शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

नेताजींची ‘मनशा’

By admin | Updated: December 6, 2015 22:20 IST

भले काही काळापुरते का होईना, देवेगौडा जर देशाचे पंतप्रधान आणि मुलायमसिंह यादव देशाचेच संरक्षण मंत्री होऊ शकतात तर मुलायम यांनी पंतप्रधान होण्यास कोणाची काही हरकत असण्याचे कारणच नाही.

भले काही काळापुरते का होईना, देवेगौडा जर देशाचे पंतप्रधान आणि मुलायमसिंह यादव देशाचेच संरक्षण मंत्री होऊ शकतात तर मुलायम यांनी पंतप्रधान होण्यास कोणाची काही हरकत असण्याचे कारणच नाही. ते पद मिळविण्यासाठी लोकसभेत किमान आवश्यक डोकी जमविण्याची ज्याची ताकद किंवा पात्रता असेल तो कोणीही पंतप्रधान बनू शकतो. पण या दोन्ही बाबी अजमावून पाहण्याची अजून वेळदेखील आलेली नसताना सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेले मुलायमपुत्र अखिलेश यांनी आपले पिताजी ऊर्फ नेताजी यांना पंतप्रधान करायला काँग्रेस पक्ष राजी होणार असेल तर आपण मोठ्या उदार अंत:करणाने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उप पंतप्रधानपद देऊ असे म्हटले आहे! उत्तर प्रदेश देशातील सर्वात मोठे राज्य आहे आणि तेथून लोकसभेवर जाणाऱ्या सदस्यांची संख्या तब्बल ऐंशी असल्याने पंतप्रधानपदाच्या निवडीत या राज्याची भूमिका बऱ्याचदा निर्णायक ठरत आलेली आहे. परंतु ते राज्य पूर्णत: मुलायम यांच्या समाजवादी पार्टीला कुणी आंदण दिलेले नाही. मायावतींची बसपा, भाजपा आणि काँग्रेस यांचे तिथे सपाला आव्हान असताना बिहारच्या बाबतीत मुलायम यांनी जी भूमिका घेतली ती लक्षात घेता कदाचित संयुक्त जनता दल आणि लालूंचे राजद हेदेखील तिथे आव्हानात्मक भूमिकेत उतरू शकतात. त्यातून लोकसभेच्या निवडणुकीला अजून किमान चाळीस महिने अवकाश आहे. पण आत्तापासूनच आपण काँग्रेसचे सहप्रवासी होण्यास किंवा खरे तर काँग्रेसला आपले सहप्रवासी करून घेण्यास उत्सुक आहोत हे केवळ दाखविण्यासाठी अखिलेश यांनी खेळी खेळली आहे, कारण काँग्रेस-मायावती युती होऊ नये हीच त्यांची आंतरिक इच्छा आहे. तथापि, त्यांच्या या बालीश देकाराला काँग्रेसने मात्र उडवून लावले आहे.