शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

गर्दीचे नव्हे, दर्दींचे जागतिक संमेलन : शोध मराठी मनाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:09 IST

पुण्यात १ ते ३ जानेवारीदरम्यान जागतिक मराठी परिषदेतर्फे आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ हे १५ वे जागतिक संमेलन उत्साहात पार पडले. त्याला राज्यभरातून रसिक उपस्थित होते. परदेशस्थ यशस्वी मराठी बांधवांच्या मार्गदर्शनातून मराठी तरुणांना निश्चितच प्रेरणा मिळाली.

- प्रज्ञा केळकर-सिंग

उद्योग-व्यवसायासह कला, साहित्य आणि संस्कृती अशा विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामगिरी करून जगभरात मराठीचा झेंडा फडकविणाºया कर्तृत्ववान मराठी बांधवांच्या उपस्थितीने ‘शोध मराठी मनाचा’ हे १५ वे जागतिक संमेलन गर्दीचे संमेलन न ठरता सर्वार्थाने ‘दर्दींचे’ संमेलन ठरले. जागतिक मराठी अकादमीतर्फे पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात आयोेजित हे संमेलन पुणेकरांसह राज्यभरातून आलेल्या रसिकांसाठी मार्गदर्शक ठरले. रंगतदार मुलाखती, प्रदर्शन आणि कविसंमेलनाने रसिकांसाठी नववर्षाची सुरेख सुरुवात झाली. जागतिक मराठी परिषदेतर्फे १९९४ मध्ये जागतिक मराठी अकादमीची स्थापना झाली. २००२ मध्ये माधव गडकरी यांनी या अकादमीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ज्येष्ठ कवी आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्याकडे सोपवली. २००४ साली ‘शोध मराठी मनाचा’ या नावाने पहिले जागतिक संमेलन नागपूर येथे पार पडले. त्यानंतर अहमदनगर, पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, गोवा, रत्नागिरी, सातारा अशा विविध ठिकाणी रसिकांचा संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १५ वे संमेलन पुण्यात आयोजित करण्यात आले.परदेशातील यशस्वी मराठी बांधवांना महाराष्ट्रात आणून त्यांचे मार्गदर्शन उपस्थितांना तरुणांना प्रेरणा देण्यात यशस्वी ठरले. मराठी तरुणांमध्ये हिंमत जागृत करून त्यांना जगाच्या पाठीवर सिद्ध करण्यासाठी हे संमेलन आयोजित केले जाते.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. रामदास फुटाणे आणि रेणुका देशकर यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीतून गडकरी यांच्या आयुष्यातील जगण्याच्या दिशा, परखड राजकीय विचार आणि वाटचाल, सामाजिक बांधिलकी, कौटुंबिक संवेदनशीलता असे नानाविध कंगोरे रसिकांना अनुभवता आले. ‘समुद्रापलीकडे’ या परिसंवादांतर्गत अमेरिका, दुबई, लंडन, कतार, आॅस्ट्रेलिया, थायलंड, फ्लोरिडा अशा विविध देशांमध्ये कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या मराठी बांधवांनी आपल्या जडणघडणीचे अनुभव कथन करत तरुणांना मार्गदर्शन केले.‘लक्ष्मीची पाऊले’ याद्वारे उद्योगपतींची जडणघडण ऐकायला मिळाली. दिवसेंदिवस समस्यांच्या गर्तेत अडकत चाललेल्या शेतकºयाला उभारी देण्याच्या दृष्टीने ‘बळीराजा... काल, आज आणि उद्या’ या परिसंवादाने मोलाची भूमिका बजावली. ‘वेगळ्या वाटा’ या कार्यक्रमाततृतीयपंथी कवयित्री-कार्यकर्त्या दिशा शेख यांनी स्त्री-पुरुष संबंध, समाजाची बुरसटलेली मानसिकता, पुरुषप्रधान समाजव्यवस्था, तृतीयपंथींना मिळणारी वागणूक या मुद्यांवर परखड भाष्य करत सर्वांनाच अंतर्मुख केले. चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव यांनी मुलाखतीतून कलाकृतींमधील कलात्मकता, त्यातील वास्तव, संस्कृतिरक्षणाच्या नावाखाली निर्माण केलेले प्रतिसेन्सॉर बोर्ड अशा विविध पैलूंमधून दिग्दर्शकाची भूमिका उलगडली. चित्र, शिल्प, काव्य या अनोख्या कार्यक्रमातून कला आणि साहित्याची दुहेरी अनुभूती कलाप्रेमींना अनुभवता आली. याच काळात दुर्दैवाने कोरेगाव भीमा येथील वादामुळे राज्यात तणाव होता. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची राज ठाकरे घेणार असणारी मुलाखत स्थगित केली आहे. या संमेलनामध्ये आपल्या कार्यक्षेत्रात न येणारे कोणतेही ठराव केले जात नाहीत, हे विशेष. कोट्यवधी रुपये खर्चून केलेल्या संमेलनांच्या तुलनेत हे संमेलन आशयाच्या दृष्टीने लाखमोलाचे ठरले.

टॅग्स :marathiमराठीPuneपुणे