शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

नितीन पटनायक?

By admin | Updated: October 25, 2016 04:14 IST

ओडीशाचे त्या काळातील सर्वेसर्वा आणि त्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे पिताश्री बिजू पटनायक यांनी तब्बल तेवीस वर्षांपूर्वी काढलेल्या उद्गारांची

ओडीशाचे त्या काळातील सर्वेसर्वा आणि त्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे पिताश्री बिजू पटनायक यांनी तब्बल तेवीस वर्षांपूर्वी काढलेल्या उद्गारांची आठवण आज केन्द्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी करुन दिली आहे. बिजू पटनायक देशाच्या जुन्या पिढीतील जनमान्य नेते पण त्यांचा संताप त्यांना कधीच आपल्या ताब्यात ठेवता आला नाही. परिणामी जे सरकारी नोकर कामचुकारपणा करतील वा भ्रष्टाचार करतील त्यांना मुस्काडून तर काढलेच पाहिजे पण प्रसंगी ‘गिलोटीन’ची म्हणजे फाशीची शिक्षाही ठोठावली पाहिजे असे ते म्हणाले होते. आज गडकरी नेमके तसेच काहीसे म्हणत आहेत. जनतेने भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात बिनधास्त तक्रारी कराव्यात, त्यांना ठोकून काढू असे गडकरींनी म्हटले आहे. भाजपा-सेना युती ‘अमर’ असल्याने गडकरींना वाण नाही पण गुण लागला म्हणायचे की काय? अन्यथा ठोकाठोकी आणि बदडाबदडी अशी भाषा संघ आणि भाजपा यांच्या संस्कृतीत बसत नाही, असे तेच लोक सांगत असतात. मुळात सामान्य विज्ञानाचा साधा सिद्धांत असे सांगतो की पाझर वरुन खाली होत असतो, खालून वरती नव्हे! त्यातून सरकारी नोकरशाही हा तसाही एक नाठाळ घोडा मानला जातो व त्याच्यावर मांड ठोकून त्याला हवे तसे पळवणे हे लोकनियुक्त सरकारच्या प्रतिनिधींचे कौशल्य मानले जाते. सबब महाराष्ट्रातील काय किंवा देशातील काय, नोकरशाही बेलगाम पद्धतीने वागत असेल तर त्याचा अधिक दोष राज्यकर्त्यांकडेच जातो. नितीन गडकरी ज्या सुमारास अधिकाऱ्यांना ठोकून काढण्याची भाषा करीत होते, त्याच सुमारास राजधानी दिल्लीत काही वरिष्ठ आयएएस अधिकारी एकत्र येऊन देशातील बदललेल्या शासकीय धोरणांच्या संदर्भात चिंता व्यक्त करीत होते. अधिकाऱ्यांनी कालहरण न करता, त्यांच्या पुढ्यातील प्रकरणांचा सत्वर निपटारा करावा, असा खुद्द पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचा आग्रह असला आणि तो एका परीने योग्यदेखील असला तरी शीघ्रतेने एखाद्या प्रकरणाचा निर्णय घेताना नकळत एखादी चूक झाली तरी संबंधिताला कोणतेही संरक्षण उपलब्ध नाही, ही या अधिकाऱ्यांची रास्त खंत वा तक्रार आहे. विशेषत: जेव्हां सरकारचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री स्वत:वर कोणतीही जबाबदारी न घेता संदिग्ध आणि तोंडी सूचना देतात तेव्हां नोकरशाही निश्चितच पेचात सापडत असते. स्वाभाविकच सत्वर काम केले नाही तरी सरकार बदडून काढणार आणि केले व त्यात अजाणतेपणी चूक झाली तरीही सरकारच पुन्हा ठोकून काढणार, अशा कातरीत अधिकारी अडकत चालले आहेत. दीर्घकाळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक नेहमी म्हणत असत की जो काम करेल तोच चुकेल आणि जो काम टाळेल त्याच्या हातून चूक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण झालेली चूक जाणतेपणी केली की अजाणतेपणी याचा निर्णय राज्यकर्त्यांना करता आला पाहिजे. आज मात्र कामही करा आणि थोडी जरी चूक झाली तरी फटके खा पण काम कसे करा हे आम्ही स्पष्टपणे सांगणार नाही अशी स्थिती निर्माण झाली असून या काळात वारंवार जे काही प्रकार घडत आहेत ते पाहाता आता गडकरी जे करु पाहात आहेत, ते लोक अगोदरच करुन मोकळे होताना दिसत आहेत.