शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

नितीशकुमारांची नैतिकता

By admin | Updated: May 19, 2014 08:56 IST

नितीशकुमारांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा तत्काळ दिलेला राजीनामा हा त्यांच्या आजवरच्या राजकीय, पण सरळ व साध्या वाटचालीशी सुसंगत ठरावा, असा आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या जनता दल (यू) या पक्षाच्या झालेल्या दारुण पराभवाचे दायित्व स्वीकारून नितीशकुमारांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा तत्काळ दिलेला राजीनामा हा त्यांच्या आजवरच्या राजकीय, पण सरळ व साध्या वाटचालीशी सुसंगत ठरावा, असा आहे. स्वत:ला डॉ. राम मनोहर लोहियांचे निष्ठावंत अनुयायी म्हणवून घेणारे नितीशकुमार हे कमालीचे विधायक व समाजनिष्ठ वृत्तीचे नेते आहेत. ते नुसते सेक्युलर व धर्मनिरपेक्षच नाहीत, तर जातीनिरपेक्ष राजकारणाचे खरेखुरे पुरस्कर्ते आहेत. सार्‍या बिहारात त्यांच्या जातीचे लोक विधानसभेच्या जेमतेम सहा मतदारसंघांत असताना सारा बहुजन समाज एकत्र आणून त्यांनी त्या राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळविले. त्याआधी केंद्र सरकारात रेल्वेमंत्री म्हणून त्यांनी केलेले कामही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला झळाळी देऊन गेले. बिहार विधानसभेची मागली निवडणूक त्यांनी भाजपाशी समझोता करून लढविली व तीत त्यांना प्रचंड बहुमत मिळाले. पुढे भाजपाने नरेंद्र मोदींचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे केले तेव्हा नितीशकुमारांनी त्या पक्षापासून फारकत घेतली. परिणामी, भाजपाचे ९० आमदार सरकारची बाजू सोडून विरोधी बाकांवर जाऊन बसले. त्याही स्थितीत आपल्या पक्षाचे बहुमत शाबूत राखण्यात व आपले सरकार सत्तेवर ठेवण्यात नितीशकुमार यशस्वी झाले. त्यांची एक जास्तीची व स्थानिक अडचण ही, की त्यांच्या राज्यात एकेकाळी सत्तेवर असलेला व आजही सामर्थ्यशाली असणारा लालुप्रसादांचा राष्टÑीय जनता दल हा पक्षही त्यांच्याविरोधात या सार्‍या काळात दंड थोपटून उभा होता. परवाच्या निवडणुकीत बिहारमधील लोकसभेच्या ४० जागांपैकी नितीशकुमारांना अवघ्या दोन जागांवर विजय मिळविता आला, तर लालुप्रसादांचे चार उमेदवार विजयी झाले. परिणामी, त्या दोघांनाही या पराभवाचा मोठा फटका अनुभवावा लागला आहे. ही स्थिती नितीशकुमारांच्या राजकारणाला धक्का देणारी असली, तरी त्यांना राजीनामा द्यायला लावणारी मात्र नाही. लोकसभेची निवडणूक राष्ट्रीय प्रश्नांवर व एका वेगळ्या पातळीवर लढविली जाते. याउलट विधानसभेची निवडणूक प्रादेशिक व स्थानिक प्रश्नांवर उभी होते. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाचा विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयावर परिणाम करून घेणे नैतिक असले, तरी राजकीय नाही. बिहारच्या विधानसभेत आजही नितीशकुमारांच्या पाठीशी पूर्ण बहुमत आहे. शिवाय त्या विधानसभेतील काँग्रेस सदस्यांनी त्यांना बाहेरून पाठिंबा देण्याचे धोरण आखले आहे. आताच्या बदललेल्या परिस्थितीत लालूंचा राजद हा पक्षही त्यांच्यासोबत जाणार आहे. ही स्थिती नितीशकुमारांची राजवट जास्तीची बळकट व मजबूत करणारी आहे. मात्र, नितीशकुमारांनी घेतलेला पवित्रा राजकीय नसून नैतिक आहे. राजीनामा देण्याच्या त्यांच्या कृतीवर राजकीय ढोंगाचा आरोप कोणाला करताही येणार नाही. तशी ढोंगे करणारे लोक त्यांचे राजीनामे आपल्या पक्षाच्या अध्यक्षांकडे पाठवितात व काही काळाने ते गुपचूप मागेही घेतात. नितीशकुमारांनी त्यांचा राजीनामा थेट राज्यपालांकडे पाठविला आहे आणि तेवढ्यावर न थांबता आपला उत्तराधिकारी निवडण्यासाठी पक्षाच्या आमदारांची बैठकही तत्काळ बोलावली आहे. त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद यादव यांनीही नितीशकुमार हे आता मुख्यमंत्रिपदावर राहायला राजी नसल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. स्वच्छ व पारदर्शी प्रशासन आणि तेवढेच चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व यासाठी नितीशकुमार देशाच्या राजकारणात ख्यातकीर्त राहिले आहेत. मध्यंतरी त्यांचे नाव पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार व तिसर्‍या आघाडीचे नेते म्हणूनही देशभर चर्चिले गेले. परवाच्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही आघाडीला निर्णायक बहुमत मिळाले नसते, तर नितीशकुमारांच्या वाट्याला कदाचित फार मोठे पद आले असते. मात्र, आताचा त्यांचा राजीनामा त्यांची पदावनती दाखविणारा असला, तरी देशाच्या राजकारणात त्यांची नैतिक उंची वाढविणारा आहे, हे सार्‍यांनीच लक्षात घेतले पाहिजे. नितीशकुमारांच्या वाट्याला आलेल्या पराभवासारखे पराभव इतरही अनेक पुढार्‍यांच्या वाट्याला परवा आले. आपल्या महाराष्टÑातच काँग्रेस पक्षाला लोकसभेच्या राज्यातील ४८ जागांपैकी अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले, तर शरद पवारांच्या आक्रमक म्हणविणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या चार जागा येथे मिळू शकल्या. नितीशकुमारांसारखे पाऊल उचलायचे या नेत्यांनी ठरविले, तर तो त्यांचाही गौरव होईल. ते बिचारे तसे करणार मात्र नाहीत.