शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
3
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
4
तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
5
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
6
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
7
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
8
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
9
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
10
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
11
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
12
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
13
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
14
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू
15
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
16
आंध्र प्रदेशात देवरगट्टू बन्नी उत्सवादरम्यान दोन जणांचा मृत्यू, ९० जण जखमी
17
Video: छातीत झाडल्या तीन गोळ्या, मित्राच्या हत्येचा बनवला व्हिडीओ; पोलिसांची उडाली झोप
18
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
19
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
20
Neena Kulkarni: ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचे विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

‘नटसम्राट’ क्लासिक असणे-नसणे महत्त्वाचे आहे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 23:36 IST

‘ज्ञानपीठ’कार भालचंद्र नेमाडे यांनीही यापूर्वी कुसुमाग्रजांविषयी आपली मते प्रदर्शित केली होती. परंतु, याच नेमाडे यांनी नंतर कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘जनस्थान’ पुरस्कार स्वीकारताना तात्यासाहेबांबद्दल गौरवोद्गार काढले होते.

- धनंजय वाखारे‘ज्ञानपीठ’कार भालचंद्र नेमाडे यांनीही यापूर्वी कुसुमाग्रजांविषयी आपली मते प्रदर्शित केली होती. परंतु, याच नेमाडे यांनी नंतर कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘जनस्थान’ पुरस्कार स्वीकारताना तात्यासाहेबांबद्दल गौरवोद्गार काढले होते. अमोल पालेकर यांना मत मांडण्याचे स्वातंत्र्य जरूर आहे परंतु, व्यासपीठाचे भान ठेवायला नको का ?‘नटसम्राट या कलाकृतीला मी क्लासिक मानायला तयार नाही. यात नटाची शोकांतिका नाही तर अडगळीच्या खोलीत पाठवल्या गेलेल्या वयस्कर माणसाची ही कथा आहे. यातील स्वगते एकाच पठडीत म्हणावी लागतात. त्यामुळे ती या नाटकाची बलस्थाने नसून कमकुवतपणा आहे’, असे विधान ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी नाशिक येथे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणारा ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार स्वीकारताना केले. पालेकरांनीच सांगितल्यानुसार, त्यांचे हे मत त्यांनी खुद्द तात्यासाहेबांनाच ऐकविले होते आणि ‘तुम्ही माझ्या शब्दांवर एवढा लोभ आणि विचार करता, तेव्हा तुमचा विचार नाकारता कसा येईल’, असा विनम्रभाव तात्यासाहेबांनी त्यावेळी व्यक्त केला होता. पालेकरांनी आपले हेच मत तात्यांच्या गावात येऊन त्यांच्यावर प्रेम करणाºया नाशिककरांपुढे पुन्हा एकदा ऐकविण्याचे धारिष्ट केले. ‘नटसम्राट’ हे नाटक क्लासिक आहे किंवा नाही, हा मुद्दा वेगळा परंतु, या नाटकाने गेल्या पाच दशकात मराठीच नव्हे तर अन्य भाषिक रंगभूमीवर जे गारुड केले आहे, ते पालेकर कसे नाकारू शकतील?. वि.वा. शिरवाडकर तथा तात्यासाहेबांचे हे नाटक रंगभूमीवर येऊन आता ४८ वर्षांचा कालावधी लोटला आहे. मराठी रंगभूमीवर लोकप्रियतेचा उच्चांक गाठणारी ही एक अजरामर कलाकृती ठरली. त्यामुळे ‘नटसम्राट’ या कलाकृतीत क्लासिकची क्षमता आहे किंवा नाही, तसेच त्याच्या कमकुवतपणाची चिकित्सा करण्याची ही वेळ आहे काय, याचे भान कुसुमाग्रजांचा प्रसाद स्वीकारताना तरी पालेकर यांनी ठेवणे गरजेचे होते.कोणतीही कलाकृती ही ‘क्लासिक’ म्हणून जन्माला येतच नाही. लोकांच्या मनात ती रुजते, वाढते आणि शिखरावर जाऊन पोहोचते, तेव्हा तिला अभिजाततेचा दर्जा प्राप्त होत जातो. ‘नटसम्राट’ हे नाटक ज्या काळात आले, तेव्हा ती त्या समाजाची गरज होती. शहरी कुटुंबीयात घडलेली ही कथा ग्रामीण भागातील खेडोपाडीही जाऊन लोकांना ती आपली वाटायला लागली. विलक्षण लालित्यपूर्ण, काव्यात्म भाषेतील ही कलाकृती आजही रंगभूमीवर साकारताना नटांना आव्हानात्मक वाटते. याच कलाकृतीवर चित्रपट तयार होतो आणि आजची पिढीही त्याला डोक्यावर घेते. ‘नटसम्राट’ नाटकाने मराठी रंगभूमीला श्रीराम लागू, दत्ता भटसारखे ताकदीचे नट दिले. या नाटकातील गणपतरावाच्या भूमिकेला न्याय देताना आपण रिते झालो, अशी भावना नाशिकमध्येच अभिनेता नाना पाटेकर यांनी व्यक्त केली होती. काळ बदलला की त्या-त्या घटनेकडे पाहण्याची दृष्टी बदलते. कदाचित, ‘नटसम्राट’ ही कलाकृती आजच्या काळात लिहिली गेली असती आणि रंगभूमीवर आली असती, तर तिला कितपत प्रतिसाद मिळाला असता, याबाबत साशंकता आहे. परंतु, आजच्या घडीला ती क्लासिक कलाकृती म्हणून लोकांच्या काळजात ठसलेली आहे आणि हे सत्य कुणीही नाकारू नये. अमोल पालेकर हे चित्रपटसृष्टीत एक चळवळीचे नाव आहे आणि आदरस्थानही आहे. ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांनी तात्यांविषयी, त्यांच्या प्रतिष्ठानविषयी, त्यांच्या नाटकांविषयी जे काही भाष्य केले, ते पाहता पालेकरांकडून होणारे कौतुकही नाशिककरांना खोटे वाटायला लागले असेल. माणसांच्या मनात घट्टपणे रुजलेल्या श्रद्धास्थानांना हात घालायचा आणि प्रसिद्धीचा झोत आपल्याकडे वळवायचा, अशी टूमच हल्ली फोफावत चाललेली आहे.