शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
5
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
6
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
7
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
8
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
9
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
10
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
11
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
12
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
13
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
14
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
15
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
16
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
17
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
18
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
19
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
20
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”

कर्जमुक्तीचा नवा वायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 15:13 IST

जळगावकर नागरिक खूप सहनशील आहेत. महापालिका गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात असून विकास कामे कासवगतीने सुरु असली तरी ते त्रस्त होत नाहीत, संतापत नाहीत.

जळगावकर नागरिक खूप सहनशील आहेत. महापालिका गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात असून विकास कामे कासवगतीने सुरु असली तरी ते त्रस्त होत नाहीत, संतापत नाहीत. महापालिकेत खान्देश विकास आघाडीला निवडून दिले तर विधानसभा निवडणुकीत भाजपाचा आमदार निवडून दिला. केंद्र व राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार आल्याने सेनेशी जवळीक असलेली आघाडी आणि भाजपा हे दोन्ही पक्ष हातात हात घालून जळगावचा विकास करतील, ही जळगावकरांची अपेक्षा होती. परंतु घडले उलटेच. महापालिकेचे आर्थिक संकट कायम रहावे, असेच प्रयत्न भाजपाचे आमदार आणि त्यांच्या जिल्हा नेत्यांनी केले. महापालिकेच्या गाळ्यांचा प्रश्न सुटल्यास कर्जमुक्ती शक्य आहे, असे तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी खाविआ आणि भाजपाच्या नेत्यांना पटवून दिले. दोन्ही पक्षातील मोजके कार्यकर्ते कापडणीस यांच्या कल्पनाशक्ती, कार्यपध्दती आणि व्यक्तिमत्वाने भारावून गेले होते. गाळ्यांसंबंधी नवनवीन ठरावाचे प्रस्ताव कापडणीस मांडायचे आणि हे कार्यकर्ते आपापल्या नेत्यांच्या गळी ते उतरवायचे. ठराव झाला की, पुन्हा त्याला स्थगिती आणायची क्लृप्ती तेच द्यायचे आणि ठराव स्थगित व्हायचा. गंडवले गेलेले कार्यकर्ते आता ही कबुली खाजगी बैठकांमध्ये देऊ लागले आहे. कापडणीस यांच्या व्यक्तीमत्वाने शहरातील प्रज्ञावंत, गुणवंत, ज्ञानवंत अशी मंडळीही भारावली होती. आयुक्त बंगल्यावर भोजनावळींचे आयोजन करीत जळगावच्या विकासाचे सोनेरी स्वप्न कवी मनाचे कापडणीस दाखवत आणि त्याला ही मंडळी भुलायची. आता कापडणीस हेच सर्व प्रश्नांवर रामबाण उपाय आहेत, असा समज करुन घेण्यात आला. पण तसे काहीही घडले नाही. प्रश्न भिजत ठेवून कापडणीस निघून गेले. पुढे मूळ जळगावकर जीवन सोनवणे आले. निवृत्तीला वर्ष बाकी असल्याने त्यांनी या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे प्रभारी आयुक्तपद सोपविण्यात आले. ११ महिन्यांच्या त्यांच्या कार्यकाळात उच्च न्यायालयाचा कारवाईचा निकाल आणि राज्य शासनाचा कोणतीही स्थगिती नसल्याचा निर्वाळा असे दोन महत्त्वपूर्ण निर्णय आले. गाळेप्रश्न आणि कर्जमुक्ती या दोन विषयांसाठी निंबाळकरांकडे प्रभारी आयुक्तपद सोपविले असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेले सुतोवाच, यामुळे आता प्रश्न सुटणारच असे जळगावकरांना वाटले. कापडणीस यांच्याप्रमाणे निंबाळकर यांनीही प्रज्ञावंत, गुणवंतांची प्रभावळ जमवली आहे. त्यांनीही असाच जोरदार प्रचार चालविला. पण एवढा मोठा कालावधी मिळूनही हा प्रश्न जैसे थे राहिला. उलट गाळेधारकांची दरम्यानच्या काळात संघटना स्थापन झाली. आता चंद्रकांत डांगे यांनी महिनाभरात कर्जमुक्तीचा नवा वायदा केला आहे. तसे होईल, असे मानायला आम्ही आताही तयार आहोतच.

-मिलींद कुलकर्णी

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिका