शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

‘नोट दो, व्होट लो’

By admin | Updated: October 8, 2015 04:35 IST

भारतातील लोकशाही खरोखरी दिवसागणिक अधिकाधिक सुदृढ, परिपक्व आणि विशेषत: अधिकच ‘पारदर्शी’ होऊ लागली आहे! संसदीय, विधिमंडळीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

भारतातील लोकशाही खरोखरी दिवसागणिक अधिकाधिक सुदृढ, परिपक्व आणि विशेषत: अधिकच ‘पारदर्शी’ होऊ लागली आहे! संसदीय, विधिमंडळीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारातील लोकशाहीचा मूळारंभ म्हणजे निवडणूक आणि निवडणुकीतील मतदान. या शब्दातच ‘दान’ आहे, जे विनामोबदलाच दिले जावे, अशी समजूत आहे. पण आता या जुनाट समजुतीला काहीही अर्थ नाही असे मनोमन ठरवून की काय, बिहारातील तब्बल ८० टक्के मतदारांना मोबदला घेतल्याशिवाय मत देण्यात काहीही गैर वाटत नाही. किंबहुना त्यांचा याला पूर्ण व कदाचित सक्रीय पाठिंबा आहे. मतदान प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने पार पडावी, मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, या प्रक्रियेतील भ्रष्टाचार निपटून काढता आला तर तसा प्रयत्न करुन पाहावा म्हणून बिहारच्या मुख्य निर्वाचन आयुक्तांनी एक जोरदार मोहीम सध्या तिथे सुरु केली आहे. याच मोहिमेंतर्गत एक मतदार सर्वेक्षण हाती घेतले गेले आणि त्यामधून वरील निष्कर्ष समोर आला. ‘नोट दो, व्होट लो’ हा साधा सरळ व्यवहार आहे आणि त्यात काहीही गैर नाही असे किमान ८० टक्के मतदारांना तरी वाटते. विशेष म्हणजे सर्वेक्षणासाठी ज्या मतदारांकडे विचारणा केली, त्यात गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित आणि महिला-पुरुष असे सारेच होते. निर्वाचन आयुक्तालयाला या निष्कर्षापायी मोठा धक्का म्हणे बसला आहे. त्यामुळे ‘मतदान आवर्जून करा, पण त्यासाठी पैसे वा भेटवस्तू स्वीकारु नका’, असा प्रचार तिथे आयुक्तालयाच्या वतीने सुरु केला गेला आहे. त्या राज्यातील मतदानाची सरासरी नेहमी ५५ टक्क््यांच्या आतलीच असते. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीच काय ती या आकडेवारीने सुमारे सव्वा टक्क््याची वाढ दाखविली. याचा एक अर्थ असा तर नव्हे की, जो उमेदवार किंवा जो पक्ष ‘व्यवहार’ पूर्ण करतो, त्यालाच या व्यवहाराचा मोबदला दिला जातो आणि व्यवहार न पाळणाऱ्यांबाबत मतदार घरातच बसून राहातो? अर्थात बिहारचे सारेच न्यारे असते असे किमान याबाबतीत तरी म्हणून चालणार नाही. महाराष्ट्रात अद्याप कोणी तसे सर्वेक्षण केले नाही म्हणून. अन्यथा महाराष्ट्रातली स्थितीदेखील फार वेगळी असेल असे मानायचे कारण नाही. राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी मध्यंतरी जाहीर भाषणात राज्यातल्या मतदान भ्रष्टाचाराचे काही किस्से ऐकविले होते. राज्यात असा भ्रष्टाचार व्यक्तिगत पातळीवर तर होतोच होतो, शिवाय सामूहिक पातळीवरही होत असतो. गावातले मारुती मंदीर बांधून देण्यापासून तो सोसायटीच्या इमारतीला रंग लावून देण्यापर्यंत अशा व्यवहाराची ‘रेंज’ असते. अर्थात यात मतदारांची मानसिकता आता अशी तयार झाली आहे की, निवडून येणारा नगरसेवक, आमदार वा खासदार निवडून गेल्यावर एक तर आपल्याला साधी ओळखही देणार नाही आणि भ्रष्टाचार करणे सोडणार नाही मग आम्ही आमचे मत त्याला फुकाफुकी का म्हणून द्यावे? मुंबई महापालिकेची निवडणूक आता येऊ घातली आहे. जरी तिथेही असे सर्वेक्षण करुन पाहायला काय हरकत आहे?