शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

संकेतभंग तर नव्हे?

By admin | Updated: December 8, 2015 01:40 IST

गेल्या कित्येक महिन्यांपासून देशात सहिष्णुता आणि असहिष्णुता या विषयावर वादळी चर्चा सुरु आहे. आज देशाच्या सत्तेत असणारे लोक असहिष्णुतेला प्रोत्साहन मिळेल अशी वक्तव्ये

गेल्या कित्येक महिन्यांपासून देशात सहिष्णुता आणि असहिष्णुता या विषयावर वादळी चर्चा सुरु आहे. आज देशाच्या सत्तेत असणारे लोक असहिष्णुतेला प्रोत्साहन मिळेल अशी वक्तव्ये आणि तशी कृती करीत असल्याचा व विशेषत: देशातील अल्पसंख्य समुदायाला भयभीत करुन सोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सातत्याने केला जातो आहे. या आरोपांची आणि खरे तरी वाढत्या असहिष्णुतेची सरकार दखल घेऊन कोणतीही कृती करीत नसल्याचा निषेध म्हणून काही विचारवंतांनी, लेखकांनी आणि कलाकारांनी त्यांना भूतकाळात प्राप्त झालेले सरकारी सन्मान परतदेखील केले आहेत. इतकेच नव्हे तर मागील सप्ताहात याच विषयावर संसदेमध्ये खडाजंगी चर्चा झाली आणि भाजपाच्या संसदीय पक्षाची बैठक होऊन या बैठकीत पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्या तोंडास कुलुप घालावे असे आदेशही दिले गेले. या संपूर्ण पार्श्वभूमीवर देशात कोणत्याही समाजाविरुद्ध कशाही प्रकारच्या असहिष्णुतेचे वातावरण नाही असे नि:संदिग्ध प्रतिपादन देशाचे ४३वे सरन्यायाधीश तिरथसिंग ठाकूर यांनी केले आहे. पण केवळ तिथेच न थांबता सध्या देशभर या संदर्भात जी चर्चा सुरु आहे तिच्यामागे राजकारण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सरन्यायाधीश म्हणून राज्यघटनेतील प्रत्येक तरतुदीचे संपूर्ण संरक्षण करणे हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे आणि याच घटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वत:साठी वापर करण्याची त्यांना संपूर्ण मुभा आहे. त्यामुळे त्यांना जे योग्य वाटले ते त्यांनी मांडले असे म्हणता येईल. परंतु आज ते ज्या पदावर विराजमान आहेत त्या पदावरुन बोलताना त्यांनी अशी काही विधाने करुन संकेतांचा भंग तर केला नाही ना, असा प्रश्न उपस्थित होणेदेखील स्वाभाविकच आहे. देशामध्ये कायद्याचे राज्य आहे आणि न्यायपालिका सक्षम आहे व त्यामुळे कोणत्याही समाजाच्या विरोधात असहिष्णुतेने कुणी वागण्याची शक्यता नाही, हे त्यांचे या संदर्भातील विधान तात्त्विकदृष्ट्या योग्य आणि सर्वमान्य होईल असेच आहे, यात शंका नाही. परंतु काहींच्या असहिष्णु वृत्तीने पीडले जाणारे लोक प्रत्येकवेळी न्यायालयाचा आश्रय घेतीलच असे नाही. देशाच्या एकूण संस्कृतीमध्येच सहिष्णुता नांदत असल्याचे जे निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे, त्याच्याशी कोणीच असहमत होणार नाही. तथापि सहिष्णुता हे देशाच्या परंपरेचे व्यवच्छेदक लक्षण असताना त्यालाच वांरवार छेद बसू लागल्यानेच तर देशभर चर्चा सुरु झाली हे वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही आणि म्हणूनच त्यात केवळ राजकारण आहे, हा आक्षेप वा आरोपही स्वीकारला जाणार नाही.