शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आता लक्ष पेहलाज

By admin | Updated: November 20, 2015 03:02 IST

गजेन्द्र चौहान यांची नियुक्ती रद्द व्हावी म्हणून प्रदीर्घकाळ संपावर गेलेल्या पुणे शहरातील फिल्म्स अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी त्यांची मागणी मान्य

गजेन्द्र चौहान यांची नियुक्ती रद्द व्हावी म्हणून प्रदीर्घकाळ संपावर गेलेल्या पुणे शहरातील फिल्म्स अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी त्यांची मागणी मान्य न होताच आपला संप मागे घेतला. यात कोणाचा जय वा पराजय याची चिकित्सा न करण्यातच साऱ्यांचे शहाणपण होते. परंतु त्याच बरोबर आता तरी या संस्थेचे कामकाज सुरळीतपणे सुरु होईल हे पाहाण्याची जबाबदारीही साऱ्याच संबंधितांची होती आणि आहे. पण तसे होईलसे दिसत नाही. आपला दीर्घकालीन लढा अयशस्वी झाल्याची जखम घेऊन वावरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे (सेन्सॉर बोर्ड) अध्यक्ष पेहलाज निहलानी यांनी केल्याने आता याच विद्यार्थ्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी संबंधित खात्याचे राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांच्याकडे केली आहे. गुणवत्ता आणि सिनेसृष्टीतील कारकीर्द यांचा विचार करता, गजेन्द्र चौहान आणि निहलानी यांच्यात तसा गुणात्मक फरक काहीही नाही. जशी चौहान यांची नियुक्ती वादग्रस्त ठरली होती तशीच ती निहलानी यांचीही ठरली होती. परंतु तितकेच नव्हे, तर नियुक्तीनंतर त्यांनी नवनवे वाददेखील अंगावर ओढवून घेतले होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ या सहा मिनिटांच्या प्रचारी चित्रफितीची निर्मिती हेच काय ते निहलानी यांचे कर्तृत्व. तितक्या भांडवलावर त्यांना इतके मोठे पद मिळाले. ते पदरात पाडून घेऊन गप्प बसण्यातच त्यांचे हित असताना त्यांनी पुण्यातील वरील संस्थेमधल्या विद्यार्थी संपावर एक लघुपट निर्माण करण्याची घोषणा केली आहे. आपण या लघुपटात संपकऱ्यांना उघडे पाडणार असल्याचे त्यांनीच म्हटले आहे. याचा अर्थ त्यांचा हा लघुपट श्वेत वर्णातील सरकार आणि कृष्ण वर्णातील विद्यार्थी रंगवणार हे उघड आहे. विद्यार्थ्यांचा त्याला आक्षेप आहे आणि तो अस्थानी नाही. देशातील एका प्रतिष्ठित संस्थेत इतका लांबलचक संप सुरु राहाणे या संस्थेशी संबंधित कोणालाच शोभा देणारे नव्हते. परंतु जे झाले ते झाले. त्याचा साऱ्यांनी विसर पाडून घेणे श्रेयस्कर असताना पेहलाज यांना आलेल्या ताज्या उबळीचे कशाही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही.