शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

नेपाळ : चिंता वाढविणारा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:24 IST

नेपाळमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनी त्या डोंगरी देशात लोकशाहीची पुनर्स्थापना केली असली तरी तेथे येऊ घातलेल्या आघाडी सरकारच्या संभाव्य धोरणांची भारताला चिंता वाहावी लागणार आहे. माजी पंतप्रधान कमलपुष्प डहाल ऊर्फ प्रचंड यांच्या नेतृत्वातील ‘युनिफाईड मार्क्सिस्ट लेनिनिस्ट पार्टी’ व के.पी. ओली यांच्या नेतृत्वातील ‘सीपीएन माओईस्ट सेंटर’ या दोन पक्षांच्या आघाडीने या निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमत मिळविल्यामुळे त्या देशाच्या सरकारला स्थैर्य लाभणार असले तरी प्रचंड आणि ओली यांच्यातील सत्तास्पर्धा त्या स्थैर्यासमोर प्रश्नचिन्ह उभे करणार आहे.

नेपाळमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनी त्या डोंगरी देशात लोकशाहीची पुनर्स्थापना केली असली तरी तेथे येऊ घातलेल्या आघाडी सरकारच्या संभाव्य धोरणांची भारताला चिंता वाहावी लागणार आहे. माजी पंतप्रधान कमलपुष्प डहाल ऊर्फ प्रचंड यांच्या नेतृत्वातील ‘युनिफाईड मार्क्सिस्ट लेनिनिस्ट पार्टी’ व के.पी. ओली यांच्या नेतृत्वातील ‘सीपीएन माओईस्ट सेंटर’ या दोन पक्षांच्या आघाडीने या निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमत मिळविल्यामुळे त्या देशाच्या सरकारला स्थैर्य लाभणार असले तरी प्रचंड आणि ओली यांच्यातील सत्तास्पर्धा त्या स्थैर्यासमोर प्रश्नचिन्ह उभे करणार आहे. प्रचंड यांचा पक्ष भारताला काहीसा अनुकूल असला तरी संसदेत त्याचे प्रतिनिधी कमी संख्येने निवडून आले आहेत. उलट ओली यांचा कल चीनकडे असून त्यांचे सभासद अधिक निवडले गेले आहेत. वास्तव हे की नेपाळ काँग्रेस हा त्या देशात दीर्घकाळ सत्तेवर राहिलेला पक्ष हा भारताचा खरा मित्र आहे. मात्र या निवडणुकीत दोन्ही कम्युनिस्ट पक्षांच्या युतीने त्याचा मोठा पराभव केला आहे. भारताच्या चिंतेचे तेही एक मोठे कारण आहे. प्रचंड यांचा पक्ष भारताशी सख्य राखणारा असला तरी नव्या सरकारात त्याचे वजन कमी राहणार आहे आणि ओली यांचा पक्ष सरळ सरळ चीनवादी म्हणावा असा आहे. २०१५ मध्ये ओली हे तेथील आघाडी सरकारचे प्रमुख असतानाच त्यांनी चीनशी आपली मैत्री वाढविली होती. चिनी लष्कर व नेपाळचे सैनिक यांच्या संयुक्त कवायती त्यांच्याच काळात झाल्या. याच काळात नेपाळने भारताशी असलेला आपला व्यापारसंबंध कमी केला व तो देश चिनी मालाच्या आयातीवर अधिकाधिक अवलंबून राहू लागला. याच काळात चीनने आपला सहा पदरी महामार्ग नेपाळच्या उत्तर सीमेपर्यंत आणला आणि तिथपर्यंत आपल्या रेल्वे मार्गाचीही उभारणी केली. भारतातून येणारी मालमोटारींची वाहतूक तराईच्या सीमेवर दीड-महिनेपर्यंत अडवून धरणारे सरकारही तेच होते. त्यामुळे यापुढच्या काळात त्या देशाला आपला उपग्रह बनविण्याचे चीनच्या महासत्तेचे प्रयत्न वाढतील ही शक्यता मोठी आहे.चीनने तसेही पाकिस्तानच्या सरकारवर व राजकारणावर आपले वर्चस्व आज उभे केले आहे. मॉरिशस या भारताच्या परंपरागत मित्रदेशाशी खुल्या व्यापाराचा करार करून त्यालाही चीनने आपल्या बाजूने वळविले आहे. शिवाय आता बंगालच्या उपसागरापर्यंत आपल्या मालाची ने-आण करण्यासाठी म्यानमारच्या भूमीतून एक नवा औद्योगिक कॉरिडॉर बांधण्याचे काम त्याने सुरू केले आहे. उत्तर, पश्चिम व पूर्व अशा तीनही दिशांनी भारताची आर्थिक कोंडी करण्याचा चीनचा हेतू यातून उघड होणारा आहे. या काळात भारताच्याही काही चुका झाल्या आहेत. नेपाळचा डोंगराळ भाग वगळता उर्वरित तळच्या प्रदेशात राहणाºया माधेसी जमातीशी भारताचे संबंध चांगले राहिले व तिला नेपाळच्या सरकारात वजन मिळावे असाही त्याचा प्रयत्न राहिला. तो त्या देशाला त्याच्या अंतर्गत राजकारणातील भारताचा हस्तक्षेप वाटत राहिला. शिवाय ज्या काळात नेपाळने सेक्यूलॅरिझमचा (धर्मनिरपेक्षतेचा) स्वीकार केला त्याच काळात भारतात धर्मांध राजकारण वाढलेले दिसले. तथापि नेपाळचे भारताशी गेल्या पाऊणशे वर्षांचे संबंध सलोख्याचे राहिले. त्याचा परराष्टÑ व संरक्षण विषयक कार्यक्रमही भारताच्या कलाने ठरत राहिला. त्या देशात आजवर सत्तेवर आलेल्या सरकारांनी भारताशी असलेल्या परंपरागत संबंधांचा आदरच राखला. त्यामुळे हे संबंध पुन्हा एकवार तसेच राहतील व त्यांना अधिक बळकटी येईल असा प्रयत्न दोन्ही बाजूंनी होणे गरजेचे आहे. नेपाळचे स्थान भारत व चीन यांच्या सीमारेषेवरचे असल्यानेही तसे प्रयत्न तातडीने करणे अतिशय आवश्यक आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNepalनेपाळ