शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

सहकार-टॅक्सी ते घंटागाडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 04:34 IST

भारतात कोट्यवधी जनतेसाठी नवे राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर झाले.  

आपल्या दारात सहकारी रिक्षा, टॅक्सी येऊन उभी राहिली. कचरा उचलण्यासाठी सहकारी घंटागाडी आली. सहकारी प्लंबर, वायरमन आला. सहकारी दूध आले. सहकारी भाजीपाला आला. तर? कदाचित ही मोठी सहकार क्रांती असेल. हे शक्यही आहे. परवा भारत व ब्रिटनमध्ये मुक्त करार झाला. त्याच दिवशी इकडे भारतात कोट्यवधी जनतेसाठी नवे राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर झाले.  

भारत-ब्रिटन करार महत्त्वाचाच; पण त्याहीपेक्षा या देशातील प्रत्येक नागरिकाचे जीवन आमूलाग्र बदलू शकेल, अशी ताकद कशात असेल तर ती सहकारात. म्हणून सहकार धोरण मोलाचे; पण ते विशेष चर्चेत नाही. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर नोव्हेंबर १९६० मध्ये विधिमंडळाचे पहिले अधिवेशन झाले. या पहिल्याच अधिवेशनात सहकार मंत्री बाळासाहेब भारदे यांनी ‘महाराष्ट्र सहकारी संस्था विधेयक’ मांडले. त्यावर भाष्य करताना ते म्हणाले होते, ‘या देशाची प्रकृतीच मूलत: सहकाराची आहे. सहकार आणि संस्कृती हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. ते वेगळेच करता येत नाहीत.’ माणसाची जीवनशैलीच सहकारी तत्त्वावर आधारलेली आहे. ‘सहनौ भुनक्तु’ असे ते तत्त्व आहे. म्हणजे माणूस एकत्र जगण्यास समर्थ बनो. सहकार हे नैसर्गिक तत्त्व आहे. निसर्ग सर्वांचा, तशी येथील साधने सर्वांची हवीत. 

दुर्दैवाने सहकार काँग्रेसने आणला व त्यांनीच तो नासवला असा एक अपप्रचार आपणाकडे झाला. सहकार क्षेत्र हे नेते व त्यांच्या घराण्यांच्या उद्धारासाठी आहे, असाही गैरसमज समाजाने करून घेतला. वास्तविकत: महाराष्ट्रात १८७२ मध्ये सावकारशाहीविरोधात जे दंगे झाले त्यातून सहकार जन्मला. सहकाराचा जन्म महाराष्ट्रात झाला. कर्जाची नड परस्पर सहकार्याने भागवण्यासाठी  १८८९ मध्ये ‘अन्योन्य सहकारी मंडळी’ नावाची सहकारी संस्था राज्यात स्थापन झाली होती. गेल्या पन्नास-साठ वर्षांत सहकाराच्या पुलाखालून बरेच पाणी वाहिले. त्याच्या क्षमतेपेक्षा त्यातील घोटाळ्यांची चर्चा अधिक झडली. सहकार खासगी कंपनीसारखा वापरला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ जुलै २०२१ रोजी केंद्रात सहकार मंत्रालय स्थापन केले. या खात्याचे मंत्री अमित शाह यांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधत परवा ‘राष्ट्रीय सहकार धोरण २०२५’ मांडले. या धोरणात सहकार पारदर्शी, डिजिटल करण्यापासून तो घराघरांत पोहोचविण्यापर्यंतची उद्दिष्टे आहेत. 

सध्या देशातील ३० कोटी जनता सहकारी संस्थांशी जोडलेली आहे. २०३५ पर्यंत हा आकडा ५० कोटींवर नेणे... देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात सहकार क्षेत्राचा वाटा सध्या ३ ते ४ टक्के आहे, तो तिपटीने वाढवणे... देशात सहकारी विद्यापीठाची घोषणा झाली आहेच, यापुढे शालेय अभ्यासक्रमापासून सहकाराचे धडे देणे... शाळा, महाविद्यालयात सहकाराबाबत अभ्यासक्रम आणणे, शिक्षक, प्रशिक्षक निर्माण करणे... सहकारी संस्थांची उत्पादने ब्रॅण्ड बनण्यासाठी कॉर्पोरेट जगताप्रमाणे त्यांना सुविधा देणे... प्रत्येक जिल्ह्यात सहकारी गाव साकारणे... प्रत्येक गावात सहकारी संस्था व प्रत्येक घरात सहकारी संस्थेचा सदस्य असणे, असा अगदी तळागाळात पोहोचण्याचा व प्रत्येक व्यक्तीला सहकाराशी जोडण्याचा विचार या धोरणात दिसतो; पण त्याची अंमलबजावणी कधी व कशी होणार, हेही महत्त्वाचे. त्यासाठी सरकार आणि प्रशासन यांची मानसिकताही महत्त्वाची आहे. 

महाराष्ट्राच्या सहकार विभागाचे उदाहरण घेतले तर हा विभाग नेत्यांचा बटिक बनला आहे. कारण बहुतांश सहकारी संस्था नेत्यांच्या अधिपत्याखाली आहेत. त्यांना दुखावण्याची हिंमत या विभागात नाही. ग्रामीण भागात अनेक सहकारी संस्थांचे दफ्तर कार्यालयाऐवजी संस्थेच्या सचिवाच्या पिशवीत असते. अध्यक्ष, सचिव म्हणतील तशा सहकारी संस्था चालतात व सर्वसाधारण सभेत खाऊचे पुडे घेऊन लोक ठराव संमत करतात. अशावेळी ‘ओला’, ‘उबेर’ऐवजी सहकारी टॅक्सीचे स्वप्न अमित शाह यांनी दाखवले आहे. धोरण नक्कीच स्वागतार्ह व व्यापक आहे. गावातील तरुण बेरोजगार आहेत व खासगी कंपन्यांचे डिलिव्हरी बॉय, ठेकेदार गावात आहेत. गाव, शहरांवर सध्या सहकाराऐवजी ठेकेदारांचे राज्य आहे. 

वास्तविकत: सहकारी संस्था सेवा क्षेत्रात उतरल्या तर ठेकेदारराज संपेल. कुणी एक व्यक्ती, कंपनी नव्हे, तर सहकारी संस्थांचे सभासद समृद्ध होतील; पण सहकाराची ही ताकद जनतेलाही कळायला हवी.

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहCentral Governmentकेंद्र सरकारmurlidhar moholमुरलीधर मोहोळ