शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनस्थळ नव्हे!

By admin | Updated: July 19, 2015 22:47 IST

नाशिक जिल्ह्याच्या पेठ या आदिवासी तालुक्यातील हरसूल या गावाची रचना आणि तेथील निसर्ग पाहू जाता, ते एक अत्यंत आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकते.

नाशिक जिल्ह्याच्या पेठ या आदिवासी तालुक्यातील हरसूल या गावाची रचना आणि तेथील निसर्ग पाहू जाता, ते एक अत्यंत आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकते. पण आजवर तशी कोणतीही दखल न घेणारे अनेक सरकारी अंमलदार सध्या मात्र या ‘पर्यटनस्थळाकडे’ धाव घेत असून, गेल्या आठवडाभरापासून त्या गावाचे जे धुमसणे सुरू आहे, त्याची म्हणे सहानुभूतीने चौकशी आणि पाहणी करीत आहेत. परंतु ते करीत बसण्यापेक्षा त्यांनी संबंधित पोलीस यंत्रणेला कामाला लावले आणि काम करूही दिले तर आणि तरच या धुमसण्याचा अंत होऊ शकतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हरसूलचा पेच किंवा दंगा जातीय नसून आदिवासी विरुद्ध पोलीस असा आहे. मुळात आदिवासी जमातीइतकी गरीब, पापभीरू आणि कोणाच्याही अध्यातमध्यात न पडणारी दुसरी कोणतीही जमात नाही. असे असताना, हा समाज इतका का संतापून उठतो, हे न्यायालयीन चौकशांमधून लक्षात येणारे नाही. एका आदिवासी युवकाची हत्त्या झाली पण त्याच्या हत्त्येकऱ्यांना स्थानिक पोलीस संरक्षण देत आहेत, असा समस्त गावकऱ्यांचा वहीम वा संशय आहे. सदरची हत्त्या होताना पाहणारे आणि हत्त्या करणाऱ्यांना ओळखणारे काही लोक त्याच गावात आहेत, असे सांगितले जाते. पण ही बाजू लक्षात न घेता, पोलिसांनी तपास कार्यातही हलगर्जी केली असे लोक उघड बोलू लागले आहेत. याच लोकांच्या संतापाचा गेल्या आठवड्यात उद्रेक झाला आणि संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांवर हल्ला केला. संतापलेल्या जमावावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी जो गोळीबार केला, त्यातही एक आदिवासी युवकच मारला गेला. साहजिकच राज्याच्या विधिमंडळात त्याचे पडसाद उमटले आणि ठोकळेबाज पद्धतीने न्यायालयीन चौकशीची मागणी केली गेली. ही न्यायालयीन चौकशी कशाची; गोळीबाराची, बंदच्या दिवशी झालेल्या लुटालुटीची की दंगलीची? मुळात हे तिन्ही प्रकार प्रतिक्रियेच्या रूपात घडले गेले आहेत. लोकांना अपेक्षा आहे ती, भगीरथ तुळशीराम चौधरी या बावीस वर्षीय तरुणाची जी हत्त्या केली गेली, त्या हत्त्येचा नीट तपास करण्याची व हत्त्येकऱ्यांना जेरबंद करण्याची. पण तिकडे कोणाचेच लक्ष दिसत नाही. त्यामुळे जोवर हे सारे घडून येत नाही तोवर हरसूल पहिल्यासारखे शांत आणि निवांत होणे, एकूण कठीणच आहे.