शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

हेल्मेट ओझे नव्हे, आवश्यक स्वसंरक्षण!

By admin | Updated: February 11, 2016 03:54 IST

सध्या हेल्मेट सक्तीला होणारा विरोध वृत्तपत्रात येणाऱ्या लेखांवरून व वाचकांच्या प्रतिक्रियांवरून स्पष्ट होतो. परंतु हा विरोध संभाव्य अडचणींचा कल्पनाविलास आहे, असे म्हणावेसे वाटते.

- दिलीप श्रीधर भट(मुक्त लेखक)सध्या हेल्मेट सक्तीला होणारा विरोध वृत्तपत्रात येणाऱ्या लेखांवरून व वाचकांच्या प्रतिक्रियांवरून स्पष्ट होतो. परंतु हा विरोध संभाव्य अडचणींचा कल्पनाविलास आहे, असे म्हणावेसे वाटते. संपूर्ण जगात व भारतातील काही राज्यात हेल्मेट वापरणे अनिवार्य आहे. हेल्मेट वापरण्याची सक्ती सरकारला करावी लागते याचे कारण, हेल्मेटमुळे होणारे संरक्षण जनतेला माहीत असूनही ते वापरत नाहीत. महाराष्ट्रात दरवर्षी हेल्मेट न वापरल्याने (दुचाकी चालक) डोक्याला गंभीर दुखापत होऊन अंदाजे दीड ते दोन हजार जण मरत पावतात. हे प्रमाण हेल्मेट वापरले गेले नाही तर वाढतच जाणार आहे.दुचाकी गाड्या वेगवान, चालकाला सोयीच्या व सुटसुटीत असतात. त्यावर बसल्यावर चालकाला अधिक गतीने चालवण्याचा मोह होतो. जेव्हा अपघात घडतो तेव्हा चालक एकदम फेकला जातो. माणसाच्या शरीरात डोके जड असल्यामुळे ते जमिनीवरती वेगाने आदळते. डोके फुटून मेंदूला धोका पोहोचतो. मेंदूच्या रक्तवाहिन्या तुटतात. नाका-कानातून रक्तस्त्राव सुरू होतो व चालक तत्काळ मरण पावतो. चुकून वाचला तर त्याला विस्मरण होते, कमी ऐकू येते. स्वत:ला सरळ न उभे राहता येणे, कशाचा तरी आधार घेऊन चालणे व चालताना तोल जाणे इत्यादी व्याधी निर्माण होऊन जन्मभर कायम राहतात.सध्या उपलब्ध असलेले हेल्मेट विचारपूर्वक विकसित केलेले आहे. ते फायबर ग्लासचे असते. फायबर ग्लासमध्ये कोणताही आघात सहन करण्याची शक्ती (क्षमता) असते. हेल्मेटची रचना गोल असल्यामुळे आघात झाला असताना तो घसरतो. या फायबर ग्लासच्या कवचाच्या (आवरणाच्या) आत पोकळी असते. ही पोकळी टाळूच्या वर येते. त्यामुळे मेंदूला धक्का बसत नाही. उष्णता, थंडी यापासून बचाव व्हावा म्हणून थर्माकोल, स्पंज यांचा योग्य ठिकाणी वापर केला जातो. यावर उभे-आडवे नायलॉनचे पट्टे असतात. या सर्वांवर उत्तम कापडाचे अस्तर लावून बंद करण्यात येते. त्यामुळे चालक दुचाकीवरून अपघाताने फेकला गेल्यास त्याच्या डोक्याला आणि मेंदूला धक्का बसत नाही आणि बसल्यास त्याची तीव्रता अत्यंत कमी असते. विकसित हेल्मेटमुळे अपघात होऊनही दुचाकीचालक जिवंत राहतो.हेल्मेट वापरल्यास स्पॉँडिलायटिस होतो, हे म्हणणे अशास्त्रीय आहे, असे अनेक अस्थिरोगतज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे. स्पॉँडिलायटिस मानेच्या व पाठीच्या कण्याच्या चुकीच्या हालचाली व बैठकीमुळे होतो. विकेटकीपरचे हेल्मेट सर्वसाधारण हेल्मेटपेक्षा अधिक वजनदार असते. तो ते हेल्मेट मॅचच्या वेळेस चार-पाच तास वापरतो. तरीसुद्धा त्याला स्पॉँडिलायटिस होत नाही. हेल्मेट वापरताना येणाऱ्या अडचणी यादेखील अशास्त्रीय व अव्यवहार्य आहेत. हेल्मेट वापरल्यावर आॅफिस, दुकान किंवा इतर ठिकाणी ते कसे सांभाळून ठेवावे, या प्रश्नाला उत्तर म्हणजे, पावसाळ्यात रेनकोट, छत्री जसे काळजीपूर्वक सांभाळले जाते तसे सांभाळावे. दुचाकीला हेल्मेट लॉक करून ठेवण्याची व्यवस्था करून ठेवली जाते. तशी करून घेतल्यास हेल्मेट सांभाळावे लागणार नाही. हेल्मेटमुळे ऊन लागत नाही व थंडी वाजत नाही. कारण, त्याची रचना तशी केली जाते.हेल्मेट नसताना दुचाकी गाडी घसरल्यास डोक्याला दुखापत होते. वळणावरती गाडी घसरल्यास दुखापत गंभीर स्वरूपात होते. दुचाकीची गती २० कि.मी. प्रति तास असेल व गाडीवरून चालक पडला तर त्यास होणारी दुखापत एका मजल्यावरून पडल्यावर होणाऱ्या दुखापतीएवढी असते. ३० कि.मी. प्रतितासावर अपघात झाल्यास डोके फुटते. ४० कि.मी. प्रतितासावर मेंदूला मोठा आघात व मान मोडून मृत्यू येतो. हेल्मेट वापरल्यास हे घडत नाही. जर महिलानी, मुलींनी हेल्मेट वापरले तर त्यांना अतिरेक्याप्रमाणे चेहरा झाकून घ्यावा लागणार नाही.बंदिस्त हेल्मेटमुळे हवा कमी मिळून गुदमरल्यासारखे होते हे म्हणणे बरोबर नाही. उच्छवासामुळे फक्त हवा कमी मिळून गुदमरल्यासारखे होते, हेही बरोबर नाही. कारण, हेल्मेटमध्ये व्हेंटिलेशनची व्यवस्था असते. हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या चालकांची संख्या स्वत:ला प्रगत (?) समजून घेणाऱ्या महाराष्ट्रात प्रचंड आहे. अशा चालकास दंड न करता पोलीस यंत्रणेने त्या चालकास हेल्मेटची अधिकृत पावती देऊन विकावे म्हणजे त्यावेळेपासून ती व्यक्ती हेल्मेट वापरणे सुरू करेल. ही पद्धत महाराष्ट्रात त्वरित सुरू होण्यासाठी योग्य ती पावले टाकणे आवश्यक आहे.आरटीओ व ट्रॅफिक पोलीस स्वत:च हेल्मेट वापरत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. जर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी हेल्मेट वापरणे सुरू केले तर त्याचा परिणाम जनतेवर होऊन प्रत्येक दुचाकीस्वार हेल्मेट वापरेल, असा संपूर्ण विश्वास आहे.दुचाकीच्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याचे छापून येते. पोलीस तसा पंचनामाही करतात. अपघाताच्या बातमीत दुचाकीस्वाराचे डोके फुटून मेंदू बाहेर आला होता, ते हेल्मेट वापरत नव्हते असे छापून आल्यास लाखो वाचकांचे डोळे उघडून ते ताबडतोब हेल्मेट विकत घेतील, असा विश्वास आहे आणि पोलीस पंचनाम्यातदेखील तसा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक झाले पाहिजे. अपघात झाल्यास हेल्मेट घालणाऱ्या दुचाकी चालकास, तसेच त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीच्या हाताची, पायाची, बरगडीची हाडे आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार साधली जाऊ शकतात, पण हेल्मेटमुळे त्यांच्या डोक्यावर गंभीर इजा, दुखापत होत नाही हे महत्त्वाचे आहे.हेल्मेट बनवणाऱ्या कंपन्यांकडे लाखो हेल्मेट गोदामात पडूत आहेत. त्यांचा खप व्हावा, हेल्मेटचा स्टॉक संपावा म्हणून सर्व कंपन्या शासनाला पटवत आहेत, अशा अर्थाचा अपप्रचारही केला गेला कारण तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी हेल्मेटचे महत्त्व व आवश्यकता जनतेस समजावी, पटावी म्हणून ‘रोड शो’ केला होता.दुचाकी वाहन चालकापाशी हेल्मेट नसल्यास त्यास मध्य प्रदेशात पेट्रोलपंपावर पेट्रोल देणे दिनांक १ फेब्रुवारी २०१६ पासून बंद झाले आहे.नागपूरला जुलै २००८ ला तत्कालीन पोलीस कमिशनर डॉ. सत्यपालसिंह (वर्तमान लोकसभा सदस्य) यांनी दुचाकी चालकांसाठी हेल्मेट वापरणे अनिवार्य केले होते. काही महिन्यातच त्यांची पुण्यात बदली करण्यात आली. अशा पद्धतीचे प्रकार अनेकदा झाले आहेत. त्यामुळे हेल्मेट विरोधी राजकीय लॉबी आहे व ती सक्रीय आहे, हे उघड गुपित आहे. हेल्मेटची उपयुक्तता समजून न घेता, ती जाणून न घेता त्यास विरोध करणे, हा बौद्धिक आडमुठेपणा नाही का?