शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

आता अपेक्षा ‘रामायण सर्किट’च्या विकासाची!

By किरण अग्रवाल | Updated: August 6, 2020 13:28 IST

भारतातीलच नव्हे तर जगभरातील भाविकांसाठी प्रभू श्रीराम हे श्रद्धेचे व आस्थेचे प्रतीक आहेत, त्यामुळे त्यांच्या जन्मभूमीत त्यांचे भव्य मंदिर असावे असे तमाम भाविकांचे स्वप्न राहिले आहे

किरण अग्रवालअयोध्येत पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेल्या राममंदिर निर्माणाच्या भूमिपूजनामुळे कोट्यवधी रामभक्तांनी गेल्या अनेक वर्षांपासून मनात बाळगलेल्या स्वप्नाच्या पूर्ततेच्या दिशेने वाटचालीस प्रारंभ झाला आहे. लवकरच निर्धारित कालावधीत मंदिर साकारलेले बघण्याची आस बळावून गेली आहेच; पण ते होताना खुद्द मोदी यांनीच यावेळी उल्लेखिलेल्या देशातील ‘रामायण सर्किट’च्या विकासाबाबतही अपेक्षा उंचावून जाणे स्वाभाविक ठरले आहे.भारतातीलच नव्हे तर जगभरातील भाविकांसाठी प्रभू श्रीराम हे श्रद्धेचे व आस्थेचे प्रतीक आहेत, त्यामुळे त्यांच्या जन्मभूमीत त्यांचे भव्य मंदिर असावे असे तमाम भाविकांचे स्वप्न राहिले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडल्याने या स्वप्नाची पूर्तता होतानाचा अनुभव समस्त रामभक्त घेत आहेत. या सोहळ्यासाठी शरयू तटावरील अयोध्या नगरी तर सजलेली दिसलीच; परंतु त्याचसोबत देशभरातही जे उत्सवाचे व उत्साहाचे वातावरण दिसले त्यातून जना-जनांच्या मनामनात वसलेल्या रामाचा प्रत्यय यावा. विशेष म्हणजे प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्श लाभलेली देशभरातील जी काही ठिकाणे आहेत तेथील रामभक्तांचा आनंदही अवर्णनीय असा राहिला. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाल्यास प्रभू श्रीरामांनी त्यांच्या वनवासाचा काळ जेथे व्यतीत केला त्या नाशिक पंचवटीसह नागपूर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, सोलापूर आदी जिल्ह्यांमध्येही त्यांचा पदस्पर्श लाभल्याचे उल्लेख आढळतात, त्यामुळे या ठिकाणांवरही राममंदिर भूमिपूजनाचा अपूर्व आनंद व्यक्त झालेला दिसला. कोरोनाचे संकट लक्षात घेता या आनंदाला मर्यादा आलेल्या असतानाही तो ओसंडून वाहिला. अनेक ठिकाणी गुढ्या उभारल्या गेल्या तर मंदिरांमध्ये पूजा-अर्चनेसह घंटानाद व शंखध्वनी केले गेले. राज्यातील सिंहस्थ कुंभमेळ्याचे ठिकाण असलेल्या नाशकात प्रख्यात रामकुंडावर यानिमित्त आरती करून कोरोनाच्या संकटापासून लवकर सुटका व्हावी यासाठी प्रार्थना केली गेली.

महत्त्वाचे म्हणजे अयोध्येतील भूमिपूजनाचा सोहळा समस्त भाविक दूर चित्रवाहिन्यांच्या माध्यमातून तन्मयतेने ऐकत होते व डोळ्यात साठवत होते. त्यामुळे भूमिपूजनानंतर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी या मंदिर निर्माण बरोबरच देशातील प्रस्तावित रामायण सर्किटच्या विकासाचा मुद्दा उल्लेखिताच संबंधित ठिकाणच्या भाविकांच्या अपेक्षा उंचावून गेल्या. प्रभू श्रीरामांनी देशभरात जेथे-जेथे भेटी दिल्या ती ठिकाणे विकसित करून त्याचे पर्यटकीय महत्त्व वाढवण्याच्या दृष्टीने रामायण सर्किटची योजना आखण्यात आली आहे. अयोध्येत उभ्या राहणाऱ्या मंदिरामुळे यापुढील काळातील तेथील अर्थकारणाला चालना मिळून जाईल, असे मोदी यांनी सांगितले, त्यानुसारच रामायण सर्किटमधील स्थानकांचा विकास केला गेल्यास त्या त्या परिसरातील अर्थकारणालाही गती मिळेल, म्हणूनच आता राममंदिर भूमिपूजनानंतर रामायण सर्किटच्या विकासाची अपेक्षा केली जात आहे.

श्रीराम सांस्कृतिक शोध संस्थान न्यासच्या यादीत प्रभू श्रीरामांनी भारत भूमीत २९० ठिकाणी भेटी दिल्याचा उल्लेख आहे. या यादीचा विचार करता यात महाराष्ट्रातील ४५ स्थानांचा उल्लेख आहे. विशेषकरून श्रीरामांनी जेथे वनवासाचा अधिक काळ व्यतीत केला व जेथून सीताहरण झाले तसेच शूर्पणखेचे लक्ष्मणाकडून नाक कापले गेल्याचे दाखले पुराणात आढळतात त्या नाशिकमध्ये यासंबंधीच्या खुणा आजही जपल्या गेल्या आहेत. सिंहस्थाचे स्नान होणारे प्रख्यात रामकुंड, काळाराम मंदिर, सीतागुंफा, तपोवन, रामशेज किल्ला, सीता सरोवर, जटायू कथा जेथे घडून आली ते सर्वतीर्थ टाकेद आदी ठिकाणांचा यात उल्लेख करता येणारा आहे. त्यामुळे रामायण सर्किट अंतर्गत नाशिकमधील या खुणांच्या विकासाची आस आहे. मध्यंतरी या दृष्टीने नाशिक व नागपूरच्या विकासासाठी एका सल्लागार समितीकडून आराखडा बनविला गेला होता व त्या आधारे केंद्र सरकारकडे सुमारे शंभर कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पर्यटन विभागाकडे वारंवार पाठपुरावाही चालविला आहे, तेव्हा खुद्द पंतप्रधानांनीच आता रामायण सर्किटचा उल्लेख केल्याने रामाचा पदस्पर्श लाभलेल्या सर्वच ठिकाणांच्या विकासाला चालना लाभायला हवी. केंद्रात प्रतिनिधित्व करणा-या लोकप्रतिनिधींनी आता यासंदर्भात अधिक सक्रिय होत तगादा लावण्याची गरज आहे. 

टॅग्स :NashikनाशिकRam Mandirराम मंदिर