शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

नको तो विकास, ती प्रगती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 01:02 IST

महापालिकेच्या कारभाराने जळगावकर त्रस्त झाले असून पुरे झाला सावळागोंधळ असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. रोज नवीन काहीतरी वाढून ठेवले जाते आणि जळगावकर नागरिक त्याच्याशी झुंजत राहतात. नको तो विकास असे म्हणायची पाळी आलेली आहे.

मिलिंद कुलकर्णीमहापालिकेच्या कारभाराने जळगावकर त्रस्त झाले असून पुरे झाला सावळागोंधळ असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. रोज नवीन काहीतरी वाढून ठेवले जाते आणि जळगावकर नागरिक त्याच्याशी झुंजत राहतात. नको तो विकास असे म्हणायची पाळी आलेली आहे.यंदा पाऊस कमी झाल्याने दुष्काळ आणि टंचाई सदृश स्थिती राहील, यात वाद नाही. परंतु, जळगावकरांचे हक्काचे पाणी शेतीसाठी वळविण्याचा जामनेरकरांचा डाव लपून राहिलेला नाही. जानेवारीतच जळगावात चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेने घोषित केले होते, परंतु राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमांनी आवाज उठविल्यावर दोन पावले मागे घेतली गेली. दहा वर्षांपूर्वी वाघूर धरणाच्या मृतसाठ्यातून जळगावकरांची तहान भागविली गेली आहे. १५० कि.मी. अंतरावरील गिरणा धरणात कमी साठा असतानाही बोअरवेल आणि स्टँडपोस्टची पर्यायी व्यवस्था राबवून तत्कालीन पालिकेने नियोजन केले होते. यंदा वाघूरमध्ये अल्पसाठा नाही, परंतु, शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणीचोरी होत असून त्याकडे सिंचन विभाग कानाडोळा करीत आहे. शिक्षा मात्र जळगावकरांना भोगावी लागणार आहे.अमृत पाणी योजनेसाठी नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम सध्या शहरात सुरु आहे. परंतु, या कामातील सावळ्यागोंधळाला तर पारावार उरला नाही. रोज वेगवेगळ्या तक्रारी, लोक काम बंद पाडत असल्याच्या बातम्या येत आहेत, पण महापालिका ठोस भूमिका घेताना दिसत नाही. पाईप लाईनवरुन वैयक्तीक कनेक्शन देताना रस्ता खोदण्यासाठी रहिवाशांकडून वीजपुरवठा घेतला जात आहे. कंत्राटदाराची ती जबाबदारी असताना रहिवाशांना भुर्दंड कशासाठी? पण दाद मागणार कुणाकडे हा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. रस्ते खोदून झाल्यावर किमान त्याची डागडुजी, खड्डे व्यवस्थित भरणे याकडे कंत्राटदार दुर्लक्ष करीत आहे. रिंगरोड हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असून चार महिन्यांपासून त्याची एक बाजू खोदून ठेवण्यात आली आहे. एका बाजूने ये-जा करणाऱ्यांची गर्दी होत असल्याने किरकोळ अपघात, वादावादी, धक्काबुक्की हे नित्याचे प्रकार झाले आहेत. रेल्वे मालधक्कयावरुन मालवाहू ट्रकांची नियमित ये-जा असते. या रस्त्यावर सर्वाधिक रुग्णालये असल्याने रुग्णवाहिका, रिक्षा आणि इतर वाहने रस्त्यावर उभी असतात. त्यातून दुहेरी वाहतूक म्हणजे वाहनचालकाची कसोटी असते. पण त्याची पर्वा करायला महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना वेळ आहे कुठे? विशेष म्हणजे महापौर आणि उपमहापौर अशा दोघांचा वॉर्ड याच भागात आहे. तरीही एवढे दुर्लक्ष आहे, तर इतर नगरसेवकांच्या वॉर्डात काय स्थिती असेल, याची कल्पना केलेली बरी.शिवाजीनगरात जाण्यासाठी जिल्हा परिषदेजवळील रेल्वे उड्डाणपुलाची कालमर्यादा कधीच संपली आहे. नवा उड्डाणपूल उभारण्यासाठी काही वर्षांपासून प्रयत्न सुरु होते. अलिकडे पूल वाय आकाराचा असावा की टी आकाराचा, यावरुन वादंग सुरु झाला. बांधकाम व्यावसायिकाची इमारत वाचविण्यासाठी वाय आकाराचा नकाशा मंजूर करण्यात आला, मूळ टी आकाराचा नकाशा दडवून ठेवल्याचा आरोप रहिवाशांनी केला. न्यायालयातही हे प्रकरण गेले. दरम्यान, पर्यायी रस्ता तयार केल्याशिवाय हा उड्डाणपूल पाडू नये, अशी मागणी रहिवाशांनी केली. शनिपेठेतील लेंडी नाल्यावरील बोगद्याचे खोलीकरण रेल्वेने सुरु केले आहे. तो बोगदा वाहतुकीला खुला झाला की, हा पूल पाडावा, अशी मागणी करण्यात आली. महासभेतही तशी चर्चा झाली. सर्वसंमती झाली. पण अचानक पूल पाडण्याचा निर्णय झाला. पर्यायी व्यवस्था व उपाययोजना न करता घेतलेल्या या घिसाडघाईच्या निर्णयाचा नागरिकांना मोठा फटका बसला. दोन रेल्वे फाटकांवर विसंबून वाहतूक करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. परावलंबित्व वाढले. फेरा पडला. पण याची काळजी, चिंता करेल ती महापालिका कसली? रोजच्या उबग आणणाºया अनुभवाने नागरिक पूर्णत: त्रस्त झाले आहेत.