शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

...आता गरिबांना हात द्या, दिवाळी गोड होऊ द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 06:12 IST

Diwali : गतवर्षीच्या तुलनेत जीएसटीतून होणाऱ्या करसंकलनाचे प्रमाण उत्तम आहे.  परताव्याच्या स्वरूपात अनेक राज्ये अजूनही आपला वाटा मिळण्याची वाट पाहत आहेत.

- चक्रधर दळवी(संपादक, लोकमत, औरंगाबाद)

कोरोना आणि त्याच्या कहराचा बसलेला मारा व त्यातून आलेली मरगळ झटकून टाकावी असे शुभसंकेत अर्थव्यवस्था रुळावर येताना देऊन गेलेत. वस्तू व सेवा करसंकलनाने हे संकेत दिलेत.  कोरोनाच्या गेल्या आठ महिन्यांच्या काळात पहिल्यांदाच जीएसटीचे अत्यंत चांगले करसंकलन होणे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याचे हे सर्वात मोठे चिन्ह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारल्याचे सूतोवाच केलेच आहे. विकसनशील राष्ट्रांपैकी  भारतासारख्या राष्ट्रात आता करसंकलन  कोराेनाच्या महामारीतही होऊ शकते हे जगाने यानिमित्ताने पाहिले आहे. आता हा नावलौकिक मिळवून देणाऱ्या देशातील सरकारने नोकरदार वर्ग, कामगार, सरकारी नोकर आणि महिला व सर्वच नागरिकांचे कल्याण करणे आवश्यक आहे.  

गतवर्षीच्या तुलनेत जीएसटीतून होणाऱ्या करसंकलनाचे प्रमाण उत्तम आहे.  परताव्याच्या स्वरूपात अनेक राज्ये अजूनही आपला वाटा मिळण्याची वाट पाहत आहेत.  त्यांना त्यांचा वाटा मिळावा. 72 हजार 828 कोटी एवढे जास्त करसंकलन एप्रिलच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये झाले आहे. नेमका काळ प्रतिकूल होता. काळ अनुकूल असतानादेखील हे करसंकलन वाढले नव्हते, ऑक्टोबर 2019 च्या तुलनेत ऑक्टोबर 2020चे करसंकलन चांगले आहे. हे करसंकलन वेगवेगळे सण आणि हवामान बदल, वातावरणाच्या बदलातही प्रतिकूलता असताना  झाले आहे.  प्रतिकूलतेवर मात करीत, बदल करीत, संघर्ष करीत विविध उद्योगधंदे आणि व्यवसायामुळे झाले आहे, हे विसरून चालणार नाही. आता एवढे मोठे कर संकलन झाले असताना नोकरदार वर्ग आणि खाजगी नोकरदार वर्ग यांची दिवाळी गोड करण्याचे धारिष्ट्य आता केंद्र सरकारला दाखवावे लागणार आहे.

अर्थव्यवस्था संपूर्ण रुळावर येण्यासाठी सर्व नोकरदार वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक हे महत्त्वाचे घटक आहेत. यासाठी आठ महिन्यांत झालेली वेतनकपात रद्द करणे, नोकरकपात नाहीशी करणे, बेरोजगार झालेल्या युवकांना पुन्हा नोकऱ्या देणे आवश्यक आहे. नुसत्या नोकऱ्या देऊन चालणार नाही, तर त्यांना अत्यंत समर्पक व किमान कौशल्याधारित वेतन पुन्हा सुरू करणे, देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातून त्यांचे मनोधैर्य वाढेल व आगामी करसंकलनही वाढवण्यास पोषक वातावरण निर्माण होईल. कर्मचाऱ्यांचा गोठवलेला महागाई भत्ताही दिला पाहिजे. फेब्रुवारीपासूनच या आठ महिन्यांत जीएसटीचे संकलन प्रथमच एक लाख कोटींपेक्षा अधिक होणे जागतिक पातळीवर भारताची अर्थव्यवस्था अधिक बळकट आहे हे दाखवून दिल्यासारखे आहे.

सलग दुसऱ्या महिन्यात जीएसटी संकलनात वाढ होत जाणे ही बाब यातून अधोरेखित करते की, आगामी दिवाळीमुळे बाजारात खरेदी-विक्रीचा जोर पुनश्च वाढेल व नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ही करवसुली अशीच वाढू शकते. आगामी काळात सरकारी नोकरदार, खाजगी नोकरदार आणि कामगार वर्ग यांच्या खिशात हा पैसा  बोनस, पगार, वेतनवाढ यातून जाणे अत्यंत आवश्यक आहे. यातून मार्केट बूम होईल. पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट, मीडिया, मनोरंजन क्षेत्र, बँकिंग प्रणाली, शैक्षणिक क्षेत्र असे अनेक क्षेत्र आस लावून आहेत. या सर्वच क्षेत्रांतील नकारात्मकता घालवण्यासाठी पैसा खेळता ठेवणे व शाश्वत विश्वास देणे आवश्यक आहे. या दोन्ही बाबी मायबाप सरकार म्हणून सरकारने कराव्यात.

आठ महिन्यांत विविध कल्याणकारी सरकारी योजना राबवून, अर्थव्यवस्थेला बूम देण्यासाठी पॅकेज जाहीर करूनदेखील जीएसटी संकलन वाढ देण्याचे काम नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक व सरतेशेवटी भारतीय नागरिक म्हणून नागरिकांनी केले आहे. नागरिकांचा पैसा नागरिकांच्या विकासासाठी खर्च होणे आवश्यक आहे. कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी कायम असायलाच हवी, यात काही वाद नाही; पण आज पैसा खेळता असणे आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणे हेही महत्त्वाचे आहेत त्यावर कुठलाही दुष्परिणाम होता कामा नये.  ब्रिटन व युरोपसारख्या देशांमध्ये कोरोनाचा दुसरा कहर आला आहे. तो लक्षात घेऊन व जागतिक पातळीचा अभ्यास करीत आज त्या दृष्टीनेसुद्धा भारताची काय तयारी आहे, हे  दाखवून देणे हे सरकारचे परमकर्तव्य आहे.

टॅग्स :GSTजीएसटीDiwaliदिवाळी