शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळ : चिंता वाढविणारा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:24 IST

नेपाळमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनी त्या डोंगरी देशात लोकशाहीची पुनर्स्थापना केली असली तरी तेथे येऊ घातलेल्या आघाडी सरकारच्या संभाव्य धोरणांची भारताला चिंता वाहावी लागणार आहे. माजी पंतप्रधान कमलपुष्प डहाल ऊर्फ प्रचंड यांच्या नेतृत्वातील ‘युनिफाईड मार्क्सिस्ट लेनिनिस्ट पार्टी’ व के.पी. ओली यांच्या नेतृत्वातील ‘सीपीएन माओईस्ट सेंटर’ या दोन पक्षांच्या आघाडीने या निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमत मिळविल्यामुळे त्या देशाच्या सरकारला स्थैर्य लाभणार असले तरी प्रचंड आणि ओली यांच्यातील सत्तास्पर्धा त्या स्थैर्यासमोर प्रश्नचिन्ह उभे करणार आहे.

नेपाळमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनी त्या डोंगरी देशात लोकशाहीची पुनर्स्थापना केली असली तरी तेथे येऊ घातलेल्या आघाडी सरकारच्या संभाव्य धोरणांची भारताला चिंता वाहावी लागणार आहे. माजी पंतप्रधान कमलपुष्प डहाल ऊर्फ प्रचंड यांच्या नेतृत्वातील ‘युनिफाईड मार्क्सिस्ट लेनिनिस्ट पार्टी’ व के.पी. ओली यांच्या नेतृत्वातील ‘सीपीएन माओईस्ट सेंटर’ या दोन पक्षांच्या आघाडीने या निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमत मिळविल्यामुळे त्या देशाच्या सरकारला स्थैर्य लाभणार असले तरी प्रचंड आणि ओली यांच्यातील सत्तास्पर्धा त्या स्थैर्यासमोर प्रश्नचिन्ह उभे करणार आहे. प्रचंड यांचा पक्ष भारताला काहीसा अनुकूल असला तरी संसदेत त्याचे प्रतिनिधी कमी संख्येने निवडून आले आहेत. उलट ओली यांचा कल चीनकडे असून त्यांचे सभासद अधिक निवडले गेले आहेत. वास्तव हे की नेपाळ काँग्रेस हा त्या देशात दीर्घकाळ सत्तेवर राहिलेला पक्ष हा भारताचा खरा मित्र आहे. मात्र या निवडणुकीत दोन्ही कम्युनिस्ट पक्षांच्या युतीने त्याचा मोठा पराभव केला आहे. भारताच्या चिंतेचे तेही एक मोठे कारण आहे. प्रचंड यांचा पक्ष भारताशी सख्य राखणारा असला तरी नव्या सरकारात त्याचे वजन कमी राहणार आहे आणि ओली यांचा पक्ष सरळ सरळ चीनवादी म्हणावा असा आहे. २०१५ मध्ये ओली हे तेथील आघाडी सरकारचे प्रमुख असतानाच त्यांनी चीनशी आपली मैत्री वाढविली होती. चिनी लष्कर व नेपाळचे सैनिक यांच्या संयुक्त कवायती त्यांच्याच काळात झाल्या. याच काळात नेपाळने भारताशी असलेला आपला व्यापारसंबंध कमी केला व तो देश चिनी मालाच्या आयातीवर अधिकाधिक अवलंबून राहू लागला. याच काळात चीनने आपला सहा पदरी महामार्ग नेपाळच्या उत्तर सीमेपर्यंत आणला आणि तिथपर्यंत आपल्या रेल्वे मार्गाचीही उभारणी केली. भारतातून येणारी मालमोटारींची वाहतूक तराईच्या सीमेवर दीड-महिनेपर्यंत अडवून धरणारे सरकारही तेच होते. त्यामुळे यापुढच्या काळात त्या देशाला आपला उपग्रह बनविण्याचे चीनच्या महासत्तेचे प्रयत्न वाढतील ही शक्यता मोठी आहे.चीनने तसेही पाकिस्तानच्या सरकारवर व राजकारणावर आपले वर्चस्व आज उभे केले आहे. मॉरिशस या भारताच्या परंपरागत मित्रदेशाशी खुल्या व्यापाराचा करार करून त्यालाही चीनने आपल्या बाजूने वळविले आहे. शिवाय आता बंगालच्या उपसागरापर्यंत आपल्या मालाची ने-आण करण्यासाठी म्यानमारच्या भूमीतून एक नवा औद्योगिक कॉरिडॉर बांधण्याचे काम त्याने सुरू केले आहे. उत्तर, पश्चिम व पूर्व अशा तीनही दिशांनी भारताची आर्थिक कोंडी करण्याचा चीनचा हेतू यातून उघड होणारा आहे. या काळात भारताच्याही काही चुका झाल्या आहेत. नेपाळचा डोंगराळ भाग वगळता उर्वरित तळच्या प्रदेशात राहणाºया माधेसी जमातीशी भारताचे संबंध चांगले राहिले व तिला नेपाळच्या सरकारात वजन मिळावे असाही त्याचा प्रयत्न राहिला. तो त्या देशाला त्याच्या अंतर्गत राजकारणातील भारताचा हस्तक्षेप वाटत राहिला. शिवाय ज्या काळात नेपाळने सेक्यूलॅरिझमचा (धर्मनिरपेक्षतेचा) स्वीकार केला त्याच काळात भारतात धर्मांध राजकारण वाढलेले दिसले. तथापि नेपाळचे भारताशी गेल्या पाऊणशे वर्षांचे संबंध सलोख्याचे राहिले. त्याचा परराष्टÑ व संरक्षण विषयक कार्यक्रमही भारताच्या कलाने ठरत राहिला. त्या देशात आजवर सत्तेवर आलेल्या सरकारांनी भारताशी असलेल्या परंपरागत संबंधांचा आदरच राखला. त्यामुळे हे संबंध पुन्हा एकवार तसेच राहतील व त्यांना अधिक बळकटी येईल असा प्रयत्न दोन्ही बाजूंनी होणे गरजेचे आहे. नेपाळचे स्थान भारत व चीन यांच्या सीमारेषेवरचे असल्यानेही तसे प्रयत्न तातडीने करणे अतिशय आवश्यक आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNepalनेपाळ