शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गप्रेमींपुढील नवी आव्हाने

By admin | Updated: June 5, 2016 02:05 IST

आज आहे पंचेचाळीसावा जागतिक पर्यावरण दिन. महाकवी गोएथे शिकवतो की, आसमंतात काय चालले आहे, याचा विचार करताना जगभर आणि इतिहासाच्या ओघात काय चालले आहे, याचा विचार

- माधव गाडगीळआज आहे पंचेचाळीसावा जागतिक पर्यावरण दिन. महाकवी गोएथे शिकवतो की, आसमंतात काय चालले आहे, याचा विचार करताना जगभर आणि इतिहासाच्या ओघात काय चालले आहे, याचा विचार मनात ठेवा. वर लक्षात ठेवा की, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे! आज जगात काय चालले आहे? सगळीकडे आर्थिक विषमता भडकते आहे आणि त्याबरोबरच धनदांडग्यांची पकड. यातून एक खाणमाफिया, रेतीमाफियासारखी अपराधी अर्थव्यवस्था उभी राहते आहे. तिच्या प्रभावाने समाजाची घडी तर विस्कटते आहेच, पण पर्यावरणाची अभूतपूर्व नासाडी सुरू आहे. त्याला आळा घालणे हे निसर्गप्रेमींपुढचे आजचे नवे महत्त्वपूर्ण आव्हान आहे. ठोस उदाहरण घ्यायचे, तर गोव्यातला उफराटा व्यवहार बघा. शाह आयोगानुसार, गोव्यातील खाणींवर कधीही काहीही देखरेख ठेवली गेलेली नाही. त्यामुळे कशाचीही भीती नाही, असे वातावरण निर्माण होऊन खाण चालकांद्वारे बेदरकारपणे पर्यावरण, जीवसृष्टी, शेती, भूजल, ओढे, नद्या, तळी यांचा विध्वंस चालला आहे. अशा अवैध व्यवहारातून किती पैसा निर्माण केला आहे? पस्तीस हजार कोटी रुपये! या अहवालामुळे काही वर्षे गोव्यातला खनिज व्यवसाय ठप्प झाला होता, पण आता तो खुला करायला आरंभ झाला आहे. खुला करताना ज्यांनी मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केला आहे, असे स्पष्ट झाले आहे, त्यांच्याविरुद्ध काहीही कारवाई होण्याची चिन्हे नाहीत. उलट ज्या कावरे गावच्या ग्रामसभेने एकमताने ठराव करून जर खाणकाम पुन्हा सुरू करायचे असेल, तर ते आमच्या सहकारी संस्थेमार्फतच करावे, आम्ही परिसराला सांभाळत, रोजगार निर्माण करत सचोटीने व्यवहार चालवू असा आग्रह धरला आहे, त्यांच्यावरच अत्याचार सुरू आहेत. का? कारण धनदांडग्यांना भीती आहे की, ग्रामसभा खरेच अशा उभ्या राहिल्या, सहकारी संस्था लोकहितासाठी चालवल्या गेल्या, तर आपली सत्ता संपेल. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात सामूहिक वनसंपत्तीच्या व्यवस्थापनात असेच चांगले अनुभव येताहेत, काळजीपूर्वक वापरातून जंगल वाचते आहे, लोकांची आर्थिक स्थिती सुधारते आहे, त्या बरोबरच लोक स्वयंस्फूर्तीने नव्या देवराया प्रस्थापित करताहेत. अशी लोकसहभागी शासनव्यवस्था, अर्थव्यवस्था उभारत, आपण आज देशात जे अद्वा-तद्वा खाणकाम, रेतीउपसा, जंगलतोड, टँकर्स भरण्यासाठी भूजलाचा उपसा असे गैरव्यवहार चालले आहेत, त्यांना आवर घालू शकू, निसर्ग सांभाळण्यासाठी, समाजाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी मोठे योगदान देऊ शकू.लोकसहभागी शासनव्यवस्था, अर्थव्यवस्था उभारण्यात आपल्याला जर यश आले, तर आज देशात जे अद्वा-तद्वा खाणकाम, रेतीउपसा, जंगलतोड, टँकर्स भरण्यासाठी भूजलाचा उपसा असे गैरव्यवहार चालले आहेत, त्यांना आवर घालू शकू. पंचेचाळीसावा पर्यावरण दिन साजरा होताना या दिशेने प्रयत्न व्हावेत.