शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
3
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
4
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
5
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
6
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
7
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
8
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
9
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
10
आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा
11
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
12
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
13
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
14
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
15
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
16
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
17
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
18
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
19
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
20
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न

नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 09:11 IST

जो प्रकार चीनचा, तोच प्रकार नेपाळचाही. नेपाळ सरकारनंही सुरुवातीला लोकांना आपल्या देशाची लोकसंख्या कमी करण्यासाठी प्रोत्साहित केलं, आवाहन केलं, आता त्यातले ‘धोके’ लक्षात आल्यानंतर त्यांनी जनतेला पुन्हा देशाची लोकसंख्या वाढविण्यासाठी आवाहन केलं आहे.

जगभरात लोकसंख्येवरून अनेक देश गोंधळलेले आहेत. लोकसंख्येबाबत केव्हा, काय निर्णय घ्यावा हेच त्यांना कळत नाही. त्याचं सर्वांत मोठं उदाहरण म्हणजे चीन. सुरुवातीला त्यांनी सक्तीनं लोकांना मुलं जन्माला घालण्यापासून रोखलं, आता लोकांनी मुलं जन्माला घालावीत यासाठी ते जिवाचा आटापिटा करीत आहेत. प्रसंगी सक्तीही करीत आहेत, पण तिथली लोकसंख्या वाढायला काही तयार नाही.

जो प्रकार चीनचा, तोच प्रकार नेपाळचाही.नेपाळ सरकारनंही सुरुवातीला लोकांना आपल्या देशाची लोकसंख्या कमी करण्यासाठी प्रोत्साहित केलं, आवाहन केलं, आता त्यातले ‘धोके’ लक्षात आल्यानंतर त्यांनी जनतेला पुन्हा देशाची लोकसंख्या वाढविण्यासाठी आवाहन केलं आहे. लोकांनी ‘ऐकलं’ नाही तर त्यांना ‘सक्तीनं’ मुलांना जन्माला घालायला लावण्याचा कायदा करण्याचा विचारही नेपाळ सरकार गांभीर्यानं करतं आहे.

यासदंर्भात नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी नुकतंच ‘उद्वेगानं’ म्हटलं आहे, ‘आम्ही जेव्हा लोकांना कमी मुलं जन्माला घाला, असं सांगितलं, तर बऱ्याच लोकांनी जन्मदर पार ‘शून्यावर’ आणून ठेवला. आता परिस्थिती अशी आली आहे, तरुणाई ना लग्न करायला तयार आहे, ना मुलं जन्माला घालायची त्यांची इच्छा आहे. लोकांनी आता अधिक मुलं जन्माला घातलीच पाहिजेत. तसं झालं नाही तर देशच धोक्यात येईल. संस्कृती जिवंत ठेवायची असेल तर जन्मदर संतुलित ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लोकांनी स्वत:हून जास्त मुलं जन्माला घातली नाहीत, तर सरकारला यावर कठोर कायदा करावा लागेल.देशातील तरुणांची संख्या वाढावी यासाठी सरकारनं आता प्रतिकुटुंब तीन मुलांची राष्ट्रीय पॉलिसी लागू केली आहे. प्रत्येक कुटुंबानं किमान तीन मुलं जन्माला घालावीत असं आवाहन नेपाळ सरकारनं केलं आहे. नेपाळची लोकसंख्या सध्या २.९७ कोटी आहे. त्यांचा जन्मदर आधी १९.६ होता, पण त्यानंतर त्यात सातत्यानं घसरण होऊन २०२५मध्ये तो १७ पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सरकार चिंतेत आहे. देशातील प्रजनन दरही सातत्यानं कमी होतो आहे. नेपाळचा प्रजनन दर २०१३ मध्ये २.३६ होता. २०२३ मध्ये १.९८ पर्यंत खाली घसरला आणि २०२५ च्या अखेरपर्यंत तो १.८ पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

सरकार याकडे आता अतिशय गांभीर्यानं पाहातं आहे. त्यामुळे आपल्या नव्या धोरणात नेपाळनं लग्नाचं किमान वय २० वर्षे केलं आहे. वीस ते तीस वयात अधिकाधिक तरुण-तरुणींनी लग्नं करावीत आणि मुलं जन्माला घालावीत, प्रत्येक परिवाराला किमान तीन तरी मुलं असावीत, अशी सरकारची अपेक्षा आहे. त्यादृष्टीनं ते तरुणांना आवाहन आणि प्रोत्साहनही करीत आहेत.

आमचा सल्ला तुम्ही बऱ्या बोलानं, मुकाट्यानं ‘ऐकावा’च, अशी सरकारची अपेक्षा आहे, नाहीतर सक्ती करण्यास आपण मागेपुढे पाहणार नाही, याचं सूतोवाच त्यांनी केलं आहे. ८२ टक्के हिंदू लोकसंख्या असलेल्या नेपाळनं राष्ट्रीय लोकसंख्या धोरणात आपले मनसुबे जाहीर केले आहेत आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल हे सांगताना आपलं पुढचं धोरणही आखायला त्यांनी सुरुवात केली आहे. नेपाळचे युवक ही ‘सक्ती’ खरोखरच मान्य करतील, त्याविरुद्ध बंड करतील की आणखी काही, हे लवकरच दिसेल!

 

टॅग्स :Nepalनेपाळchinaचीन