शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

ही सहिष्णुता नव्हे?

By admin | Updated: December 6, 2015 22:21 IST

श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाही पुरीच्या पुजाऱ्यांनी त्यांना (एका पारशी व्यक्तीशी लग्न केले म्हणून) जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात प्रवेश नाकारला.

श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाही पुरीच्या पुजाऱ्यांनी त्यांना (एका पारशी व्यक्तीशी लग्न केले म्हणून) जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात प्रवेश नाकारला. पद पंतप्रधानाचे आणि व्यक्ती इंदिरा गांधींसारखी, पण त्यांनी परंपरेला आव्हान दिले नाही. रस्त्यावर उभे राहूनच जगन्नाथाचे दर्शन घेतले. तसेही कळसास नमस्कार केला तरी तो देवाला पावतो अशी हिन्दू धर्मातील मान्यता आहेच. विख्यात गायक येसूदास ख्रिश्चन असल्याने केरळातील गुरुवायूर मंदिरात त्याला प्रवेश नाकारला तेव्हा मंदिराच्या कुंपणापलीकडून का होईना त्याने आपली गानसेवा बजावली. पण परंपरेचा अनादर केला नाही. शिखांच्या कोणत्याही गुरुद्वाऱ्यात जायचे तर ‘नंगे सर’ न जाण्याची परंपरा आहे. तिलादेखील आजवर कोणत्याही कथित पुरोगाम्याने आव्हान देण्याची हिंमत दाखविलेली नाही. मग शनि शिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना असलेल्या प्रवेशबंदीलाही परंपरा मानून तिचा आदर करणे म्हणजे महिलांचा अपमान नव्हे असे विधान पंकजा मुंडे यांनी केले तर त्यांच्यावर स्वत:स पुरोगामी म्हणविणाऱ्यांनी इतके तुटून पडायचे कारण काय? सध्या ज्या विषयाची देशभर चर्चा सुरू आहे त्या सहिष्णुता आणि असहिष्णुता यांचा याच संदर्भात विचार करायचा झाला तर इंदिराजी, येसूदास आणि आता पंकजा मुंडे यांनी केलेले वर्तन हेच खरे सहिष्णुतेचे द्योतक ठरत नाही काय? ग्रामीण भागातल्यासारखे बोलायचे तर कोणताही देव कोणत्याही भक्ताला ‘कार्ड पाठवून’ बोलावणे धाडीत नसतो. लोक आपणहून जातात आणि एखाद्या मंदिरात अर्धनग्न जाण्याची किंवा ओलेत्याने जाण्याची परंपरा असेल तर तिचे निमूट पालन करतात. आव्हान देण्याचा प्रयत्न करीत नाहीत. जशी ही एक भूमिका तशीच दुसरी भूमिका म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाचे किंवा नाशकातील काळ्या रामाचे दर्शन घेण्यास अवर्णांना मज्जाव करण्याच्या भूमिकेविरुद्ध साने गुरुजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आंदोलन करून तत्कालीन अवर्णांना प्रवेश मिळवून दिला. एरवी सारे भारतीय इंग्रजांच्या रूढीप्रियतेचे आणि परंपरांच्या पालनाचे कौतुक करीत असतात. तसे कौतुक करीत न बसता व्यक्तिगत पातळीवर पंकजा मुंडे आणि त्यांच्याही आधी काहींनी परंपरांचे पालन करण्याचे पत्करले असेल तर त्यांच्या भूमिकेचेही स्वागत करणे हीच खरी सहिष्णुता ठरावयास हवी. पण तसे न होता पंकजा यांना पुरोगामी जे दूषण बहाल करीत आहेत, तेच दूषण श्रीमती गांधींना बहाल करून त्यांनीदेखील अधोगाम्यांचे हात बळकट करण्याची कृती केली असेच म्हणावे लागेल. पंकजांना विरोध करण्यासाठी माध्यमांनी शिर्डीत पोहोचलेल्या हेमामालिनी यांना बोलते केले खरे, पण आपल्या शिर्डी यात्रेत हेमामालिनी यांनी ‘बाबाच्या धुनी’चे दर्शन घेतले वा नाही याचा काही उलगडा केला गेला नाही. कारण तिथे आजही महिलांना मज्जावच आहे.