शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

निव्वळ आडदांडपणा

By admin | Updated: April 6, 2016 04:53 IST

उच्च न्यायालय असो की राज्य सरकार असो, दोहोंनी तशी अत्यंत सावध भूमिका घेत केवळ ‘खरे बोलावे, खोटे बोलू नये’ अशा उपदेशासारखीच भाषा महिलांच्या देव

उच्च न्यायालय असो की राज्य सरकार असो, दोहोंनी तशी अत्यंत सावध भूमिका घेत केवळ ‘खरे बोलावे, खोटे बोलू नये’ अशा उपदेशासारखीच भाषा महिलांच्या देवदर्शन हक्काबाबत केल्याने संबंधित देवस्थानांच्या कारभाऱ्यांना आंडदांंडपणा करण्याची संधी अनायासेच मिळÞून गेली आहे. राज्यघटना स्त्री-पुरुष असा भेद करीत नाही आणि राज्य सरकारचा हिन्दू देवालयांसंबंधीचा कायदा महिलांच्या मुक्त प्रवेशास प्रतिबंध करीत नाही, हे न्यायालयाने वा सरकारने नव्याने सांगण्याची गरज नव्हती. ते साऱ्यांनाच ठाऊक आहे. प्रश्न या दोहोंच्या काटेकोर अंमलबजावणीचा होता आणि तिचे पितृत्व नि:संशय राज्य सरकारकडे जाते. राज्य सरकार ते करीत नसल्यानेच सारे प्रश्न उभे राहिले आहेत. शनि शिंगणापूरच्या देवस्थान समितीने घेतलेल्या निर्णयाच्या पावलावर पाऊल टाकून आता त्र्यंबकेश्वर देवस्थाननेदेखील तेथील महादेव मंदिराच्या गाभाऱ्यात महिलाना तर नाहीच पण पुरुषांनादेखील प्रवेश न देण्याची आडमुठी भूमिका घेतल्याने तेथील सारा पुरुषवर्ग खवळून उठला आहे. तथापि विशेष म्हणजे त्या गावातील महिला स्वत:देखील गाभाऱ्यात जाण्याबाबत आग्रही नाहीत. मुळात महिलाना प्रवेश का द्यायचा नाही याचे कोणतेही तार्किक कारण आजवर एकाही देवालयाने दिलेले नाही. सारेजण परंपरेचा आणि प्रथेचाच दाखला देतात. पण त्याहून भयानक म्हणजे केरळातील सबरीमलासारखी देवालये परमेश्वराला रजस्वला महिलांमुळे विटाळ होतो म्हणून साऱ्याच महिलाना प्रवेश नाकारण्याचे अत्यंत अशास्त्रीय कारण पुढे करतात. परमेश्वराची जी काही संकल्पना साऱ्याच धर्मांमध्ये सांगितली जाते, त्या संकल्पनेत देवाला कोणाचा विटाळ होणे वा देवाला कुणी निषिद्ध असणे मुळातच संभवत नाही. तथापि महिलाना त्रास होऊ नये या ‘उदात्त’ हेतूने संबंधित देवालये महिलाना प्रवेश नाकारीत असतील तर तसे करण्याचाही त्यांना काही अधिकार नाही. मुंबई उच्च न्यायालयाने राज्यघटनेचा आणि राज्य सरकारने फार पूर्वीच संमत केलेल्या कायद्याचा दाखल देऊनही राज्यातील हिन्दूंची देवालये महिलाना प्रवेश नाकारीत असतील आणि राज्य सरकार त्यांच्या या वृत्तीसमोर हतबल होत असेल तर मग उद्या सबरीमाला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडाही जरी महिलांना अनुकूल आला तरी हा प्रश्न पुढे सरकेलच असे मानण्याचे कारण नाही.