शहरं
Join us  
Trending Stories
1
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
2
बंगालमध्ये आणखी एक सामूहिक बलात्कार, सातवीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; तिघांना अटक
3
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
4
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
5
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
6
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
7
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
8
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
9
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
10
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
11
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
12
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
13
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
14
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
15
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
16
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
17
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
18
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
19
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
20
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी

निर्मलाताई, यावर्षी प्राप्तिकरदात्यांचे एवढे तरी ऐका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 13:57 IST

प्राप्तिकर आकारणीच्या सध्याच्या दोन पद्धतींतून एका पद्धतीची निवड करणे करदात्यांसाठी अव्यवहार्य, जोखमीचे आहे. त्यात मूलभूत सुधारणा आवश्यक!

ॲड. कांतीलाल तातेड

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेला सादर करतील. त्यांनी प्राप्तिकर आकारणीच्या सध्याच्या दोन पद्धतींतून एका पद्धतीची निवड करण्यासंबंधीची तरतूद रद्द करून पूर्वीप्रमाणेच वजावटीसह प्राप्तिकर आकारण्याची एकच पद्धत चालू ठेवणे व त्यातही मूलभूत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षापर्यंत विविध वजावटीसह प्राप्तिकर आकारणीची एकच पद्धत अस्तित्वात होती. परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून वजावटविरहित प्राप्तिकर आकारणीची नवीन पर्यायी पद्धत लागू करून या दोन पद्धतींपैकी एका पद्धतीची निवड करण्याचा पर्याय प्राप्तिकरदात्यांना दिला. या नवीन पद्धतीनुसार प्राप्तिकर आकारणीचे दर काही प्रमाणात कमी करण्यात आले. परंतु त्याचवेळी प्राप्तिकरदात्यांना जुन्या पद्धतीनुसार मिळत असलेल्या ७० वजावटी काढून घेण्यात आल्या. तसेच ज्येष्ठ व अतिज्येष्ठ प्राप्तिकरदात्यांना अनुक्रमे तीन लाख व पाच लाख रुपयांची मिळत असलेली प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा २.५० लाख रुपये करण्यात आली. पगारदारांना दोन्हीपैकी कोणताही एक पर्याय स्वीकारण्याची मुभा सध्या दिलेली असली तरी धंदा-व्यवसायाचे उत्पन्न असणाऱ्या प्राप्तिकरदात्यांना मात्र त्यांनी एकदा स्वीकारलेला पर्याय पुन्हा बदलता येणार नाही.

मुळात सर्व प्राप्तिकरदात्यांसाठी प्राप्तिकर आकारणीची एकच पद्धत अस्तित्वात असणे व ती सर्वांना समानतेने लागू करणे हे कोणत्याही करप्रणालीचे मूलभूत तत्त्व आहे. कोणतीही करप्रणाली सर्वसामान्य प्राप्तिकरदात्यांना समजण्यास अत्यंत सुलभ, सोपी व सुटसुटीत असावी लागते. मात्र भारतात प्राप्तिकर कायदा किचकट, क्लिष्ट व अन्यायकारक झालेला आहे. त्यात अनेक विसंगती आहेत. आपले करदायित्व ठरविताना सरकारचे भविष्यातील सतत बदलणारे प्राप्तिकर व गुंतवणूकविषयक धोरण तसेच आर्थिक बदलांचा वेध घेऊन भविष्यात कर भरण्याचा कोणता पर्याय आर्थिकदृष्ट्या अधिक लाभदायक ठरेल यासंबंधीचा विकल्प आज निवडणे कठीणच आहे; शिवाय अशा अनिश्चित स्वरूपाचा पर्याय निवडण्याची प्राप्तिकरदात्यांवर सक्ती करणे घटनाबाह्य आहे. प्राप्तिकर आकारणीच्या पहिल्या पद्धतीनुसार प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ न करता सरकारने २०१९-२० या आर्थिक वर्षापासून ज्या प्राप्तिकरदात्यांचे करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८७(अ) अन्वये कमाल १२,५०० रुपयांची सूट देण्यास सुरुवात केली. त्यामुळे ज्या प्राप्तिकरदात्यांचे करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपर्यंत आहे त्यांना प्राप्तिकर भरावा लागत नाही. परंतु प्राप्तिकरदात्यांच्या करपात्र उत्पन्नात पाच लाख रुपयांपेक्षा थोडी जरी वाढ झाली तर, त्यांना मात्र २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या सर्व रकमेवर प्राप्तिकर भरावा लागतो. उदा. प्राप्तिकरदात्यांचे उत्पन्न पाच लाख दहा रुपये जरी झाले तरी त्यांना त्या १० रुपयांच्या जास्त उत्पन्नासाठी १३,००३ रुपये प्राप्तिकर भरावा लागतो. परंतु जर, त्याने प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८०(सी) अंतर्गत किरकोळ रकमेची गुंतवणूक केली तर, त्याला १२,५०० रुपयांची सूट मिळते व त्याला एक रुपयाही प्राप्तिकर भरावा लागत नाही. त्यामुळे सरकारने अशी सूट देण्याऐवजी जर, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादाच पाच लाख केली असती तर, अशा विसंगती निर्माण झाल्या नसत्या. 

प्राप्तिकर कायद्यातील ‘११५ बीएसी’ या नव्या कलमान्वये, प्राप्तिकर कायद्यानुसार मिळणाऱ्या ७० वजावटींपैकी कोणतीही वजावट न घेता कमी दराने प्राप्तिकर भरण्याचा दुसरा पर्याय प्राप्तिकरदात्यांना दिलेला आहे. हा पर्याय स्वीकारणाऱ्यांना प्रमाणित वजावट, व्यवसाय कर, गृहकर्जावरील व्याज व कलम ८०(क) अंतर्गत मिळणारी १.५० लाख रुपयेपर्यंतची सवलत अशा एकूण ७० वजावटींपैकी कोणतीही वजावट मिळत नाही.घटनेच्या अनुच्छेद २७६ अन्वये प्राप्त अधिकारांतर्गत राज्य सरकारे उत्पन्नावर आधारित ‘व्यवसाय कर’ वसूल करीत असतात. ‘करावर कर नको’ म्हणून प्राप्तिकरातून ‘व्यवसाय करा’च्या रकमेला वजावट दिली जात असते. त्यामुळे कमी दराने प्राप्तिकराची आकारणी हवी असल्यास त्यांना विविध वजावटींच्या हक्कांपासून वंचित करणे अयोग्य व अन्यायकारक आहे. अर्थमंत्र्यांनी प्राप्तिकर आकारणीच्या सध्याच्या दोन पद्धतींतून एका पद्धतीची निवड करण्यासंबंधीची तरतूद रद्द करून मूलभूत सुधारणांच्या आधारे पूर्वीचीच वजावटीसह प्राप्तिकर आकारणीची पद्धत चालू ठेवणे आवश्यक आहे.

( लेखक अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत)kantilaltated@gmail.com

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनEconomyअर्थव्यवस्थाBudgetअर्थसंकल्प