शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

सांस्कृतिक चळवळीला नवे धुमार

By admin | Updated: January 2, 2016 08:37 IST

मुंबई, पुणे, नाशकात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. कलारसिकांची भूक भागविली जाते. तसे वातावरण खान्देशात नसते, असा तक्रारीचा सूर नेहमी लावला जातो.

- मिलिंद कुलकर्णी मुंबई, पुणे, नाशकात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. कलारसिकांची भूक भागविली जाते. तसे वातावरण खान्देशात नसते, असा तक्रारीचा सूर नेहमी लावला जातो. परंतु अलीकडे सांस्कृतिक चळवळीला नवे धुमारे फुटले आहेत. नव्या दमाचे कलावंत पुढे आल्याने हा बदल घडू लागला आहे. चार-पाच वर्षांपूर्वी राज्य नाट्य स्पर्धेचे जळगावात असलेले केंद्र रंगकर्मींच्या प्रतिसादाअभावी बंद पडण्याच्या मार्गावर होते. ते वाचविण्यासाठी ज्येष्ठ रंगकर्र्मींनी पुढाकार घेऊन तालुका पातळीवर बैठका घेतल्या. नाट्यसंस्थांना प्रोत्साहन दिले. यंदा तब्बल १७ नाटके सादर झाली. डॉ.गिरीश कर्नाड यांच्या ‘हयवदन’पासून तर राहुल बनसोडे या नव्या दमाच्या लेखकाचे ‘अ‍ॅनॉनिमस कंटेट’ या नाटकापर्यंत विविध प्रकारातील नाटके सादर झाली. रंजनासह प्रबोधनदेखील झाले. तब्बल सहा नाटके हाऊसफुल्ल झाली. प्रयोग पाडणे, नेपथ्यासह अन्य कामांमध्ये असहकार्य हे प्रकार बंद होऊन सहभागी नाट्यसंस्थांनी एकमेकाना सहकार्य केल्याचे चित्र या स्पर्धेच्या माध्यमातून दिसून आले. धुळे-नंदुरबारला स्वतंत्र केंद्र नाही. परंतु धुळ्याच्या चार संघांनी नाशिक केंद्रावर सहभाग नोंदविला. चांगली कामगिरी बजावली. यंदाच्या या स्पर्धेमुळे नाट्यचळवळीला नवा आयाम मिळाला. या स्पर्धेपाठोपाठ जळगावात तीन दिवसीय पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा झाली. परिवर्तन आणि पुण्याची महाराष्ट्रीय कलोपासक या संस्था सलग पाच वर्षांपासून ही स्पर्धा घेत आहेत. खान्देश आणि मराठवाड्यातील महाविद्यालयीन तरुणांना या स्पर्धेने नवा रंगमंच उपलब्ध करून दिला आहे. २३ संघ या स्पर्धेत सहभागी झाले, त्यात बहुतांश ग्रामीण भागातील युवक होते, हे विशेष आहे. एकांकिकांसोबतच चित्रप्रदर्शन, कलावंतांच्या मुलाखती असे उपक्रमदेखील रंगले. विवेकानंद प्रतिष्ठान या शिक्षणसंस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त कुमार साहित्य संमेलन आणि दोन दिवसीय कलामहोत्सव उत्साहात झाले. विद्यार्थीच उद्घाटक आणि विद्यार्थीच संमेलनाध्यक्ष असल्याने विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी भरविलेले संमेलन असे त्याचे स्वरूप राहिले. विश्वकोष मंडळाच्या अध्यक्ष डॉ.विजया वाड यांची मुलाखतदेखील विद्यार्थ्यांनीच घेतली. संगीत, नृत्य कलाविष्काराचा सलग १४ वर्षांपासून सुरू असलेला ‘बालगंधर्व संगीत महोत्सव’ यंदा ८ ते १० जानेवारी दरम्यान जळगावात होणार आहे. यंदा पंडिता कलापिनी कोमकली, अमेरिकेतील मनू श्रीवास्तव, पंडिता रेखा नाडगौडा हे कलाविष्कार सादर करणार आहेत. वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठान दरवर्षी या महोत्सवात वैविध्य ठेवण्याचा प्रयत्न करीत असते. त्याचाच भाग म्हणून यंदा ‘संगीत स्वयंवर’ नाटकाला १०० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल मास्टर दीनानाथांच्या गायन शैलीवर आाधारित ‘दिव्य संगीत रवी’ हा कार्यक्रम होणार आहे. नंदुरबार जिल्हा साहित्य अकादमी आणि आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी या दोन संस्था गेल्या पाच वर्षांपासून नंदुरबारात जिल्हा साहित्य संमेलन अखंडितपणे घेत आहेत. यंदा हे संमेलन २४ जानेवारी रोजी होत आहे. ना.धों. महानोर, इंद्रजित भालेराव, उत्तम कांबळे, प्रा.वसंत आबाजी डहाके, डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांच्यासारखे दिग्गज साहित्यिक या संमेलनात सहभागी होणार आहेत. या महिन्यात पारोळा येथील उपेक्षित हस्तशिल्पकार छोटू जडे यांना केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या हस्तशिल्प विभागातर्फे राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. जडे यांच्या देवतेच्या शिल्पाला हा पुरस्कार मिळाला असून हा पुरस्कार मिळविणारे राज्यातील ते एकमेव हस्तशिल्पकार आहेत, हे विशेष. हस्तशिल्पकला जोपासणारी जडे यांची ही सहावी पिढी आहे. ही कला जपण्याची त्यांची धडपड आहे.