शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

गर्दीचे नव्हे, दर्दींचे जागतिक संमेलन : शोध मराठी मनाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:09 IST

पुण्यात १ ते ३ जानेवारीदरम्यान जागतिक मराठी परिषदेतर्फे आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ हे १५ वे जागतिक संमेलन उत्साहात पार पडले. त्याला राज्यभरातून रसिक उपस्थित होते. परदेशस्थ यशस्वी मराठी बांधवांच्या मार्गदर्शनातून मराठी तरुणांना निश्चितच प्रेरणा मिळाली.

- प्रज्ञा केळकर-सिंग

उद्योग-व्यवसायासह कला, साहित्य आणि संस्कृती अशा विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामगिरी करून जगभरात मराठीचा झेंडा फडकविणाºया कर्तृत्ववान मराठी बांधवांच्या उपस्थितीने ‘शोध मराठी मनाचा’ हे १५ वे जागतिक संमेलन गर्दीचे संमेलन न ठरता सर्वार्थाने ‘दर्दींचे’ संमेलन ठरले. जागतिक मराठी अकादमीतर्फे पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात आयोेजित हे संमेलन पुणेकरांसह राज्यभरातून आलेल्या रसिकांसाठी मार्गदर्शक ठरले. रंगतदार मुलाखती, प्रदर्शन आणि कविसंमेलनाने रसिकांसाठी नववर्षाची सुरेख सुरुवात झाली. जागतिक मराठी परिषदेतर्फे १९९४ मध्ये जागतिक मराठी अकादमीची स्थापना झाली. २००२ मध्ये माधव गडकरी यांनी या अकादमीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ज्येष्ठ कवी आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्याकडे सोपवली. २००४ साली ‘शोध मराठी मनाचा’ या नावाने पहिले जागतिक संमेलन नागपूर येथे पार पडले. त्यानंतर अहमदनगर, पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, गोवा, रत्नागिरी, सातारा अशा विविध ठिकाणी रसिकांचा संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १५ वे संमेलन पुण्यात आयोजित करण्यात आले.परदेशातील यशस्वी मराठी बांधवांना महाराष्ट्रात आणून त्यांचे मार्गदर्शन उपस्थितांना तरुणांना प्रेरणा देण्यात यशस्वी ठरले. मराठी तरुणांमध्ये हिंमत जागृत करून त्यांना जगाच्या पाठीवर सिद्ध करण्यासाठी हे संमेलन आयोजित केले जाते.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. रामदास फुटाणे आणि रेणुका देशकर यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीतून गडकरी यांच्या आयुष्यातील जगण्याच्या दिशा, परखड राजकीय विचार आणि वाटचाल, सामाजिक बांधिलकी, कौटुंबिक संवेदनशीलता असे नानाविध कंगोरे रसिकांना अनुभवता आले. ‘समुद्रापलीकडे’ या परिसंवादांतर्गत अमेरिका, दुबई, लंडन, कतार, आॅस्ट्रेलिया, थायलंड, फ्लोरिडा अशा विविध देशांमध्ये कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या मराठी बांधवांनी आपल्या जडणघडणीचे अनुभव कथन करत तरुणांना मार्गदर्शन केले.‘लक्ष्मीची पाऊले’ याद्वारे उद्योगपतींची जडणघडण ऐकायला मिळाली. दिवसेंदिवस समस्यांच्या गर्तेत अडकत चाललेल्या शेतकºयाला उभारी देण्याच्या दृष्टीने ‘बळीराजा... काल, आज आणि उद्या’ या परिसंवादाने मोलाची भूमिका बजावली. ‘वेगळ्या वाटा’ या कार्यक्रमाततृतीयपंथी कवयित्री-कार्यकर्त्या दिशा शेख यांनी स्त्री-पुरुष संबंध, समाजाची बुरसटलेली मानसिकता, पुरुषप्रधान समाजव्यवस्था, तृतीयपंथींना मिळणारी वागणूक या मुद्यांवर परखड भाष्य करत सर्वांनाच अंतर्मुख केले. चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव यांनी मुलाखतीतून कलाकृतींमधील कलात्मकता, त्यातील वास्तव, संस्कृतिरक्षणाच्या नावाखाली निर्माण केलेले प्रतिसेन्सॉर बोर्ड अशा विविध पैलूंमधून दिग्दर्शकाची भूमिका उलगडली. चित्र, शिल्प, काव्य या अनोख्या कार्यक्रमातून कला आणि साहित्याची दुहेरी अनुभूती कलाप्रेमींना अनुभवता आली. याच काळात दुर्दैवाने कोरेगाव भीमा येथील वादामुळे राज्यात तणाव होता. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची राज ठाकरे घेणार असणारी मुलाखत स्थगित केली आहे. या संमेलनामध्ये आपल्या कार्यक्षेत्रात न येणारे कोणतेही ठराव केले जात नाहीत, हे विशेष. कोट्यवधी रुपये खर्चून केलेल्या संमेलनांच्या तुलनेत हे संमेलन आशयाच्या दृष्टीने लाखमोलाचे ठरले.

टॅग्स :marathiमराठीPuneपुणे