शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

हॉटेलमधील गैरप्रकाराला कोण लगाम घालणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 09:20 IST

मुंबईतील सुमारे २६० हॉटेल्सना अन्न व औषध प्रशासनाने ठोठावेल्या नोटीसमधून येते. अग्निशमन दलानेही १७ हॉटेल्सना नोटीस बजावली आहे. या दोन्ही नोटीस एकाच वेळी गेल्याने मुंबईतील हॉटेल्स किती सुरक्षित आहेत याचा अंदाज येतो. 

विनायक पात्रुडकर

दिखावा नेहमीच भुरळ पाडणार असतो. हानी होण्याची शक्यता यात अधिक असते. त्याचे जीवन मात्र अल्प असते. अशाप्रकारचा दिखावा सध्या सर्वच व्यवसाय दिखावा केला जातो आहे. आपण कसे दर्जेदार, आपले उत्पादन कसे पोषक, याचे दावे केले जातात. काही काळाने हे दावे फोल ठरतात. तशीच काहीशी अवस्था हॉटेल व्यवसायाची झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रशासनही काम करत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याची अनुभूती मुंबईतील सुमारे २६० हॉटेल्सना अन्न व औषध प्रशासनाने ठोठावेल्या नोटीसमधून येते. अग्निशमन दलानेही १७ हॉटेल्सना नोटीस बजावली आहे. या दोन्ही नोटीस एकाच वेळी गेल्याने मुंबईतील हॉटेल्स किती सुरक्षित आहेत याचा अंदाज येतो. गेल्या दोन वर्षांत मुंबईतील काही हॉटेल्सना आग लागली. त्यातून मोजक्याच हॉटेल्सनी धडा घेतल्याचे या नोटीसमधून स्पष्ट होते. या दोन वर्षांत प्रशासनाच्या कारवाईची धार अधिक तीव्र नव्हती हेही तितकेच खरे आहे. कारण या काळात नियम न पाळणाऱ्या हॉटेल्सवर अपेक्षेप्रमाणे कारवाई झालेली नाही. दुसरीकडे हॉटेल्समध्ये मिळणारे अन्न किती सुरक्षित आहे हाही संशोधनाचा विषय आहे. 

हॉटेल्समधील किचन व इतर सुविधांचा अभाव याची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. मात्र या परिस्थितीला नागरिकही तितकेच जबाबदार आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण हॉटेल्समध्ये मिळणारे अन्न दर्जेदार नसल्यास नागरिक त्याविरोधात आवाज उठवत नाहीत. ‘चलता है’ म्हणत नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे बड्या हॉटेल्सवर कारवाई होत नाही.  मुंबईसारख्या शहरात हॉटेल व्यवसाय नेहमीच नफ्यात राहिलेला आहे. बदलत्या काळानुसार या व्यवसायाने कातही टाकली. दिखाव्यापणाला अधिक महत्त्व देण्यास सुरुवात झाली. आलिशान प्रवेशद्वार, सलाम करणारा द्वारपाल, अगदी सौम्य आवाजात ऑर्डर घेणारे वेटर, अशी सर्व व्यवस्था हॉटेल्समध्ये केलेली असते. यानेच आकर्षित होऊन नागरिक हॉटेल्समध्ये जातात व त्यांची कधीकधी निराशा होते. अन्न खाताना ते दर्जेदार नसल्याचे नागरिकांना कळते. त्याबदल्यात हॉटेलकडून दुसरे अन्न दिले जाते. दुसरे अन्न दर्जेदार असो की नसो, ते खाण्यावाचून पर्याय नसतो. असे घडले तरी त्याची तक्रार होत नाही. अशा घटनांची तक्रार नागरिकांनी करायला हवी. तरच हॉटेल्समधील अन्नाचा दर्जा सुधारेल. नागरिकांनी प्रत्येक बाबतीत सर्तक राहायलाच हवे, त्यासोबत प्रशासनानेही दक्ष राहायला हवे. आस्थापनांची वारंवार पाहाणी करायला हवी. हॉटेलमध्ये जाणाऱ्या माणसाने तेथील किचन तपासणे व्यवहार्य नाही व तसे कोणी करतही नाही. 

हॉटेल्सचे किचन स्वच्छ असणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रशासनाने वेळोवेळी आकस्मित धाड टाकून हॉटेल्सचे किचन तपासायला हवेत. तरच हॉटेल्स मालक व चालक किमान भीतीपोटी तरी किचन स्वच्छ ठेवतील. प्रशासनाने हॉटेल्सला पुरवठा होणाऱ्या अन्नाचा दर्जाही तपासायला हवा. कारवाई झाल्यानंतर दोषींनी कठोर शिक्षा होईल याकडेही लक्ष द्यायला हवे. अन्न व औषध प्रशासनाने दाखल केलेल्या खटल्यात शिक्षेचे प्रमाण तुरळक आहे. हे प्रमाण कसे वाढेल याचा विचार करायला हवा. तरच हॉटेल्समध्ये दर्जेदार अन्न मिळेल व किचनही स्वच्छ राहतील. यासोबतच हॉटेलमध्ये अग्निरोधक यंत्रणा आहे की नाही किंवा इतर पर्यायी उपाय केलेले आहेत की नाही याचीही चाचणी वेळोवेळी करायला हवी. तरच हॉटेलमध्ये आगीच्या घटना घडणार नाहीत. 

टॅग्स :hotelहॉटेलMumbaiमुंबईfoodअन्न