शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

पर्यटनस्थळ नव्हे!

By admin | Updated: July 19, 2015 22:47 IST

नाशिक जिल्ह्याच्या पेठ या आदिवासी तालुक्यातील हरसूल या गावाची रचना आणि तेथील निसर्ग पाहू जाता, ते एक अत्यंत आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकते.

नाशिक जिल्ह्याच्या पेठ या आदिवासी तालुक्यातील हरसूल या गावाची रचना आणि तेथील निसर्ग पाहू जाता, ते एक अत्यंत आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकते. पण आजवर तशी कोणतीही दखल न घेणारे अनेक सरकारी अंमलदार सध्या मात्र या ‘पर्यटनस्थळाकडे’ धाव घेत असून, गेल्या आठवडाभरापासून त्या गावाचे जे धुमसणे सुरू आहे, त्याची म्हणे सहानुभूतीने चौकशी आणि पाहणी करीत आहेत. परंतु ते करीत बसण्यापेक्षा त्यांनी संबंधित पोलीस यंत्रणेला कामाला लावले आणि काम करूही दिले तर आणि तरच या धुमसण्याचा अंत होऊ शकतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हरसूलचा पेच किंवा दंगा जातीय नसून आदिवासी विरुद्ध पोलीस असा आहे. मुळात आदिवासी जमातीइतकी गरीब, पापभीरू आणि कोणाच्याही अध्यातमध्यात न पडणारी दुसरी कोणतीही जमात नाही. असे असताना, हा समाज इतका का संतापून उठतो, हे न्यायालयीन चौकशांमधून लक्षात येणारे नाही. एका आदिवासी युवकाची हत्त्या झाली पण त्याच्या हत्त्येकऱ्यांना स्थानिक पोलीस संरक्षण देत आहेत, असा समस्त गावकऱ्यांचा वहीम वा संशय आहे. सदरची हत्त्या होताना पाहणारे आणि हत्त्या करणाऱ्यांना ओळखणारे काही लोक त्याच गावात आहेत, असे सांगितले जाते. पण ही बाजू लक्षात न घेता, पोलिसांनी तपास कार्यातही हलगर्जी केली असे लोक उघड बोलू लागले आहेत. याच लोकांच्या संतापाचा गेल्या आठवड्यात उद्रेक झाला आणि संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांवर हल्ला केला. संतापलेल्या जमावावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी जो गोळीबार केला, त्यातही एक आदिवासी युवकच मारला गेला. साहजिकच राज्याच्या विधिमंडळात त्याचे पडसाद उमटले आणि ठोकळेबाज पद्धतीने न्यायालयीन चौकशीची मागणी केली गेली. ही न्यायालयीन चौकशी कशाची; गोळीबाराची, बंदच्या दिवशी झालेल्या लुटालुटीची की दंगलीची? मुळात हे तिन्ही प्रकार प्रतिक्रियेच्या रूपात घडले गेले आहेत. लोकांना अपेक्षा आहे ती, भगीरथ तुळशीराम चौधरी या बावीस वर्षीय तरुणाची जी हत्त्या केली गेली, त्या हत्त्येचा नीट तपास करण्याची व हत्त्येकऱ्यांना जेरबंद करण्याची. पण तिकडे कोणाचेच लक्ष दिसत नाही. त्यामुळे जोवर हे सारे घडून येत नाही तोवर हरसूल पहिल्यासारखे शांत आणि निवांत होणे, एकूण कठीणच आहे.