शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

पहिल्या निवडणुकीच्या ना ना कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 12:48 IST

मिलिंद कुलकर्णी पहिलटकरणीचे बाळंतपण कायमस्वरुपी स्मरणात राहणारे असते. पहिलटकरीण आणि माहेरची मंडळी या प्रसंगाचे साक्षीदार असतात. प्रेमाच्या आणि आपुलकीच्या ...

मिलिंद कुलकर्णीपहिलटकरणीचे बाळंतपण कायमस्वरुपी स्मरणात राहणारे असते. पहिलटकरीण आणि माहेरची मंडळी या प्रसंगाचे साक्षीदार असतात. प्रेमाच्या आणि आपुलकीच्या माहेरच्या माणसांमध्ये हा प्रसंग साजरा होत असल्याने वेदना सुसह्य होतात. माहेरची मंडळी घेत असलेली काळजी सुखवत असते. बहुदा असाच अनुभव निवडणुकीतील पहिल्यांदा लढणाऱ्या उमेदवाराला येत असावा. मित्रमंडळी, नातेवाईक निवडणूक लढविण्याचा आग्रह धरतात. निवडणुकीला आवश्यक असलेले सर्व गुण अंगी असल्याचे भासवितात. त्यामुळे स्वत: उमेदवारालाही काही दिवसांनी तसे वाटायला लागते. आजूबाजूची दोन-चार उदाहरणे सांगितली की, परिस्थिती अनुकूल वाटायला लागते. खिसा खुळुखुळू लागतो. मित्र सर्व प्रकारच्या सहाकार्याचे आश्वासन देतात. आणि उमेदवार शड्डू ठोकून तयार होतो. ग्रामीण भागात याला अगदी समर्पक शब्द आहे, ‘घोड्यावर बसविणे’. तुम्ही घोडेस्वार आहात काय, तुम्हाला घोड्यावर मांड ठोकणे जमते काय, घोड्याला ताब्यात ठेवता येते काय, याचा कोणताही मागचा पुढचा विचार न करता मित्र, नातलगांच्या सहकार्याने घोड्यावर बसतो तर खरे, पण पुढे ज्या वेदना होतात. घोडा ऐकत नाही, रस्ता कळत नाही. मदतीला धावून येणारे केव्हाच गायब झालेले असतात. तेव्हा घोडामैदान जवळ असले तरी ते क्षितीजापल्याड असल्याचा भास होतो, हे सगळे पहिल्या निवडणुकीत घडत असते. असा अनुभव प्रत्येकाने घेतला असतो. पुढे अनुभवाचे शहाणपण येते. आणि निवडणुकांना निर्भयपणे, समंजसपणे सामोरे जायला लागतो. पण ही पहिली निवडणूक कायमस्वरुपी स्मरणात राहते, असा बहुसंख्य उमेदवारांचा अनुभव असतो.२००९, २०१४ या दोन निवडणुकांचा आढावा घेतला तर लक्षात येते की, पहिल्यांदा निवडणूक लढवून जिंकणारे नंतर दुसºया निवडणुकीत मात्र पराभवाची चव चाखताना दिसतात. आता यशाची हवा डोक्यात गेली की, विकास कामांवर भरोसा असताना मतदारांना तो जाणवला नाही, कारण काहीही असो. विजय रथ जमिनीवर आलाच.२००९ च्या निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेसचे तब्बल ४ उमेदवार पहिल्यांदा विजयी झाले. माजी महापौर गुलाबराव देवकर हे नवनिर्मित जळगाव ग्रामीणमधून, नंदुरबारचे माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांचे शालक जगदीश वळवी चोपड्यातून, माजी आमदार ओंकार वाघ यांचे पूत्र दिलीप वाघ हे पाचोºयातून, माजी नगराध्यक्ष अनिलदादा देशमुख यांचे पूत्र राजीव देशमुख चाळीसगावातून तर राजवडचे साहेबराव पाटील हे अमळनेरातून पहिल्यांदा निवडून आले. साहेबराव पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. याचवेळी काँग्रेसतर्फे रावेरमधून शिरीष मधुकरराव चौधरी तर शहाद्यामधून अ‍ॅड.पद्माकर वळवी विजयी झाले. डॉ.गावीत यांचे बंधू शरद गावीत हे समाजवादी पक्षातर्फे नवापुरातून निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचा पराभव केला. असाच धक्कादायक पराभव माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा धुळे ग्रामीण या मतदारसंघात शिवसेनेच्या प्रा.शरद पाटील यांनी केला.२०१४ मध्ये ९ आमदारांपैकी एकही आमदार पुन्हा निवडून आला नाही. सगळ्यांचा पराभव झाला. यावर्षी भाजपतर्फे उदेसिंग पाडवी (शहादा), सुरेश भोळे (जळगाव शहर), उन्मेष पाटील (चाळीसगाव), काँग्रेसतर्फे कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), शिवसेनेतर्फे प्रा.चंद्रकांत सोनवणे (चोपडा), किशोर पाटील (पाचोरा), अपक्ष शिरीष चौधरी (अमळनेर) हे निवडून आले. या ७ पैकी उन्मेष पाटील हे खासदार झाल्याने रिंगणात नाहीत. तर प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता सोनवणे या निवडणूक लढवत आहेत. अमळनेरचे शिरीष चौधरी हे यंदा भाजपचे उमेदवार आहेत.२०१९ मध्ये पहिल्यांदा भविष्य अजमावणाºया प्रमुख उमेदवारांमध्ये राजेश पाडवी (शहादा), भरत गावीत व शिरीष नाईक (नवापूर), ज्ञानज्योती भदाणे (धुळे ग्रामीण), हिलाल माळी (धुळे शहर), जगन सोनवणे (भुसावळ), पुष्पा महाजन (जळगाव ग्रामीण), मंगेश चव्हाण (चाळीसगाव), रोहिणी खडसे (मुक्ताईनगर) यांचा समावेश आहे. त्यांच्या भवितव्याचा फैसला २४ रोजी होईल.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव