शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

इच्छाशक्तीची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2017 00:15 IST

दहशतवादाला ना जात असते, ना धर्म! धर्माच्या नावाखाली निरपराध लोकांचे मुडदे पाडायचे, रक्ताचे पाट वाहवायचे आणि दहशतीच्या जोरावर सामान्य नागरिकांना वेठीस धरायचे

दहशतवादाला ना जात असते, ना धर्म! धर्माच्या नावाखाली निरपराध लोकांचे मुडदे पाडायचे, रक्ताचे पाट वाहवायचे आणि दहशतीच्या जोरावर सामान्य नागरिकांना वेठीस धरायचे, एवढाच दहशतवादी संघटनांचा एकमेव उद्देश असतो. दहशतवाद ही आज केवळ एका देशापुरती समस्या राहिलेली नाही. दहशतवादाचे चटके जगभरातील सर्वच देशांना कमीअधिक प्रमाणात बसत आहेत. भारताचं नंदनवन अशी बिरुदावली मिरवणारं आमचं काश्मीर आज देशविघातक शक्तींच्या कारवायांमुळे होरपळत आहे. सीमेपलीकडून मिळणाऱ्या मदतीवर फोफावू बघत असलेल्या दहशतवादाला आणि कपट कारस्थानाला निपटण्यासाठी आमचे शूर जवान सक्षम आहेत आणि त्यांनी वेळोवेळी ते सिद्धही करून दाखविले. देशातील काही फितूर संघटनांना हाताशी धरुन काश्मीरला कायम अस्थिर ठेवावयाचा विडा पाकिस्तानने उचलला आहे. पाकधार्जिण्या संघटना आमच्या तरुण पिढीला चुकीचा मार्ग दाखवून त्यांची डोकी भडकावत आहे. दुर्दैवाने तरुणाईही या संघटनांच्या जाळ्यात अडकतेय! परिणामी, एका हातात दप्तर, तर दुसऱ्या हातात दगड, असे चित्र आज काश्मीरमध्ये पाहायला मिळत आहे. पवित्र रमजान महिन्यातल्या ‘शब-ए-कद्र’च्या प्रार्थनेनंतर पोलीस अधिकारी अयुब पंडित यांना ज्या पद्धतीने जमावाने ठेचून ठार मारले, ते पाहून देशात संतापाची लाट न उसळती तरच नवल! अयुब पंडित यांच्या हत्या प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच, रमजान ईदच्या दिवशीही सैनिकांवर दगडफेक झाली. चार दिवसांपूर्वीच मुस्लीम बांधवांचे पवित्र ठिकाण असलेल्या मक्केतही दहशतवाद्यांचा घातपात घडविण्याचा कट वेळीच उधळण्यात आला होता. इसिससारख्या अन्य धर्मांध संघटनांचा यामागे हात असल्याचे लपून राहिलेले नाही. दहशतवादी संघटना मूठभर ‘जिहादी’ तयार करून संपूर्ण जगाला वेठीस धरत आहेत. अनेक देशांमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतो. गरिबी वाईट आणि त्यातही टीचभर पोटाची भूक आणखी वाईट! दहशतवादी संघटना समाजातील गरिबीचा फायदा घेऊन त्यांचे इप्सित साध्य करीत आहेत. तरुणांना दहशतवादाच्या मगरमिठीतून बाहेर काढायचे असेल तर सर्वच देशांना कठोर व्हावे लागेल. त्यासाठी तथाकथित धर्मगुरूंनाही ठिकाणावर आणावे लागेल; कारण दहशतवादाची पहिली ‘शिकवणी’ हीच मंडळी देत असते. ‘ब्रेन वॉश’च्या नावाखाली एखाद्या धर्माबद्दल त्यांच्यात टोकाचे वाईट विचार भरवले जातात आणि तेथूनच तरुणांची मानवतेशी लढाई सुरू होते. समस्या कुणाला नसतात? पण त्यांना उत्तरही असतंच! समस्या सोडविण्यासाठी गरज असते ती इच्छाशक्तीची! महादेवाच्या पिंडीवर विंचू बसला आणि तो केव्हाही विषारी डंख मारेल असं वाटत असेल, तर त्यावेळी ‘शिव-शिव’ करून उपयोग नसतो. त्या विंचवाची नांगी ठेचणे हेच त्यावेळी पहिले कर्तव्य ठरते. ते करताना एखादा फटका पिंडीला लागला तरी पाप-पुण्याचा विचार न करता, त्या विंचवाची नांगी ठेचण्यातच हित असते!