शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पहिल्या निवडणुकीच्या ना ना कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 12:48 IST

मिलिंद कुलकर्णी पहिलटकरणीचे बाळंतपण कायमस्वरुपी स्मरणात राहणारे असते. पहिलटकरीण आणि माहेरची मंडळी या प्रसंगाचे साक्षीदार असतात. प्रेमाच्या आणि आपुलकीच्या ...

मिलिंद कुलकर्णीपहिलटकरणीचे बाळंतपण कायमस्वरुपी स्मरणात राहणारे असते. पहिलटकरीण आणि माहेरची मंडळी या प्रसंगाचे साक्षीदार असतात. प्रेमाच्या आणि आपुलकीच्या माहेरच्या माणसांमध्ये हा प्रसंग साजरा होत असल्याने वेदना सुसह्य होतात. माहेरची मंडळी घेत असलेली काळजी सुखवत असते. बहुदा असाच अनुभव निवडणुकीतील पहिल्यांदा लढणाऱ्या उमेदवाराला येत असावा. मित्रमंडळी, नातेवाईक निवडणूक लढविण्याचा आग्रह धरतात. निवडणुकीला आवश्यक असलेले सर्व गुण अंगी असल्याचे भासवितात. त्यामुळे स्वत: उमेदवारालाही काही दिवसांनी तसे वाटायला लागते. आजूबाजूची दोन-चार उदाहरणे सांगितली की, परिस्थिती अनुकूल वाटायला लागते. खिसा खुळुखुळू लागतो. मित्र सर्व प्रकारच्या सहाकार्याचे आश्वासन देतात. आणि उमेदवार शड्डू ठोकून तयार होतो. ग्रामीण भागात याला अगदी समर्पक शब्द आहे, ‘घोड्यावर बसविणे’. तुम्ही घोडेस्वार आहात काय, तुम्हाला घोड्यावर मांड ठोकणे जमते काय, घोड्याला ताब्यात ठेवता येते काय, याचा कोणताही मागचा पुढचा विचार न करता मित्र, नातलगांच्या सहकार्याने घोड्यावर बसतो तर खरे, पण पुढे ज्या वेदना होतात. घोडा ऐकत नाही, रस्ता कळत नाही. मदतीला धावून येणारे केव्हाच गायब झालेले असतात. तेव्हा घोडामैदान जवळ असले तरी ते क्षितीजापल्याड असल्याचा भास होतो, हे सगळे पहिल्या निवडणुकीत घडत असते. असा अनुभव प्रत्येकाने घेतला असतो. पुढे अनुभवाचे शहाणपण येते. आणि निवडणुकांना निर्भयपणे, समंजसपणे सामोरे जायला लागतो. पण ही पहिली निवडणूक कायमस्वरुपी स्मरणात राहते, असा बहुसंख्य उमेदवारांचा अनुभव असतो.२००९, २०१४ या दोन निवडणुकांचा आढावा घेतला तर लक्षात येते की, पहिल्यांदा निवडणूक लढवून जिंकणारे नंतर दुसºया निवडणुकीत मात्र पराभवाची चव चाखताना दिसतात. आता यशाची हवा डोक्यात गेली की, विकास कामांवर भरोसा असताना मतदारांना तो जाणवला नाही, कारण काहीही असो. विजय रथ जमिनीवर आलाच.२००९ च्या निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेसचे तब्बल ४ उमेदवार पहिल्यांदा विजयी झाले. माजी महापौर गुलाबराव देवकर हे नवनिर्मित जळगाव ग्रामीणमधून, नंदुरबारचे माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांचे शालक जगदीश वळवी चोपड्यातून, माजी आमदार ओंकार वाघ यांचे पूत्र दिलीप वाघ हे पाचोºयातून, माजी नगराध्यक्ष अनिलदादा देशमुख यांचे पूत्र राजीव देशमुख चाळीसगावातून तर राजवडचे साहेबराव पाटील हे अमळनेरातून पहिल्यांदा निवडून आले. साहेबराव पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. याचवेळी काँग्रेसतर्फे रावेरमधून शिरीष मधुकरराव चौधरी तर शहाद्यामधून अ‍ॅड.पद्माकर वळवी विजयी झाले. डॉ.गावीत यांचे बंधू शरद गावीत हे समाजवादी पक्षातर्फे नवापुरातून निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचा पराभव केला. असाच धक्कादायक पराभव माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा धुळे ग्रामीण या मतदारसंघात शिवसेनेच्या प्रा.शरद पाटील यांनी केला.२०१४ मध्ये ९ आमदारांपैकी एकही आमदार पुन्हा निवडून आला नाही. सगळ्यांचा पराभव झाला. यावर्षी भाजपतर्फे उदेसिंग पाडवी (शहादा), सुरेश भोळे (जळगाव शहर), उन्मेष पाटील (चाळीसगाव), काँग्रेसतर्फे कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), शिवसेनेतर्फे प्रा.चंद्रकांत सोनवणे (चोपडा), किशोर पाटील (पाचोरा), अपक्ष शिरीष चौधरी (अमळनेर) हे निवडून आले. या ७ पैकी उन्मेष पाटील हे खासदार झाल्याने रिंगणात नाहीत. तर प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता सोनवणे या निवडणूक लढवत आहेत. अमळनेरचे शिरीष चौधरी हे यंदा भाजपचे उमेदवार आहेत.२०१९ मध्ये पहिल्यांदा भविष्य अजमावणाºया प्रमुख उमेदवारांमध्ये राजेश पाडवी (शहादा), भरत गावीत व शिरीष नाईक (नवापूर), ज्ञानज्योती भदाणे (धुळे ग्रामीण), हिलाल माळी (धुळे शहर), जगन सोनवणे (भुसावळ), पुष्पा महाजन (जळगाव ग्रामीण), मंगेश चव्हाण (चाळीसगाव), रोहिणी खडसे (मुक्ताईनगर) यांचा समावेश आहे. त्यांच्या भवितव्याचा फैसला २४ रोजी होईल.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव