शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

नितीन पटनायक?

By admin | Updated: October 25, 2016 04:14 IST

ओडीशाचे त्या काळातील सर्वेसर्वा आणि त्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे पिताश्री बिजू पटनायक यांनी तब्बल तेवीस वर्षांपूर्वी काढलेल्या उद्गारांची

ओडीशाचे त्या काळातील सर्वेसर्वा आणि त्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे पिताश्री बिजू पटनायक यांनी तब्बल तेवीस वर्षांपूर्वी काढलेल्या उद्गारांची आठवण आज केन्द्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी करुन दिली आहे. बिजू पटनायक देशाच्या जुन्या पिढीतील जनमान्य नेते पण त्यांचा संताप त्यांना कधीच आपल्या ताब्यात ठेवता आला नाही. परिणामी जे सरकारी नोकर कामचुकारपणा करतील वा भ्रष्टाचार करतील त्यांना मुस्काडून तर काढलेच पाहिजे पण प्रसंगी ‘गिलोटीन’ची म्हणजे फाशीची शिक्षाही ठोठावली पाहिजे असे ते म्हणाले होते. आज गडकरी नेमके तसेच काहीसे म्हणत आहेत. जनतेने भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात बिनधास्त तक्रारी कराव्यात, त्यांना ठोकून काढू असे गडकरींनी म्हटले आहे. भाजपा-सेना युती ‘अमर’ असल्याने गडकरींना वाण नाही पण गुण लागला म्हणायचे की काय? अन्यथा ठोकाठोकी आणि बदडाबदडी अशी भाषा संघ आणि भाजपा यांच्या संस्कृतीत बसत नाही, असे तेच लोक सांगत असतात. मुळात सामान्य विज्ञानाचा साधा सिद्धांत असे सांगतो की पाझर वरुन खाली होत असतो, खालून वरती नव्हे! त्यातून सरकारी नोकरशाही हा तसाही एक नाठाळ घोडा मानला जातो व त्याच्यावर मांड ठोकून त्याला हवे तसे पळवणे हे लोकनियुक्त सरकारच्या प्रतिनिधींचे कौशल्य मानले जाते. सबब महाराष्ट्रातील काय किंवा देशातील काय, नोकरशाही बेलगाम पद्धतीने वागत असेल तर त्याचा अधिक दोष राज्यकर्त्यांकडेच जातो. नितीन गडकरी ज्या सुमारास अधिकाऱ्यांना ठोकून काढण्याची भाषा करीत होते, त्याच सुमारास राजधानी दिल्लीत काही वरिष्ठ आयएएस अधिकारी एकत्र येऊन देशातील बदललेल्या शासकीय धोरणांच्या संदर्भात चिंता व्यक्त करीत होते. अधिकाऱ्यांनी कालहरण न करता, त्यांच्या पुढ्यातील प्रकरणांचा सत्वर निपटारा करावा, असा खुद्द पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचा आग्रह असला आणि तो एका परीने योग्यदेखील असला तरी शीघ्रतेने एखाद्या प्रकरणाचा निर्णय घेताना नकळत एखादी चूक झाली तरी संबंधिताला कोणतेही संरक्षण उपलब्ध नाही, ही या अधिकाऱ्यांची रास्त खंत वा तक्रार आहे. विशेषत: जेव्हां सरकारचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री स्वत:वर कोणतीही जबाबदारी न घेता संदिग्ध आणि तोंडी सूचना देतात तेव्हां नोकरशाही निश्चितच पेचात सापडत असते. स्वाभाविकच सत्वर काम केले नाही तरी सरकार बदडून काढणार आणि केले व त्यात अजाणतेपणी चूक झाली तरीही सरकारच पुन्हा ठोकून काढणार, अशा कातरीत अधिकारी अडकत चालले आहेत. दीर्घकाळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक नेहमी म्हणत असत की जो काम करेल तोच चुकेल आणि जो काम टाळेल त्याच्या हातून चूक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण झालेली चूक जाणतेपणी केली की अजाणतेपणी याचा निर्णय राज्यकर्त्यांना करता आला पाहिजे. आज मात्र कामही करा आणि थोडी जरी चूक झाली तरी फटके खा पण काम कसे करा हे आम्ही स्पष्टपणे सांगणार नाही अशी स्थिती निर्माण झाली असून या काळात वारंवार जे काही प्रकार घडत आहेत ते पाहाता आता गडकरी जे करु पाहात आहेत, ते लोक अगोदरच करुन मोकळे होताना दिसत आहेत.