शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

हा व्यवस्थेवरील राग तर नव्हे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 08:15 IST

नंदुरबार आणि धुळ्यातील दोन घटनांनी ही शहरे हादरली. पण त्यानंतर उमटलेले पडसाद हे महाराष्ट्रासारखे विवेकी राज्य कोणत्या वळणावर जात आहे, याचे भयसूचक चिन्ह आहे.

- मिलिंद कुलकर्णी

नंदुरबार आणि धुळ्यातील दोन घटनांनी ही शहरे हादरली. पण त्यानंतर उमटलेले पडसाद हे महाराष्ट्रासारखे विवेकी राज्य कोणत्या वळणावर जात आहे, याचे भयसूचक चिन्ह आहे.

दोन्ही शहरांमध्ये पूर्ववैमनस्यावरुन दोन तरुणांचे खून झाले. तरुणांच्या खुनानंतर स्वाभाविकपणे त्या शहरात, परिसरात भीतीदायक वातावरण तयार होते. आरोपींच्या अटकेची मागणी होते. त्यांना अटक केल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी कुटुंबियांची भूमिका असते. पोलीस प्रशासन समजूत घालून या प्रसंगाला सामोरे जातात. परंतु या दोन घटनांमध्ये खून झालेला तरुण आणि आरोपी यांच्या जातींचा जाहीरपणे उच्चार झाला. आरोपींच्या वस्ती, घरांवर त्याच रात्री हल्ले झाले. दिवसा रस्ता रोको, बसवर दगडफेक असे प्रकार घडले. पोलीस दलाला बळाचा वापर करावा लागला.

पूर्ववैमनस्य हे कारण समोर आले असल्याने तरुणांचा आपापसातील संवाद, मतभेद, भांडण हे टोकाला गेल्याने खुनाची घटना घडली, असा प्राथमिक निष्कर्ष काढता येतो. वाद कोणातही होऊ शकतो, त्याला जात, धर्म असे कारण असतेच असे नाही. एका जातीतील, कुटुंबातील व्यक्तींमध्ये हिंसक कृत्ये घडल्याची उदाहरणे कमी नाहीत. गुन्हा दाखल होणे, आरोपींना अटक होणे, न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणे, खटला चालणे, न्यायालयाचा निकाल येणे, निकालाविरुध्द वरिष्ठ न्यायालयात दाद मागणे अशी कायदेशीर प्रक्रिया आहे. पण या व्यवस्थेला आव्हान देत ‘खून का बदला खून’ असा प्रकार जर वाढू लागला तर अराजक माजायला वेळ लागणार नाही.कायदेशीर प्रक्रिया, व्यवस्थांवरील विश्वास का कमी होत आहे, त्यावर राग का व्यक्त होत आहे, याचा सरकार, प्रशासन आणि समाज या तिन्ही घटकांनी गांभीर्याने विचार करायला हवा.

दिल्लीतील निर्भया, कोपर्डीतील पीडिता यांच्यावरील अत्याचारानंतर संपूर्ण समाजाने त्याविरोधात आवाज उठविला होता. शासन-प्रशासनाला दखल घेऊन तातडीने कारवाई करावी लागली होती. सामाजिक असंतोषाची ही ठिणगी प्रशासनाला ताळ्यावर आणायला पुरेशी ठरली.परंतु थेट कायदा हातात घेण्याची प्रवृत्ती ही अराजकतेला आमंत्रण देणारी ठरु शकते. आरोपीला कायदा कठोर शिक्षा देईल, असा विश्वास निर्माण करणारी व्यवस्था मजबूत झाली, त र अशी भावना समाजघटकांमध्ये निर्माण होणार नाही. नंदुरबार आणि धुळ्यातील घटनेत एका मागणीकडे लक्ष वेधायला हवे. आरोपींच्या नातेवाईकांना तपास कार्यातून दूर करा, अशी मागणी खून झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांनी केली आहे. ही मागणी गंभीर आहे. एकंदर तपासकार्याविषयी अविश्वास निर्माण करणारी आहे. निष्पक्ष आणि विश्वासार्ह तपास होण्याची नितांत गरज आहे, तरच व्यवस्थेवरील विश्वासार्हता टिकून राहणार आहे.

महाराष्ट्र हे विचारशील, विवेकशील राज्य आहे. अनेक थोरामोठ्यांनी समाजाची प्रगतशील दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या आदर्श विचारांचे पाईक होण्याऐवजी आम्ही कोणत्या प्रवृत्तींच्या आहारी जात आहोत, याचा गांभीर्याने विचार करायला हवा.