शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

निसर्गप्रेमींपुढील नवी आव्हाने

By admin | Updated: June 5, 2016 02:05 IST

आज आहे पंचेचाळीसावा जागतिक पर्यावरण दिन. महाकवी गोएथे शिकवतो की, आसमंतात काय चालले आहे, याचा विचार करताना जगभर आणि इतिहासाच्या ओघात काय चालले आहे, याचा विचार

- माधव गाडगीळआज आहे पंचेचाळीसावा जागतिक पर्यावरण दिन. महाकवी गोएथे शिकवतो की, आसमंतात काय चालले आहे, याचा विचार करताना जगभर आणि इतिहासाच्या ओघात काय चालले आहे, याचा विचार मनात ठेवा. वर लक्षात ठेवा की, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे! आज जगात काय चालले आहे? सगळीकडे आर्थिक विषमता भडकते आहे आणि त्याबरोबरच धनदांडग्यांची पकड. यातून एक खाणमाफिया, रेतीमाफियासारखी अपराधी अर्थव्यवस्था उभी राहते आहे. तिच्या प्रभावाने समाजाची घडी तर विस्कटते आहेच, पण पर्यावरणाची अभूतपूर्व नासाडी सुरू आहे. त्याला आळा घालणे हे निसर्गप्रेमींपुढचे आजचे नवे महत्त्वपूर्ण आव्हान आहे. ठोस उदाहरण घ्यायचे, तर गोव्यातला उफराटा व्यवहार बघा. शाह आयोगानुसार, गोव्यातील खाणींवर कधीही काहीही देखरेख ठेवली गेलेली नाही. त्यामुळे कशाचीही भीती नाही, असे वातावरण निर्माण होऊन खाण चालकांद्वारे बेदरकारपणे पर्यावरण, जीवसृष्टी, शेती, भूजल, ओढे, नद्या, तळी यांचा विध्वंस चालला आहे. अशा अवैध व्यवहारातून किती पैसा निर्माण केला आहे? पस्तीस हजार कोटी रुपये! या अहवालामुळे काही वर्षे गोव्यातला खनिज व्यवसाय ठप्प झाला होता, पण आता तो खुला करायला आरंभ झाला आहे. खुला करताना ज्यांनी मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केला आहे, असे स्पष्ट झाले आहे, त्यांच्याविरुद्ध काहीही कारवाई होण्याची चिन्हे नाहीत. उलट ज्या कावरे गावच्या ग्रामसभेने एकमताने ठराव करून जर खाणकाम पुन्हा सुरू करायचे असेल, तर ते आमच्या सहकारी संस्थेमार्फतच करावे, आम्ही परिसराला सांभाळत, रोजगार निर्माण करत सचोटीने व्यवहार चालवू असा आग्रह धरला आहे, त्यांच्यावरच अत्याचार सुरू आहेत. का? कारण धनदांडग्यांना भीती आहे की, ग्रामसभा खरेच अशा उभ्या राहिल्या, सहकारी संस्था लोकहितासाठी चालवल्या गेल्या, तर आपली सत्ता संपेल. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात सामूहिक वनसंपत्तीच्या व्यवस्थापनात असेच चांगले अनुभव येताहेत, काळजीपूर्वक वापरातून जंगल वाचते आहे, लोकांची आर्थिक स्थिती सुधारते आहे, त्या बरोबरच लोक स्वयंस्फूर्तीने नव्या देवराया प्रस्थापित करताहेत. अशी लोकसहभागी शासनव्यवस्था, अर्थव्यवस्था उभारत, आपण आज देशात जे अद्वा-तद्वा खाणकाम, रेतीउपसा, जंगलतोड, टँकर्स भरण्यासाठी भूजलाचा उपसा असे गैरव्यवहार चालले आहेत, त्यांना आवर घालू शकू, निसर्ग सांभाळण्यासाठी, समाजाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी मोठे योगदान देऊ शकू.लोकसहभागी शासनव्यवस्था, अर्थव्यवस्था उभारण्यात आपल्याला जर यश आले, तर आज देशात जे अद्वा-तद्वा खाणकाम, रेतीउपसा, जंगलतोड, टँकर्स भरण्यासाठी भूजलाचा उपसा असे गैरव्यवहार चालले आहेत, त्यांना आवर घालू शकू. पंचेचाळीसावा पर्यावरण दिन साजरा होताना या दिशेने प्रयत्न व्हावेत.