शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

ही सहिष्णुता नव्हे?

By admin | Updated: December 6, 2015 22:21 IST

श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाही पुरीच्या पुजाऱ्यांनी त्यांना (एका पारशी व्यक्तीशी लग्न केले म्हणून) जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात प्रवेश नाकारला.

श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाही पुरीच्या पुजाऱ्यांनी त्यांना (एका पारशी व्यक्तीशी लग्न केले म्हणून) जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात प्रवेश नाकारला. पद पंतप्रधानाचे आणि व्यक्ती इंदिरा गांधींसारखी, पण त्यांनी परंपरेला आव्हान दिले नाही. रस्त्यावर उभे राहूनच जगन्नाथाचे दर्शन घेतले. तसेही कळसास नमस्कार केला तरी तो देवाला पावतो अशी हिन्दू धर्मातील मान्यता आहेच. विख्यात गायक येसूदास ख्रिश्चन असल्याने केरळातील गुरुवायूर मंदिरात त्याला प्रवेश नाकारला तेव्हा मंदिराच्या कुंपणापलीकडून का होईना त्याने आपली गानसेवा बजावली. पण परंपरेचा अनादर केला नाही. शिखांच्या कोणत्याही गुरुद्वाऱ्यात जायचे तर ‘नंगे सर’ न जाण्याची परंपरा आहे. तिलादेखील आजवर कोणत्याही कथित पुरोगाम्याने आव्हान देण्याची हिंमत दाखविलेली नाही. मग शनि शिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना असलेल्या प्रवेशबंदीलाही परंपरा मानून तिचा आदर करणे म्हणजे महिलांचा अपमान नव्हे असे विधान पंकजा मुंडे यांनी केले तर त्यांच्यावर स्वत:स पुरोगामी म्हणविणाऱ्यांनी इतके तुटून पडायचे कारण काय? सध्या ज्या विषयाची देशभर चर्चा सुरू आहे त्या सहिष्णुता आणि असहिष्णुता यांचा याच संदर्भात विचार करायचा झाला तर इंदिराजी, येसूदास आणि आता पंकजा मुंडे यांनी केलेले वर्तन हेच खरे सहिष्णुतेचे द्योतक ठरत नाही काय? ग्रामीण भागातल्यासारखे बोलायचे तर कोणताही देव कोणत्याही भक्ताला ‘कार्ड पाठवून’ बोलावणे धाडीत नसतो. लोक आपणहून जातात आणि एखाद्या मंदिरात अर्धनग्न जाण्याची किंवा ओलेत्याने जाण्याची परंपरा असेल तर तिचे निमूट पालन करतात. आव्हान देण्याचा प्रयत्न करीत नाहीत. जशी ही एक भूमिका तशीच दुसरी भूमिका म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाचे किंवा नाशकातील काळ्या रामाचे दर्शन घेण्यास अवर्णांना मज्जाव करण्याच्या भूमिकेविरुद्ध साने गुरुजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आंदोलन करून तत्कालीन अवर्णांना प्रवेश मिळवून दिला. एरवी सारे भारतीय इंग्रजांच्या रूढीप्रियतेचे आणि परंपरांच्या पालनाचे कौतुक करीत असतात. तसे कौतुक करीत न बसता व्यक्तिगत पातळीवर पंकजा मुंडे आणि त्यांच्याही आधी काहींनी परंपरांचे पालन करण्याचे पत्करले असेल तर त्यांच्या भूमिकेचेही स्वागत करणे हीच खरी सहिष्णुता ठरावयास हवी. पण तसे न होता पंकजा यांना पुरोगामी जे दूषण बहाल करीत आहेत, तेच दूषण श्रीमती गांधींना बहाल करून त्यांनीदेखील अधोगाम्यांचे हात बळकट करण्याची कृती केली असेच म्हणावे लागेल. पंकजांना विरोध करण्यासाठी माध्यमांनी शिर्डीत पोहोचलेल्या हेमामालिनी यांना बोलते केले खरे, पण आपल्या शिर्डी यात्रेत हेमामालिनी यांनी ‘बाबाच्या धुनी’चे दर्शन घेतले वा नाही याचा काही उलगडा केला गेला नाही. कारण तिथे आजही महिलांना मज्जावच आहे.