शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 09:11 IST

जो प्रकार चीनचा, तोच प्रकार नेपाळचाही. नेपाळ सरकारनंही सुरुवातीला लोकांना आपल्या देशाची लोकसंख्या कमी करण्यासाठी प्रोत्साहित केलं, आवाहन केलं, आता त्यातले ‘धोके’ लक्षात आल्यानंतर त्यांनी जनतेला पुन्हा देशाची लोकसंख्या वाढविण्यासाठी आवाहन केलं आहे.

जगभरात लोकसंख्येवरून अनेक देश गोंधळलेले आहेत. लोकसंख्येबाबत केव्हा, काय निर्णय घ्यावा हेच त्यांना कळत नाही. त्याचं सर्वांत मोठं उदाहरण म्हणजे चीन. सुरुवातीला त्यांनी सक्तीनं लोकांना मुलं जन्माला घालण्यापासून रोखलं, आता लोकांनी मुलं जन्माला घालावीत यासाठी ते जिवाचा आटापिटा करीत आहेत. प्रसंगी सक्तीही करीत आहेत, पण तिथली लोकसंख्या वाढायला काही तयार नाही.

जो प्रकार चीनचा, तोच प्रकार नेपाळचाही.नेपाळ सरकारनंही सुरुवातीला लोकांना आपल्या देशाची लोकसंख्या कमी करण्यासाठी प्रोत्साहित केलं, आवाहन केलं, आता त्यातले ‘धोके’ लक्षात आल्यानंतर त्यांनी जनतेला पुन्हा देशाची लोकसंख्या वाढविण्यासाठी आवाहन केलं आहे. लोकांनी ‘ऐकलं’ नाही तर त्यांना ‘सक्तीनं’ मुलांना जन्माला घालायला लावण्याचा कायदा करण्याचा विचारही नेपाळ सरकार गांभीर्यानं करतं आहे.

यासदंर्भात नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी नुकतंच ‘उद्वेगानं’ म्हटलं आहे, ‘आम्ही जेव्हा लोकांना कमी मुलं जन्माला घाला, असं सांगितलं, तर बऱ्याच लोकांनी जन्मदर पार ‘शून्यावर’ आणून ठेवला. आता परिस्थिती अशी आली आहे, तरुणाई ना लग्न करायला तयार आहे, ना मुलं जन्माला घालायची त्यांची इच्छा आहे. लोकांनी आता अधिक मुलं जन्माला घातलीच पाहिजेत. तसं झालं नाही तर देशच धोक्यात येईल. संस्कृती जिवंत ठेवायची असेल तर जन्मदर संतुलित ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लोकांनी स्वत:हून जास्त मुलं जन्माला घातली नाहीत, तर सरकारला यावर कठोर कायदा करावा लागेल.देशातील तरुणांची संख्या वाढावी यासाठी सरकारनं आता प्रतिकुटुंब तीन मुलांची राष्ट्रीय पॉलिसी लागू केली आहे. प्रत्येक कुटुंबानं किमान तीन मुलं जन्माला घालावीत असं आवाहन नेपाळ सरकारनं केलं आहे. नेपाळची लोकसंख्या सध्या २.९७ कोटी आहे. त्यांचा जन्मदर आधी १९.६ होता, पण त्यानंतर त्यात सातत्यानं घसरण होऊन २०२५मध्ये तो १७ पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सरकार चिंतेत आहे. देशातील प्रजनन दरही सातत्यानं कमी होतो आहे. नेपाळचा प्रजनन दर २०१३ मध्ये २.३६ होता. २०२३ मध्ये १.९८ पर्यंत खाली घसरला आणि २०२५ च्या अखेरपर्यंत तो १.८ पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

सरकार याकडे आता अतिशय गांभीर्यानं पाहातं आहे. त्यामुळे आपल्या नव्या धोरणात नेपाळनं लग्नाचं किमान वय २० वर्षे केलं आहे. वीस ते तीस वयात अधिकाधिक तरुण-तरुणींनी लग्नं करावीत आणि मुलं जन्माला घालावीत, प्रत्येक परिवाराला किमान तीन तरी मुलं असावीत, अशी सरकारची अपेक्षा आहे. त्यादृष्टीनं ते तरुणांना आवाहन आणि प्रोत्साहनही करीत आहेत.

आमचा सल्ला तुम्ही बऱ्या बोलानं, मुकाट्यानं ‘ऐकावा’च, अशी सरकारची अपेक्षा आहे, नाहीतर सक्ती करण्यास आपण मागेपुढे पाहणार नाही, याचं सूतोवाच त्यांनी केलं आहे. ८२ टक्के हिंदू लोकसंख्या असलेल्या नेपाळनं राष्ट्रीय लोकसंख्या धोरणात आपले मनसुबे जाहीर केले आहेत आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल हे सांगताना आपलं पुढचं धोरणही आखायला त्यांनी सुरुवात केली आहे. नेपाळचे युवक ही ‘सक्ती’ खरोखरच मान्य करतील, त्याविरुद्ध बंड करतील की आणखी काही, हे लवकरच दिसेल!

 

टॅग्स :Nepalनेपाळchinaचीन