शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमधील गैरप्रकाराला कोण लगाम घालणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 09:20 IST

मुंबईतील सुमारे २६० हॉटेल्सना अन्न व औषध प्रशासनाने ठोठावेल्या नोटीसमधून येते. अग्निशमन दलानेही १७ हॉटेल्सना नोटीस बजावली आहे. या दोन्ही नोटीस एकाच वेळी गेल्याने मुंबईतील हॉटेल्स किती सुरक्षित आहेत याचा अंदाज येतो. 

विनायक पात्रुडकर

दिखावा नेहमीच भुरळ पाडणार असतो. हानी होण्याची शक्यता यात अधिक असते. त्याचे जीवन मात्र अल्प असते. अशाप्रकारचा दिखावा सध्या सर्वच व्यवसाय दिखावा केला जातो आहे. आपण कसे दर्जेदार, आपले उत्पादन कसे पोषक, याचे दावे केले जातात. काही काळाने हे दावे फोल ठरतात. तशीच काहीशी अवस्था हॉटेल व्यवसायाची झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रशासनही काम करत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याची अनुभूती मुंबईतील सुमारे २६० हॉटेल्सना अन्न व औषध प्रशासनाने ठोठावेल्या नोटीसमधून येते. अग्निशमन दलानेही १७ हॉटेल्सना नोटीस बजावली आहे. या दोन्ही नोटीस एकाच वेळी गेल्याने मुंबईतील हॉटेल्स किती सुरक्षित आहेत याचा अंदाज येतो. गेल्या दोन वर्षांत मुंबईतील काही हॉटेल्सना आग लागली. त्यातून मोजक्याच हॉटेल्सनी धडा घेतल्याचे या नोटीसमधून स्पष्ट होते. या दोन वर्षांत प्रशासनाच्या कारवाईची धार अधिक तीव्र नव्हती हेही तितकेच खरे आहे. कारण या काळात नियम न पाळणाऱ्या हॉटेल्सवर अपेक्षेप्रमाणे कारवाई झालेली नाही. दुसरीकडे हॉटेल्समध्ये मिळणारे अन्न किती सुरक्षित आहे हाही संशोधनाचा विषय आहे. 

हॉटेल्समधील किचन व इतर सुविधांचा अभाव याची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. मात्र या परिस्थितीला नागरिकही तितकेच जबाबदार आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण हॉटेल्समध्ये मिळणारे अन्न दर्जेदार नसल्यास नागरिक त्याविरोधात आवाज उठवत नाहीत. ‘चलता है’ म्हणत नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे बड्या हॉटेल्सवर कारवाई होत नाही.  मुंबईसारख्या शहरात हॉटेल व्यवसाय नेहमीच नफ्यात राहिलेला आहे. बदलत्या काळानुसार या व्यवसायाने कातही टाकली. दिखाव्यापणाला अधिक महत्त्व देण्यास सुरुवात झाली. आलिशान प्रवेशद्वार, सलाम करणारा द्वारपाल, अगदी सौम्य आवाजात ऑर्डर घेणारे वेटर, अशी सर्व व्यवस्था हॉटेल्समध्ये केलेली असते. यानेच आकर्षित होऊन नागरिक हॉटेल्समध्ये जातात व त्यांची कधीकधी निराशा होते. अन्न खाताना ते दर्जेदार नसल्याचे नागरिकांना कळते. त्याबदल्यात हॉटेलकडून दुसरे अन्न दिले जाते. दुसरे अन्न दर्जेदार असो की नसो, ते खाण्यावाचून पर्याय नसतो. असे घडले तरी त्याची तक्रार होत नाही. अशा घटनांची तक्रार नागरिकांनी करायला हवी. तरच हॉटेल्समधील अन्नाचा दर्जा सुधारेल. नागरिकांनी प्रत्येक बाबतीत सर्तक राहायलाच हवे, त्यासोबत प्रशासनानेही दक्ष राहायला हवे. आस्थापनांची वारंवार पाहाणी करायला हवी. हॉटेलमध्ये जाणाऱ्या माणसाने तेथील किचन तपासणे व्यवहार्य नाही व तसे कोणी करतही नाही. 

हॉटेल्सचे किचन स्वच्छ असणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रशासनाने वेळोवेळी आकस्मित धाड टाकून हॉटेल्सचे किचन तपासायला हवेत. तरच हॉटेल्स मालक व चालक किमान भीतीपोटी तरी किचन स्वच्छ ठेवतील. प्रशासनाने हॉटेल्सला पुरवठा होणाऱ्या अन्नाचा दर्जाही तपासायला हवा. कारवाई झाल्यानंतर दोषींनी कठोर शिक्षा होईल याकडेही लक्ष द्यायला हवे. अन्न व औषध प्रशासनाने दाखल केलेल्या खटल्यात शिक्षेचे प्रमाण तुरळक आहे. हे प्रमाण कसे वाढेल याचा विचार करायला हवा. तरच हॉटेल्समध्ये दर्जेदार अन्न मिळेल व किचनही स्वच्छ राहतील. यासोबतच हॉटेलमध्ये अग्निरोधक यंत्रणा आहे की नाही किंवा इतर पर्यायी उपाय केलेले आहेत की नाही याचीही चाचणी वेळोवेळी करायला हवी. तरच हॉटेलमध्ये आगीच्या घटना घडणार नाहीत. 

टॅग्स :hotelहॉटेलMumbaiमुंबईfoodअन्न