शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

‘निरवानिरव’ मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:40 IST

पंजाब नॅशनल बँकेला २० हजार कोटी रुपयांनी बुडवणा-या नीरव मोदीचे अनेक अपराध ओळीने नोंदविणाºया एका ज्येष्ठ व्यंगचित्रकाराने त्याचा सर्वात मोठा अपराध ‘नरेंद्र मोदींना निरवानिरव मोदी करणे’ हा असल्याचे म्हटले आहे.

पंजाब नॅशनल बँकेला २० हजार कोटी रुपयांनी बुडवणा-या नीरव मोदीचे अनेक अपराध ओळीने नोंदविणाºया एका ज्येष्ठ व्यंगचित्रकाराने त्याचा सर्वात मोठा अपराध ‘नरेंद्र मोदींना निरवानिरव मोदी करणे’ हा असल्याचे म्हटले आहे. मल्ल्या पळाला, ललित मोदी पळाला आणि आता नीरव मोदी पळाला. नरेंद्र मोदी या सर्व अपराध्यांच्या पलायनाबाबत मौन पाळताना दिसले. एवढे मोठे आर्थिक गुन्हे त्यांच्या सरकारच्या डोळ्यादेखत होत असताना त्याविषयी बोलण्याचे सोडून ते देशाला एकापेक्षा एक मोठी आणि अविश्वसनीय वाटावी अशी आश्वासने देतानाच अधिक दिसले. बोफोर्सचा तथाकथित घोटाळा ६७ कोटींचा होता तरी मोदींच्या पक्षाने तो ३७ वर्षे उगाळला. त्यांच्या सरकारवर राफेल विमानांच्या खरेदीत झालेला घोटाळा २२ हजार कोटी रुपयांचा असल्याचा आरोप सारे विरोधी पक्ष आता करीत आहेत. मोदी त्याहीविषयी कधी बोलत नाहीत. किंबहुना सरकारवर होणाºया गंभीर आरोपांना आणि त्याच्या प्रशासनातील उघड होणाºया घोटाळ्यांना सरळ उत्तर देण्याऐवजी काँग्रेस पक्ष व त्याची जुनी राजवट यांच्याविषयी देशात व विदेशातही टीकाखोरी करण्यातच त्यांनी त्यांचे वक्तृत्व आजवर झिजवलेले दिसले आहे. त्यांच्या सरकारातील अलीकडच्या घोटाळ्यांबाबत ते व सरकारातील संबंधित खाती कोणत्या कारवाया करीत आहे याहीविषयी ते आणि त्यांचे प्रवक्ते गप्प राहण्यातच समाधान मानत आहे. विरोधकांवर आरोप केले की आपल्या पापांचे परिमार्जन आपोआपच होते हा त्या साºयांनी मनोमन बाळगलेला समज खरा नाही. जनतेला मौनाचा अर्थ कळतो आणि जोरकस बोलण्यातील असत्यही समजते. मोदींच्या सरकारातील माणसे सारेकाही व्यवस्थित व सुरळीत चालले आहे असे भासविण्याचा प्रयत्न त्यांच्या भाषणातून व त्यातील खºयाखोट्या आश्वासनातून करताना दिसतात. काही काळापूर्वी केंद्र सरकारातील कायदेपंडित म्हणून ओळखले जाणारे एक ज्येष्ठ मंत्री नागपूर या महाराष्ट्राच्या उपराजधानीत आले. त्यांना त्यांचे मित्र असलेल्या एका ज्येष्ठ स्थानिक कायदेपंडिताने त्यांच्या सरकारच्या अशा मौनाविषयी खडसावून प्रश्न विचारला तेव्हा ते हताशपणे म्हणाले ‘आम्ही केवळ आमच्या खात्यांचे हेडक्लार्क आहोत, सारे निर्णय पंतप्रधानांचे कार्यालय व ते स्वत:च घेतात. आमच्याकडे तयार निर्णयच तेवढे अंमलबजावणीसाठी येत असतात. पक्ष म्हणून त्यांचे समर्थन करायचे आणि मंत्री म्हणून त्यांची अंमलबजावणी करायची एवढेच आमच्या हाती आहे.’ एका ज्येष्ठ मंत्र्याचे सरकारातील हे हतबलपण एकूण सरकार व प्रशासन यांना झालेला पक्षाघात सांगणारे आहे. मोदी सरकारचे सारे निर्णय मोदी हे एकटेच घेतात याविषयी राष्ट्रीय नियतकालिकांनी बरेचदा लिहिले आहे. त्याला सरकारातील एकाही मंत्र्याने कधी उत्तर दिल्याचे दिसले नाही. जी माणसे चांगल्याचे समर्थन करीत नाहीत ती आपल्या लोकप्रियतेला बाधा आणणाºया निर्णयाचे समर्थन तरी कसे करणार आणि सरकारच्या चुकीच्या निर्णयांवर निरवानिरवीचे पांघरूण तरी कसे घालणार? नोटाबंदीचा निर्णय जनतेच्या विरुद्ध गेला. त्या निर्णयाने देशात सव्वाशेहून अधिक लोकांचा बळी घेतला. मात्र सरकारातील एकानेही त्या बळी गेलेल्यांविषयी सहानुभूतीचा चकार शब्द कधी काढला नाही. जीएसटीच्या निर्णयाने देशात महागाई वाढविली, व्यापाºयांवर कमालीचे निर्बंध आणून त्यांना जास्तीची कागदपत्रे तयार ठेवायला भाग पाडले गेले. मात्र त्याही निर्णयाविषयी सरकार पक्षातील कुणी जनतेकडे क्षमायाचना केली नाही आणि त्याविषयी कुणी बोलतानाही दिसले नाही. बँकांचे घोटाळे झाले आणि सरकार गप्प राहिले. पाकिस्तानने या एकाच वर्षात ८०० हून अधिकवेळा भारताच्या सीमेचा भंग केला, त्यात अनेक लष्करी जवानांना हौतात्म्य पत्करावे लागल्याचे दिसले. मात्र याहीबाबत एका लष्कर प्रमुखाखेरीज सरकारतील कुणी कधी बोलले नाहीत. त्याचमुळे उपरोक्त व्यंगचित्रकाराने या सरकारला ‘निरवानिरव करणारे मोदी सरकार’ म्हटले ते सार्थक आहे असेच म्हणणे भाग आहे.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाPunjab National Bankपंजाब नॅशनल बँक