शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कागदावर उत्तम; पण…

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2024 07:24 IST

गत काही काळापासून नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरून शैक्षणिक क्षेत्रात बरेच चर्वितचर्वण सुरू आहे.

गत काही काळापासून नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरून शैक्षणिक क्षेत्रात बरेच चर्वितचर्वण सुरू आहे. नव्या धोरणातील विभिन्न बिंदू समोर येत आहेत. सोबतच त्यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक पैलूंवर चर्चाही रंगत आहेत. नवे धोरण लागू करण्याच्या दिशेने आगामी शैक्षणिक सत्रापासून जे मोठे बदल होऊ घातले आहेत, त्यांचे स्वरूप स्पष्ट झाले आहे. नव्या धोरणात मातृभाषेतून शिक्षणावर जोर आहे. त्या अनुषंगाने इयत्ता पहिली ते बारावीच्या प्रत्येक विषयाचे २२ प्रादेशिक भाषांमधून धडे देणाऱ्या डीटीएच तंत्रज्ञानावर आधारित तब्बल २०० वाहिन्या सुरू करण्यात येणार आहेत. 

नजीकच्या भविष्यात त्या यू-ट्यूब, तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध होतील. शिक्षकांची अध्यापन कौशल्ये सामान दर्जाची असावी, याचीही काळजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षकांचा स्तर व क्षमता परिभाषित करणे, त्यांचे मूल्यांकन करणे, आवश्यक ते प्रशिक्षण देणे, गरज भासल्यास त्यांना मार्गदर्शक उपलब्ध करवून देणे, इत्यादी पावले उचलण्यात येणार आहेत. त्याशिवाय विद्या समीक्षा केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. त्यामध्ये विद्यार्थी उपस्थिती, निकाल, मध्यान्ह भोजन, तसेच इतर सुविधांचा ‘रिअल टाइम डेटा’ असेल. याखेरीज देशातील ६१३ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था म्हणजेच ‘डायट’चा दर्जा उंचावण्यात येणार असून, येत्या पाच वर्षांत त्यांचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये रूपांतर केले जाईल. थोडक्यात, आतापर्यंत केवळ चर्चाच सुरु असलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची घडी नजीक येऊन ठेपली आहे. हे अत्यंत महत्त्वाकांक्षी धोरण असून, २०४७ पर्यंत विकसित देशांच्या श्रेणीत स्थानापन्न होण्याच्या स्वप्नाच्या पूर्ततेमध्ये त्याचा मोठा वाटा असणार आहे. 

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत राबविण्यात आलेल्या पाठांतरावर आधारित शिक्षणप्रणालीपासून आकलन क्षमता आणि कौशल्य विकासावर आधारित शिक्षणप्रणालीकडे वाटचाल करण्यासाठी देश सिद्ध होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक बाणा निर्माण करणे, त्यांच्या कल्पकतेला वाव देणे आणि कौशल्य विकासास चालना देणे, हा नव्या धोरणाचा प्रमुख उद्देश आहे; पण प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते, यावरच त्याचे यश अवलंबून असणार आहे. नव्या धोरणात मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्रावर भर देतानाच, विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने, व्यावसायिक प्रशिक्षण आणि कलेची सांगड घालण्याकडेही लक्ष देण्यात येणार आहे. पाचव्या इयत्तेपर्यंत मातृभाषा अथवा प्रादेशिक भाषांमधून शिक्षण देण्यावर भर असेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे विषयांची सांगड घालून शिक्षण घेण्याची मुभा असेल. 

प्रचलित घोकमपट्टीऐवजी विद्यार्थ्यांच्या चिकित्सक बुद्धीला चालना देऊन त्यांच्यात समस्यांच्या सोडवणुकीची कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला जाईल. हे सगळे करायचे म्हणजे सर्वप्रथम शिक्षकांना प्रशिक्षित करावे लागेल. त्यासाठी शिक्षक प्रशिक्षणावर भर देण्यात येणार असून, चार वर्षांचा एकात्मिक शिक्षण पदवी अभ्यासक्रम (बी.एड.) सुरू करण्यात येणार आहे. हे सर्व कागदावर उत्तम वाटत असले तरी, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी हे एक मोठेच आव्हान सिद्ध होणार आहे. तुटपुंजी संसाधने हा सर्वात मोठा अडथळा असेल. नव्या पायाभूत सुविधांची निर्मिती करावी लागेल. शाळा तंत्रज्ञानस्नेही बनवाव्या लागतील. दर्जेदार शिक्षकांची फौज निर्माण करण्यासाठी त्यांच्या उत्तम प्रशिक्षणाची सोय करावी लागेल. नव्या साच्यातील नवे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आधी शिक्षकांना तयार करावे लागेल. त्यासाठी शिक्षक प्रशिक्षण संस्थांमध्ये आमूलाग्र बदल करून त्यांची फेरउभारणी करावी लागेल. नव्या पिढीला शिक्षकी पेशाकडे आकृष्ट करून त्यामध्ये टिकवून ठेवण्यासाठी स्पर्धात्मक वेतनश्रेणी आणि आजवर देशात इंग्रजीला प्रोत्साहन देण्यात आले. यापुढे प्रादेशिक भाषांना चालना द्यायची झाल्यास लोकांच्या मानसिकतेपासून अभ्यासक्रमांपर्यंत आमूलाग्र बदल करावे लागतील. 

नवा दृष्टिकोन आणि नव्या अभ्यासक्रमांना साजेशी नवी परीक्षाप्रणालीही विकसित करावी लागणार आहे. त्याशिवाय नाही रे वर्गातील विद्यार्थ्यांना नव्या बदलांशी जुळवून घेणे कठीण वाटून ते शिक्षणाच्या प्रवाहातून बाजूला फेकले जाण्याच्या भीतीचे निराकरण करावे लागेल. ही सगळी आव्हाने खचितच सोपी नाहीत. सरकार, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, शिक्षक, पालक, विद्यार्थी हे सर्व घटक ती किती समर्थपणे पेलतात, यावरच नव्या शैक्षणिक धोरणाचे फलित आणि अर्थातच देशाचे भविष्यही अवलंबून असेल!

 

टॅग्स :Educationशिक्षण