शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

नेताजींची साहसकथा : ऐतिहासिक सत्य आणि पुराण

By admin | Updated: January 28, 2016 03:32 IST

आझाद हिंद फौज घेऊन नेताजी भारतात येऊ शकले असते काय आणि त्यामुळं ब्रिटिश सत्तेला हादरा बसला असता काय? मोदी सरकारनं नेताजींविषयक दस्तऐवज खुले केल्यावर सुरू

- प्रकाश बाळ(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)आझाद हिंद फौज घेऊन नेताजी भारतात येऊ शकले असते काय आणि त्यामुळं ब्रिटिश सत्तेला हादरा बसला असता काय?मोदी सरकारनं नेताजींविषयक दस्तऐवज खुले केल्यावर सुरू असलेल्या चर्चेत हा एक सुप्त सूर आढळून येत आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील घटना व प्रसंग याकडं आजही सात दशकांनतर वस्तुनिष्ठेऐवजी स्वप्नरंजनात्मक दृष्टीनं बघण्याची आपल्या समाजमनात रूजलेली प्रवृत्ती यास कारणीभूत आहे. सत्य-अर्धसत्याची बेमालूम मिसळण करून संघ परिवार भारतीय समाजमनातील या प्रवृत्तीला खतपाणी घालत त्याचा राजकीय फायदा उठवत आला आहे. ही प्रवृत्ती प्रत्यक्ष स्वातंत्र्य चळवळीच्या काळात किती प्रबळ होती, याचं वर्णन श्री. ना. पेंडसे यांच्या ‘संभुसांच्या चाळी’त राहणाऱ्या नागरिकांच्या चर्चातून वाचायला मिळते. समाजमनातील या प्रवृत्तीनं किती भल्या भल्यांनाही ग्रासलेलं असतं, याचं उदाहरण म्हणजे १९९८ साली पंतप्रधान असताना इंदरकुमार गुजराल यांच्यासारख्या नेमस्त व बुद्धिवंत मानल्या गेलेल्या नेत्यानं कोहिमा येथे केलेलं भाषण. ‘नेताजींच्या फौजा मोठ्या प्रमाणात जर ईशान्य भारतात आल्या असत्या, तर देशाचा इतिहास बदलला असता’, अशा आशयाचं विधान आझाद हिंद फौजेच्या काही तुकड्या ईशान्य भारतातील ज्या ठिकाणी पोचल्या होत्या, तेथील स्मारकापाशी झालेल्या एका समारंभात बोलताना गुजराल यांनी केलं होतं. पण यातील वस्तुस्थिती काय होती?सुभाषबाबू कलकत्त्यात स्थानबद्धतेत होते. तेथून शिताफीनं ब्रिटिश सरकारच्या हातावर तुरी देऊन १६ जानेवारी १९४१ ला गुप्तरीत्या अफगाणिस्तानमार्गे मॉस्को, रोम असा प्रवास करीत ते जर्मनीत जाऊन पोचले. त्यांचा उद्देश होता, तो भारतातील ब्रिटिश सत्तेच्या विरोधात लढण्यासाठी हिटलरच्या राजवटीची मदत मिळविण्याचा. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, अशी नेताजींची रणनीती होती, असं सांगितलं जातं. खुद्द हिटलरचं मत काय होतं?मिलान हाऊनर नावाच्या एका अभ्यासकानं ‘इंडिया इन अ‍ॅक्सिस स्ट्रॅटेजी:जर्मनी, जपान अ‍ॅन्ड इंडियन नॅशनॅलिस्ट इन सेकंड वर्ल्ड वॉर’ या शीर्षकाचं एक पुस्तक जवळ जवळ पाव शतकापूर्वी जर्मन, इटालियन व जपानी दस्तऐवजांच्या आधारे लिहिलं आहे. हाऊनर या पुस्तकात असं दाखवून देतो की, ‘भारताकडं तुम्ही मोर्चा वळवल्यास तेथील जनता ब्रिटिश सत्तेच्या विरोधात उठाव करील व आमचा पक्ष (फॉरवर्ड ब्लॉक) हा या उठावाचं नेतृत्व करील’, असा युक्तिवाद नेताजींनी हिटलरशी झालेल्या चर्चेत केला होता. नेताजी जर्मनीत आले एप्रिल १९४१ ला आणि तेथून जपानला गेले, ते फेब्रुवारी १९४३ ला. म्हणजे जवळ जवळ २२ महिने ते जर्मनीत होते. या काळात जर्मनी, इटली, जपान यांनी एकत्र येऊन भारतीय स्वातंत्र्यासंबंधी मागणी करून आपल्या नेतृत्वाखालील अस्थायी सरकारला मान्यता द्यावी, अशी नेताजींची मागणी होती. असं झाल्यास सोविएत युनियनमध्ये घुसलेल्या जर्मन फौजा जेव्हा त्या देशाच्या मध्य आशियाई भागाकडं वळतील, तेव्हा त्यांच्या सोबत जाण्यासाठी ‘भारतीय फौज’ तयार असायला हवी आणि ती तयार करण्यासाठी हिटलर सरकारनं मदत करावी, असंही नेताजींचं मत होतं. या संदर्भात हिटलर व नेताजी यांच्यात जर्मन लष्कराच्या मुख्यालयात चर्चा झाली. तेव्हा हिटलरनं भितींवरील जगाच्या नकाशाकडं व त्यातील जर्मन फौजांच्या स्थितीकडं निर्देश केला आणि भारतापर्यंत या फौजा पोचण्यास किमान दोन वर्षे लागतील, असं सांगितलं. शिवाय एखाद्या शिस्तबद्ध सैन्यातील दोन हजार सैनिकही हजारो नि:शस्त्र नागरिकांवर नियंत्रण कसं बसवू शकतात, हेही समजावून सांगितलं. हिटलर हे सांगत होता, त्याचा जर्मन लष्करानं त्याला दिलेल्या अहवालाचा आधार होता. भारतातील जनता ब्रिटिशांच्या विरोधात आहे, पण ती आपल्या बाजूनं नाही आणि बोस यांचा पक्ष तेथील प्रस्थापित राजकीय पक्षाच्या तुलनेत अगदीच नगण्य आहे, असं मत या अधिकाऱ्यांच्या गटानं हिटलरकडं व्यक्त केलं होतं. त्याचबरोबर जर्मनी, जपान व इटलीनं एकत्र येऊन भारताच्या अस्थायी सरकारला मान्यता देण्यासही हिटलर तयार नव्हता. ‘असं सरकार स्थापन करायला हरकत नाही, पण त्याच्या हाती भूभाग लवकरात लवकर यायला हवा, तसं होणं तुमच्याबाबत शक्य दिसत नाही, असं मत जोसेफ गोबेल्सनं नोंदवलं. पश्चिम आशियात जर्मनी व दोस्त राष्ट्राच्या फौजात जी घमासान लढाई चालू होती, त्यात अनेक भारतीय सैनिक सहभागी होते. तेथील भारतीय सैनिकांचं मन वळवण्यासाठी आमच्या लोकाना जाऊ द्या, अशी नेताजींची मागणी होती. पण तेथील जर्मन सैन्याचं नेतृत्व करणाऱ्या फील्ड मार्शल रोमेल यानं ती साफ धुडकावून लावली. या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर नेताजी फेब्रुवारी १९४३ ला जपानला जायला निघाले. तेव्हा स्टालिनग्राडच्या लढाईत जर्मन फौजांची हार झाली होती आणि अमेरिका दुसऱ्या महायुद्धात उतरली होती. त्यामुळं युद्धाचं पारडं दोस्त राष्ट्राच्या बाजूनं झुकायला सुरूवात झाली होती. गुजराल म्हणत होते, तशा आझाद हिंद फौजा ईशान्य भारतात पोचल्या, तेव्हा जपान पराभूत होण्याच्या मार्गावर होता. नेताजींना होणारी जपानी मदत आटली होती. ‘डिफीट इन टू व्हिक्टरी’ या फील्ड मार्शल स्लिम यांच्या आत्मचरित्रात आग्नेय आशियातील या जपानी पराभवाचं जे वर्णन आहे, ते वाचलं की, नेताजींच्या फौजा ईशान्य भारतात पोचण्याची अजिबात शक्यता कशी नव्हती, हे स्पष्ट होतं. सांगावयाचा मुद्दा इतकाच की, भारतीय समाजमनातील या स्वप्नरंजनात्मक प्रवृत्तीला ऐतिहासिक तथ्यांचं वावडं आहे. कोणत्याही ऐतिहासिक तपशिलाला श्रद्धेचे बिरूद चिकटवलं की, तो इतिहास न राहता पुराण बनतं. नेताजींच्या साहसकथेचं असंच पुराण बनवलं गेलं आहे आणि पुराण हाच इतिहास आहे, असं सध्याचं सरकारच मानत असल्यानं हे नेताजी पुराण हाच इतिहास मानला जात आहे.