतीचा अवलंब करणारा असताना तुम्ही ऐनवेळी उमेदवार दिल्यानंतर काय निभाव लागणार आहे, याचा विचार करायला हवा. २०१४ ची निवडणूक जिंकल्यानंतर मोदी आणि शहा हे २०१९च्या तयारीला लागले होते. त्यामुळे अशा प्रतिस्पर्धी समोर दोन्ही काँग्रेसला नव्या रणनीतीने सामोरे जावे लागणार आहे.स्थानिक नेते आणि कार्यकर्ते अजूनही सत्ताधीशांच्या मानसिकतेतून बाहेर पडलेले नाही.हे नेते शिक्षण संस्था, सहकारी संस्था यांच्या व्यापात एवढे बुडालेले आहेत, की पक्षासाठी वेळ त्यांच्याकडे नाही. स्वत:ला उमेदवारी मिळाली तरच ही मंडळी सक्रीय होतात, दुसऱ्यासाठी तोंडदेखले काम केले जाते हा अनुभव आहे. शेंदुर्णी नगरपंचायत, जळगाव, धुळे महापालिकेच्या निवडणुका अलिकडे झाल्या; त्यासाठी दोन्ही काँग्रेसने ज्या पध्दतीने काम केले, त्यावरुन हा निष्कर्ष काढावा लागतो. जळगावातील काँग्रेस पक्ष कार्याची स्थिती पाहून पक्ष निरीक्षक अब्दुल सत्तार यांना वैफल्य आले. दुसरीकडे सत्तेत राहण्याची जी सवय लागली आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांमध्ये नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजप-शिवसेनेशी तडजोड करुन सत्तेचा वाटा मिळविला आहे. पाच वर्षे विरोधात बसायची कुणाची तयारी नाही, मग पक्ष वाढणार कसा? संयम, प्रतीक्षा हे गुण कालांतराने लाभदायी ठरतात, हा सुविचार आमच्या गावी नाही.हे झाले स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचे तर पक्षश्रेष्ठींची तºहा वेगळीच आहे. सामान्यांमधून आलेल्या नेतृत्वापेक्षा घराणे, लांगुलचालन करणारे नेते, कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले जात आहे. नेता डोईजड होऊ लागला की, त्याचे पंख कापण्याचे काम केले जाते हा अनुभव खान्देशने वारंवार घेतला आहे. त्यामुळे अनेक जण पक्ष सोडून गेले. काहींनी कुटुंबातील सदस्य भाजप-सेनेत पाठवून संस्थाने सुरक्षित राहण्याची धडपड केली. पक्ष जर पाठीशी खंबीरपणे राहत नसेल तर कोण सत्ताधाऱ्यांशी वैर घेईल, अशी भावना नेते व कार्यकर्त्यांमध्ये तयार झाली आहे. पक्षाची संघटनात्मक पदे घ्यायला कोणी तयार नाही, उमेदवारी घ्यायला तयार नाही, हे चित्र निर्माण होण्यास पक्षश्रेष्ठी आणि स्थानिक नेते, कार्यकर्ते हे समप्रमाणात जबाबदार आहेत, हे नाकारुन चालणार नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव