शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या निवडणुकीच्या ना ना कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 12:48 IST

मिलिंद कुलकर्णी पहिलटकरणीचे बाळंतपण कायमस्वरुपी स्मरणात राहणारे असते. पहिलटकरीण आणि माहेरची मंडळी या प्रसंगाचे साक्षीदार असतात. प्रेमाच्या आणि आपुलकीच्या ...

मिलिंद कुलकर्णीपहिलटकरणीचे बाळंतपण कायमस्वरुपी स्मरणात राहणारे असते. पहिलटकरीण आणि माहेरची मंडळी या प्रसंगाचे साक्षीदार असतात. प्रेमाच्या आणि आपुलकीच्या माहेरच्या माणसांमध्ये हा प्रसंग साजरा होत असल्याने वेदना सुसह्य होतात. माहेरची मंडळी घेत असलेली काळजी सुखवत असते. बहुदा असाच अनुभव निवडणुकीतील पहिल्यांदा लढणाऱ्या उमेदवाराला येत असावा. मित्रमंडळी, नातेवाईक निवडणूक लढविण्याचा आग्रह धरतात. निवडणुकीला आवश्यक असलेले सर्व गुण अंगी असल्याचे भासवितात. त्यामुळे स्वत: उमेदवारालाही काही दिवसांनी तसे वाटायला लागते. आजूबाजूची दोन-चार उदाहरणे सांगितली की, परिस्थिती अनुकूल वाटायला लागते. खिसा खुळुखुळू लागतो. मित्र सर्व प्रकारच्या सहाकार्याचे आश्वासन देतात. आणि उमेदवार शड्डू ठोकून तयार होतो. ग्रामीण भागात याला अगदी समर्पक शब्द आहे, ‘घोड्यावर बसविणे’. तुम्ही घोडेस्वार आहात काय, तुम्हाला घोड्यावर मांड ठोकणे जमते काय, घोड्याला ताब्यात ठेवता येते काय, याचा कोणताही मागचा पुढचा विचार न करता मित्र, नातलगांच्या सहकार्याने घोड्यावर बसतो तर खरे, पण पुढे ज्या वेदना होतात. घोडा ऐकत नाही, रस्ता कळत नाही. मदतीला धावून येणारे केव्हाच गायब झालेले असतात. तेव्हा घोडामैदान जवळ असले तरी ते क्षितीजापल्याड असल्याचा भास होतो, हे सगळे पहिल्या निवडणुकीत घडत असते. असा अनुभव प्रत्येकाने घेतला असतो. पुढे अनुभवाचे शहाणपण येते. आणि निवडणुकांना निर्भयपणे, समंजसपणे सामोरे जायला लागतो. पण ही पहिली निवडणूक कायमस्वरुपी स्मरणात राहते, असा बहुसंख्य उमेदवारांचा अनुभव असतो.२००९, २०१४ या दोन निवडणुकांचा आढावा घेतला तर लक्षात येते की, पहिल्यांदा निवडणूक लढवून जिंकणारे नंतर दुसºया निवडणुकीत मात्र पराभवाची चव चाखताना दिसतात. आता यशाची हवा डोक्यात गेली की, विकास कामांवर भरोसा असताना मतदारांना तो जाणवला नाही, कारण काहीही असो. विजय रथ जमिनीवर आलाच.२००९ च्या निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेसचे तब्बल ४ उमेदवार पहिल्यांदा विजयी झाले. माजी महापौर गुलाबराव देवकर हे नवनिर्मित जळगाव ग्रामीणमधून, नंदुरबारचे माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांचे शालक जगदीश वळवी चोपड्यातून, माजी आमदार ओंकार वाघ यांचे पूत्र दिलीप वाघ हे पाचोºयातून, माजी नगराध्यक्ष अनिलदादा देशमुख यांचे पूत्र राजीव देशमुख चाळीसगावातून तर राजवडचे साहेबराव पाटील हे अमळनेरातून पहिल्यांदा निवडून आले. साहेबराव पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. याचवेळी काँग्रेसतर्फे रावेरमधून शिरीष मधुकरराव चौधरी तर शहाद्यामधून अ‍ॅड.पद्माकर वळवी विजयी झाले. डॉ.गावीत यांचे बंधू शरद गावीत हे समाजवादी पक्षातर्फे नवापुरातून निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचा पराभव केला. असाच धक्कादायक पराभव माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा धुळे ग्रामीण या मतदारसंघात शिवसेनेच्या प्रा.शरद पाटील यांनी केला.२०१४ मध्ये ९ आमदारांपैकी एकही आमदार पुन्हा निवडून आला नाही. सगळ्यांचा पराभव झाला. यावर्षी भाजपतर्फे उदेसिंग पाडवी (शहादा), सुरेश भोळे (जळगाव शहर), उन्मेष पाटील (चाळीसगाव), काँग्रेसतर्फे कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), शिवसेनेतर्फे प्रा.चंद्रकांत सोनवणे (चोपडा), किशोर पाटील (पाचोरा), अपक्ष शिरीष चौधरी (अमळनेर) हे निवडून आले. या ७ पैकी उन्मेष पाटील हे खासदार झाल्याने रिंगणात नाहीत. तर प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता सोनवणे या निवडणूक लढवत आहेत. अमळनेरचे शिरीष चौधरी हे यंदा भाजपचे उमेदवार आहेत.२०१९ मध्ये पहिल्यांदा भविष्य अजमावणाºया प्रमुख उमेदवारांमध्ये राजेश पाडवी (शहादा), भरत गावीत व शिरीष नाईक (नवापूर), ज्ञानज्योती भदाणे (धुळे ग्रामीण), हिलाल माळी (धुळे शहर), जगन सोनवणे (भुसावळ), पुष्पा महाजन (जळगाव ग्रामीण), मंगेश चव्हाण (चाळीसगाव), रोहिणी खडसे (मुक्ताईनगर) यांचा समावेश आहे. त्यांच्या भवितव्याचा फैसला २४ रोजी होईल.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव