शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
2
आशिष शेलार मुंबई, शिरीष बोराळकर छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष; भाजपाकडून ८१ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर
3
मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती

देश बुडविणारे नवे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 05:14 IST

पुढच्या १० वर्षांतच नागपूर विमानतळाच्या महसुलात सतत वाढ होणार आहे. असे असताना या विमानतळासाठी एकही विदेशी कंपनी पुढे आली नाही यातली आतली मेख म्हणजे जीएमआर व जीव्हीके या दोन कंपन्यांचे संगनमत ही आहे.

कुठल्याही सरकारी मालमत्तेचे/संस्थेचे खासगीकरण त्या संस्थेला स्पर्धेत सक्षम बनविण्यासाठी व ग्राहक सेवा सुधारण्यासाठी होत असते, त्यामुळे खासगीकरणाला विरोध असण्याचे कारण नाही. पण नुकत्याच झालेल्या नागपूरविमानतळाच्या संशयास्पद खासगीकरणामुळे असे ठामपणे म्हणता येत नाही. नागपूरचेविमानतळ हैदराबादच्या जीएमआर एअरपोर्ट्स या खासगी कंपनीला फक्त ५.७६ टक्के महसूल वाटा घेण्याच्या बोलीवर सरकार ३० वर्षांसाठी देण्याच्या बेतात आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार संशयास्पद झाला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे यापूर्वीही दिल्ली, मुंबई, हैदराबाद व बंगळुरू या चार विमानतळांचे खासगीकरण झाले आहे. त्या वेळी दिल्ली विमानतळासाठी जीएमआर याच कंपनीने ४७ टक्के महसूल वाटा दिला आहे तर मुंबईच्या विमानतळासाठी जीव्हीके या कंपनीने ४० टक्के वाटा सरकारला दिला आहे. या दोन्ही विमानतळांसाठी जीएमआर व जीव्हीके या कंपन्यांनी विमानतळ चालविण्याचा अनुभव असलेल्या दक्षिण आफ्रिका, जर्मनी, मलेशियातल्या विदेशी कंपन्यांच्या भागीदारीत या निविदा भरल्या होत्या. याशिवाय सर्व विमानतळांमध्ये एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचीही भागीदारी दिली होती. परंतु नागपूरच्या बाबतीत जीएमआरनेकुठल्याही विदेशी कंपनीला सोबत घेतले नाही वा एएआयलासुद्धा विश्वासात घेतलेले दिसत नाही. नागपूर विमानतळ हे सध्या सुरळीत सुरू असलेले विमानतळ आहे. त्यामुळे जीएमआरला आयता महसूल मिळणार आहे. निविदेप्रमाणे जीएमआरला एक टर्मिनल बिल्डिंग, ४ किमीचा रनवे, विमानाच्या पार्किंग बेज, अ‍ॅप्रन्स तयार करायचे आहेत. याचा प्रकल्प खर्च १६८५ कोटी आहे. याशिवाय २५० एकरांवर पंचतारांकित हॉटेल्स, शॉपिंग मॉल, फूड प्लाझा, मल्टिप्लेक्स सिनेमा/थिएटर बांधायचा अधिकार मिळणार आहे. विमानांचे लँडिंग, पार्किंग, वाहनतळाचा महसूल तर जीएमआरला मिळणार आहेच शिवाय २५० एकरांवरील व्यावसायिक संकुलांचा हजारो कोटींचा महसूल फक्त १६८५ कोटी गुंतवून जीएमआरला ३० वर्षे मिळणार आहे. १६८५ कोटींची गुंतवलेली रक्कम जीएमआर युझर डेव्हलपमेंट चार्जमधून प्रवाशांकडूनच वसूल करणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे ५.७६ टक्के म्हणजे जवळपास फुकटात नागपूर विमानतळ जीएमआरला मिळणार आहे. करारात ३० वर्षे मुदतवाढीची तरतूद असल्याने जीएमआर ६० वर्षांपर्यंत हा फुकटचा मलिदा लाटणार आहे. जीएमआरवर ही मेहरबानी कशासाठी हा गहन प्रश्न आहे. नागपूर विमानतळ हे नफ्यात चालणारे विमानतळ आहे. आज २२ लाख प्रवासी ते वापरत असले तरी पुढच्या १० वर्षांतच प्रवासी संख्या मुंबई विमानतळाएवढी होणार आहे व महसुलात सतत वाढ होणार आहे. त्यामुळे नागपूर विमानतळाचा नफाही वाढणार आहे. असे असताना या विमानतळासाठी एकही विदेशी कंपनी पुढे आली नाही, यातली आतली मेख म्हणजे जीएमआर व जीव्हीके या दोन कंपन्यांचे संगनमत (कार्टेल) ही आहे. या दोन्ही कंपन्या एकमेकांना सोयीच्या निविदा भरून देशातील विमानतळ वाटून घेत आहेत. दिल्ली आणि हैदराबाद विमानतळ जीएमआरकडे आणि मुंबई हे विमानतळ जीव्हीकेने अशाच संगनमताने घेतले आहे. एवढेच नव्हे तर नवी मुंबईत होऊ घातलेल्या नव्या विमानतळाचे कंत्राट जीव्हीकेला देण्यासाठी जीएमआरला गोवा आणि नागपूरच्या विमानतळाचे संचालन ६० वर्षांकरिता मिळाले आहे, असे म्हणायला वाव आहे. त्यामुळे हे अनिष्ट संगनमत देश बुडविणारे नवे पाऊल ठरणार आहे. जीएमआर व जीव्हीकेने उभे केलेले विमानतळ व त्यांचे संचालन, प्रवासी सोयी जागतिक दर्जाच्या आहेत हे मान्य. पण जनतेच्या पैशातून उभे झालेले हे विमानतळ अशा प्रकारे संगनमत करून या कंपन्या लाटत असतील तर त्याचा विरोध व्हायलाच हवा. या सर्व कारणांमुळे नागपूर विमानतळाच्या खासगीकरणाची प्रक्रिया संशयास्पद झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे व ही निविदा रद्द करून नव्याने निविदा बोलावणे आवश्यक आहे.

टॅग्स :Airportविमानतळnagpurनागपूर