शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

‘निरवानिरव’ मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:40 IST

पंजाब नॅशनल बँकेला २० हजार कोटी रुपयांनी बुडवणा-या नीरव मोदीचे अनेक अपराध ओळीने नोंदविणाºया एका ज्येष्ठ व्यंगचित्रकाराने त्याचा सर्वात मोठा अपराध ‘नरेंद्र मोदींना निरवानिरव मोदी करणे’ हा असल्याचे म्हटले आहे.

पंजाब नॅशनल बँकेला २० हजार कोटी रुपयांनी बुडवणा-या नीरव मोदीचे अनेक अपराध ओळीने नोंदविणाºया एका ज्येष्ठ व्यंगचित्रकाराने त्याचा सर्वात मोठा अपराध ‘नरेंद्र मोदींना निरवानिरव मोदी करणे’ हा असल्याचे म्हटले आहे. मल्ल्या पळाला, ललित मोदी पळाला आणि आता नीरव मोदी पळाला. नरेंद्र मोदी या सर्व अपराध्यांच्या पलायनाबाबत मौन पाळताना दिसले. एवढे मोठे आर्थिक गुन्हे त्यांच्या सरकारच्या डोळ्यादेखत होत असताना त्याविषयी बोलण्याचे सोडून ते देशाला एकापेक्षा एक मोठी आणि अविश्वसनीय वाटावी अशी आश्वासने देतानाच अधिक दिसले. बोफोर्सचा तथाकथित घोटाळा ६७ कोटींचा होता तरी मोदींच्या पक्षाने तो ३७ वर्षे उगाळला. त्यांच्या सरकारवर राफेल विमानांच्या खरेदीत झालेला घोटाळा २२ हजार कोटी रुपयांचा असल्याचा आरोप सारे विरोधी पक्ष आता करीत आहेत. मोदी त्याहीविषयी कधी बोलत नाहीत. किंबहुना सरकारवर होणाºया गंभीर आरोपांना आणि त्याच्या प्रशासनातील उघड होणाºया घोटाळ्यांना सरळ उत्तर देण्याऐवजी काँग्रेस पक्ष व त्याची जुनी राजवट यांच्याविषयी देशात व विदेशातही टीकाखोरी करण्यातच त्यांनी त्यांचे वक्तृत्व आजवर झिजवलेले दिसले आहे. त्यांच्या सरकारातील अलीकडच्या घोटाळ्यांबाबत ते व सरकारातील संबंधित खाती कोणत्या कारवाया करीत आहे याहीविषयी ते आणि त्यांचे प्रवक्ते गप्प राहण्यातच समाधान मानत आहे. विरोधकांवर आरोप केले की आपल्या पापांचे परिमार्जन आपोआपच होते हा त्या साºयांनी मनोमन बाळगलेला समज खरा नाही. जनतेला मौनाचा अर्थ कळतो आणि जोरकस बोलण्यातील असत्यही समजते. मोदींच्या सरकारातील माणसे सारेकाही व्यवस्थित व सुरळीत चालले आहे असे भासविण्याचा प्रयत्न त्यांच्या भाषणातून व त्यातील खºयाखोट्या आश्वासनातून करताना दिसतात. काही काळापूर्वी केंद्र सरकारातील कायदेपंडित म्हणून ओळखले जाणारे एक ज्येष्ठ मंत्री नागपूर या महाराष्ट्राच्या उपराजधानीत आले. त्यांना त्यांचे मित्र असलेल्या एका ज्येष्ठ स्थानिक कायदेपंडिताने त्यांच्या सरकारच्या अशा मौनाविषयी खडसावून प्रश्न विचारला तेव्हा ते हताशपणे म्हणाले ‘आम्ही केवळ आमच्या खात्यांचे हेडक्लार्क आहोत, सारे निर्णय पंतप्रधानांचे कार्यालय व ते स्वत:च घेतात. आमच्याकडे तयार निर्णयच तेवढे अंमलबजावणीसाठी येत असतात. पक्ष म्हणून त्यांचे समर्थन करायचे आणि मंत्री म्हणून त्यांची अंमलबजावणी करायची एवढेच आमच्या हाती आहे.’ एका ज्येष्ठ मंत्र्याचे सरकारातील हे हतबलपण एकूण सरकार व प्रशासन यांना झालेला पक्षाघात सांगणारे आहे. मोदी सरकारचे सारे निर्णय मोदी हे एकटेच घेतात याविषयी राष्ट्रीय नियतकालिकांनी बरेचदा लिहिले आहे. त्याला सरकारातील एकाही मंत्र्याने कधी उत्तर दिल्याचे दिसले नाही. जी माणसे चांगल्याचे समर्थन करीत नाहीत ती आपल्या लोकप्रियतेला बाधा आणणाºया निर्णयाचे समर्थन तरी कसे करणार आणि सरकारच्या चुकीच्या निर्णयांवर निरवानिरवीचे पांघरूण तरी कसे घालणार? नोटाबंदीचा निर्णय जनतेच्या विरुद्ध गेला. त्या निर्णयाने देशात सव्वाशेहून अधिक लोकांचा बळी घेतला. मात्र सरकारातील एकानेही त्या बळी गेलेल्यांविषयी सहानुभूतीचा चकार शब्द कधी काढला नाही. जीएसटीच्या निर्णयाने देशात महागाई वाढविली, व्यापाºयांवर कमालीचे निर्बंध आणून त्यांना जास्तीची कागदपत्रे तयार ठेवायला भाग पाडले गेले. मात्र त्याही निर्णयाविषयी सरकार पक्षातील कुणी जनतेकडे क्षमायाचना केली नाही आणि त्याविषयी कुणी बोलतानाही दिसले नाही. बँकांचे घोटाळे झाले आणि सरकार गप्प राहिले. पाकिस्तानने या एकाच वर्षात ८०० हून अधिकवेळा भारताच्या सीमेचा भंग केला, त्यात अनेक लष्करी जवानांना हौतात्म्य पत्करावे लागल्याचे दिसले. मात्र याहीबाबत एका लष्कर प्रमुखाखेरीज सरकारतील कुणी कधी बोलले नाहीत. त्याचमुळे उपरोक्त व्यंगचित्रकाराने या सरकारला ‘निरवानिरव करणारे मोदी सरकार’ म्हटले ते सार्थक आहे असेच म्हणणे भाग आहे.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाPunjab National Bankपंजाब नॅशनल बँक