शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

पर्यटनस्थळ नव्हे!

By admin | Updated: July 19, 2015 22:47 IST

नाशिक जिल्ह्याच्या पेठ या आदिवासी तालुक्यातील हरसूल या गावाची रचना आणि तेथील निसर्ग पाहू जाता, ते एक अत्यंत आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकते.

नाशिक जिल्ह्याच्या पेठ या आदिवासी तालुक्यातील हरसूल या गावाची रचना आणि तेथील निसर्ग पाहू जाता, ते एक अत्यंत आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकते. पण आजवर तशी कोणतीही दखल न घेणारे अनेक सरकारी अंमलदार सध्या मात्र या ‘पर्यटनस्थळाकडे’ धाव घेत असून, गेल्या आठवडाभरापासून त्या गावाचे जे धुमसणे सुरू आहे, त्याची म्हणे सहानुभूतीने चौकशी आणि पाहणी करीत आहेत. परंतु ते करीत बसण्यापेक्षा त्यांनी संबंधित पोलीस यंत्रणेला कामाला लावले आणि काम करूही दिले तर आणि तरच या धुमसण्याचा अंत होऊ शकतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हरसूलचा पेच किंवा दंगा जातीय नसून आदिवासी विरुद्ध पोलीस असा आहे. मुळात आदिवासी जमातीइतकी गरीब, पापभीरू आणि कोणाच्याही अध्यातमध्यात न पडणारी दुसरी कोणतीही जमात नाही. असे असताना, हा समाज इतका का संतापून उठतो, हे न्यायालयीन चौकशांमधून लक्षात येणारे नाही. एका आदिवासी युवकाची हत्त्या झाली पण त्याच्या हत्त्येकऱ्यांना स्थानिक पोलीस संरक्षण देत आहेत, असा समस्त गावकऱ्यांचा वहीम वा संशय आहे. सदरची हत्त्या होताना पाहणारे आणि हत्त्या करणाऱ्यांना ओळखणारे काही लोक त्याच गावात आहेत, असे सांगितले जाते. पण ही बाजू लक्षात न घेता, पोलिसांनी तपास कार्यातही हलगर्जी केली असे लोक उघड बोलू लागले आहेत. याच लोकांच्या संतापाचा गेल्या आठवड्यात उद्रेक झाला आणि संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांवर हल्ला केला. संतापलेल्या जमावावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी जो गोळीबार केला, त्यातही एक आदिवासी युवकच मारला गेला. साहजिकच राज्याच्या विधिमंडळात त्याचे पडसाद उमटले आणि ठोकळेबाज पद्धतीने न्यायालयीन चौकशीची मागणी केली गेली. ही न्यायालयीन चौकशी कशाची; गोळीबाराची, बंदच्या दिवशी झालेल्या लुटालुटीची की दंगलीची? मुळात हे तिन्ही प्रकार प्रतिक्रियेच्या रूपात घडले गेले आहेत. लोकांना अपेक्षा आहे ती, भगीरथ तुळशीराम चौधरी या बावीस वर्षीय तरुणाची जी हत्त्या केली गेली, त्या हत्त्येचा नीट तपास करण्याची व हत्त्येकऱ्यांना जेरबंद करण्याची. पण तिकडे कोणाचेच लक्ष दिसत नाही. त्यामुळे जोवर हे सारे घडून येत नाही तोवर हरसूल पहिल्यासारखे शांत आणि निवांत होणे, एकूण कठीणच आहे.