शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

‘नोट दो, व्होट लो’

By admin | Updated: October 8, 2015 04:35 IST

भारतातील लोकशाही खरोखरी दिवसागणिक अधिकाधिक सुदृढ, परिपक्व आणि विशेषत: अधिकच ‘पारदर्शी’ होऊ लागली आहे! संसदीय, विधिमंडळीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

भारतातील लोकशाही खरोखरी दिवसागणिक अधिकाधिक सुदृढ, परिपक्व आणि विशेषत: अधिकच ‘पारदर्शी’ होऊ लागली आहे! संसदीय, विधिमंडळीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारातील लोकशाहीचा मूळारंभ म्हणजे निवडणूक आणि निवडणुकीतील मतदान. या शब्दातच ‘दान’ आहे, जे विनामोबदलाच दिले जावे, अशी समजूत आहे. पण आता या जुनाट समजुतीला काहीही अर्थ नाही असे मनोमन ठरवून की काय, बिहारातील तब्बल ८० टक्के मतदारांना मोबदला घेतल्याशिवाय मत देण्यात काहीही गैर वाटत नाही. किंबहुना त्यांचा याला पूर्ण व कदाचित सक्रीय पाठिंबा आहे. मतदान प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने पार पडावी, मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, या प्रक्रियेतील भ्रष्टाचार निपटून काढता आला तर तसा प्रयत्न करुन पाहावा म्हणून बिहारच्या मुख्य निर्वाचन आयुक्तांनी एक जोरदार मोहीम सध्या तिथे सुरु केली आहे. याच मोहिमेंतर्गत एक मतदार सर्वेक्षण हाती घेतले गेले आणि त्यामधून वरील निष्कर्ष समोर आला. ‘नोट दो, व्होट लो’ हा साधा सरळ व्यवहार आहे आणि त्यात काहीही गैर नाही असे किमान ८० टक्के मतदारांना तरी वाटते. विशेष म्हणजे सर्वेक्षणासाठी ज्या मतदारांकडे विचारणा केली, त्यात गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित आणि महिला-पुरुष असे सारेच होते. निर्वाचन आयुक्तालयाला या निष्कर्षापायी मोठा धक्का म्हणे बसला आहे. त्यामुळे ‘मतदान आवर्जून करा, पण त्यासाठी पैसे वा भेटवस्तू स्वीकारु नका’, असा प्रचार तिथे आयुक्तालयाच्या वतीने सुरु केला गेला आहे. त्या राज्यातील मतदानाची सरासरी नेहमी ५५ टक्क््यांच्या आतलीच असते. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीच काय ती या आकडेवारीने सुमारे सव्वा टक्क््याची वाढ दाखविली. याचा एक अर्थ असा तर नव्हे की, जो उमेदवार किंवा जो पक्ष ‘व्यवहार’ पूर्ण करतो, त्यालाच या व्यवहाराचा मोबदला दिला जातो आणि व्यवहार न पाळणाऱ्यांबाबत मतदार घरातच बसून राहातो? अर्थात बिहारचे सारेच न्यारे असते असे किमान याबाबतीत तरी म्हणून चालणार नाही. महाराष्ट्रात अद्याप कोणी तसे सर्वेक्षण केले नाही म्हणून. अन्यथा महाराष्ट्रातली स्थितीदेखील फार वेगळी असेल असे मानायचे कारण नाही. राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी मध्यंतरी जाहीर भाषणात राज्यातल्या मतदान भ्रष्टाचाराचे काही किस्से ऐकविले होते. राज्यात असा भ्रष्टाचार व्यक्तिगत पातळीवर तर होतोच होतो, शिवाय सामूहिक पातळीवरही होत असतो. गावातले मारुती मंदीर बांधून देण्यापासून तो सोसायटीच्या इमारतीला रंग लावून देण्यापर्यंत अशा व्यवहाराची ‘रेंज’ असते. अर्थात यात मतदारांची मानसिकता आता अशी तयार झाली आहे की, निवडून येणारा नगरसेवक, आमदार वा खासदार निवडून गेल्यावर एक तर आपल्याला साधी ओळखही देणार नाही आणि भ्रष्टाचार करणे सोडणार नाही मग आम्ही आमचे मत त्याला फुकाफुकी का म्हणून द्यावे? मुंबई महापालिकेची निवडणूक आता येऊ घातली आहे. जरी तिथेही असे सर्वेक्षण करुन पाहायला काय हरकत आहे?