शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

इच्छाशक्तीची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2017 00:15 IST

दहशतवादाला ना जात असते, ना धर्म! धर्माच्या नावाखाली निरपराध लोकांचे मुडदे पाडायचे, रक्ताचे पाट वाहवायचे आणि दहशतीच्या जोरावर सामान्य नागरिकांना वेठीस धरायचे

दहशतवादाला ना जात असते, ना धर्म! धर्माच्या नावाखाली निरपराध लोकांचे मुडदे पाडायचे, रक्ताचे पाट वाहवायचे आणि दहशतीच्या जोरावर सामान्य नागरिकांना वेठीस धरायचे, एवढाच दहशतवादी संघटनांचा एकमेव उद्देश असतो. दहशतवाद ही आज केवळ एका देशापुरती समस्या राहिलेली नाही. दहशतवादाचे चटके जगभरातील सर्वच देशांना कमीअधिक प्रमाणात बसत आहेत. भारताचं नंदनवन अशी बिरुदावली मिरवणारं आमचं काश्मीर आज देशविघातक शक्तींच्या कारवायांमुळे होरपळत आहे. सीमेपलीकडून मिळणाऱ्या मदतीवर फोफावू बघत असलेल्या दहशतवादाला आणि कपट कारस्थानाला निपटण्यासाठी आमचे शूर जवान सक्षम आहेत आणि त्यांनी वेळोवेळी ते सिद्धही करून दाखविले. देशातील काही फितूर संघटनांना हाताशी धरुन काश्मीरला कायम अस्थिर ठेवावयाचा विडा पाकिस्तानने उचलला आहे. पाकधार्जिण्या संघटना आमच्या तरुण पिढीला चुकीचा मार्ग दाखवून त्यांची डोकी भडकावत आहे. दुर्दैवाने तरुणाईही या संघटनांच्या जाळ्यात अडकतेय! परिणामी, एका हातात दप्तर, तर दुसऱ्या हातात दगड, असे चित्र आज काश्मीरमध्ये पाहायला मिळत आहे. पवित्र रमजान महिन्यातल्या ‘शब-ए-कद्र’च्या प्रार्थनेनंतर पोलीस अधिकारी अयुब पंडित यांना ज्या पद्धतीने जमावाने ठेचून ठार मारले, ते पाहून देशात संतापाची लाट न उसळती तरच नवल! अयुब पंडित यांच्या हत्या प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच, रमजान ईदच्या दिवशीही सैनिकांवर दगडफेक झाली. चार दिवसांपूर्वीच मुस्लीम बांधवांचे पवित्र ठिकाण असलेल्या मक्केतही दहशतवाद्यांचा घातपात घडविण्याचा कट वेळीच उधळण्यात आला होता. इसिससारख्या अन्य धर्मांध संघटनांचा यामागे हात असल्याचे लपून राहिलेले नाही. दहशतवादी संघटना मूठभर ‘जिहादी’ तयार करून संपूर्ण जगाला वेठीस धरत आहेत. अनेक देशांमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतो. गरिबी वाईट आणि त्यातही टीचभर पोटाची भूक आणखी वाईट! दहशतवादी संघटना समाजातील गरिबीचा फायदा घेऊन त्यांचे इप्सित साध्य करीत आहेत. तरुणांना दहशतवादाच्या मगरमिठीतून बाहेर काढायचे असेल तर सर्वच देशांना कठोर व्हावे लागेल. त्यासाठी तथाकथित धर्मगुरूंनाही ठिकाणावर आणावे लागेल; कारण दहशतवादाची पहिली ‘शिकवणी’ हीच मंडळी देत असते. ‘ब्रेन वॉश’च्या नावाखाली एखाद्या धर्माबद्दल त्यांच्यात टोकाचे वाईट विचार भरवले जातात आणि तेथूनच तरुणांची मानवतेशी लढाई सुरू होते. समस्या कुणाला नसतात? पण त्यांना उत्तरही असतंच! समस्या सोडविण्यासाठी गरज असते ती इच्छाशक्तीची! महादेवाच्या पिंडीवर विंचू बसला आणि तो केव्हाही विषारी डंख मारेल असं वाटत असेल, तर त्यावेळी ‘शिव-शिव’ करून उपयोग नसतो. त्या विंचवाची नांगी ठेचणे हेच त्यावेळी पहिले कर्तव्य ठरते. ते करताना एखादा फटका पिंडीला लागला तरी पाप-पुण्याचा विचार न करता, त्या विंचवाची नांगी ठेचण्यातच हित असते!