शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

इच्छाशक्तीची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2017 00:15 IST

दहशतवादाला ना जात असते, ना धर्म! धर्माच्या नावाखाली निरपराध लोकांचे मुडदे पाडायचे, रक्ताचे पाट वाहवायचे आणि दहशतीच्या जोरावर सामान्य नागरिकांना वेठीस धरायचे

दहशतवादाला ना जात असते, ना धर्म! धर्माच्या नावाखाली निरपराध लोकांचे मुडदे पाडायचे, रक्ताचे पाट वाहवायचे आणि दहशतीच्या जोरावर सामान्य नागरिकांना वेठीस धरायचे, एवढाच दहशतवादी संघटनांचा एकमेव उद्देश असतो. दहशतवाद ही आज केवळ एका देशापुरती समस्या राहिलेली नाही. दहशतवादाचे चटके जगभरातील सर्वच देशांना कमीअधिक प्रमाणात बसत आहेत. भारताचं नंदनवन अशी बिरुदावली मिरवणारं आमचं काश्मीर आज देशविघातक शक्तींच्या कारवायांमुळे होरपळत आहे. सीमेपलीकडून मिळणाऱ्या मदतीवर फोफावू बघत असलेल्या दहशतवादाला आणि कपट कारस्थानाला निपटण्यासाठी आमचे शूर जवान सक्षम आहेत आणि त्यांनी वेळोवेळी ते सिद्धही करून दाखविले. देशातील काही फितूर संघटनांना हाताशी धरुन काश्मीरला कायम अस्थिर ठेवावयाचा विडा पाकिस्तानने उचलला आहे. पाकधार्जिण्या संघटना आमच्या तरुण पिढीला चुकीचा मार्ग दाखवून त्यांची डोकी भडकावत आहे. दुर्दैवाने तरुणाईही या संघटनांच्या जाळ्यात अडकतेय! परिणामी, एका हातात दप्तर, तर दुसऱ्या हातात दगड, असे चित्र आज काश्मीरमध्ये पाहायला मिळत आहे. पवित्र रमजान महिन्यातल्या ‘शब-ए-कद्र’च्या प्रार्थनेनंतर पोलीस अधिकारी अयुब पंडित यांना ज्या पद्धतीने जमावाने ठेचून ठार मारले, ते पाहून देशात संतापाची लाट न उसळती तरच नवल! अयुब पंडित यांच्या हत्या प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच, रमजान ईदच्या दिवशीही सैनिकांवर दगडफेक झाली. चार दिवसांपूर्वीच मुस्लीम बांधवांचे पवित्र ठिकाण असलेल्या मक्केतही दहशतवाद्यांचा घातपात घडविण्याचा कट वेळीच उधळण्यात आला होता. इसिससारख्या अन्य धर्मांध संघटनांचा यामागे हात असल्याचे लपून राहिलेले नाही. दहशतवादी संघटना मूठभर ‘जिहादी’ तयार करून संपूर्ण जगाला वेठीस धरत आहेत. अनेक देशांमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतो. गरिबी वाईट आणि त्यातही टीचभर पोटाची भूक आणखी वाईट! दहशतवादी संघटना समाजातील गरिबीचा फायदा घेऊन त्यांचे इप्सित साध्य करीत आहेत. तरुणांना दहशतवादाच्या मगरमिठीतून बाहेर काढायचे असेल तर सर्वच देशांना कठोर व्हावे लागेल. त्यासाठी तथाकथित धर्मगुरूंनाही ठिकाणावर आणावे लागेल; कारण दहशतवादाची पहिली ‘शिकवणी’ हीच मंडळी देत असते. ‘ब्रेन वॉश’च्या नावाखाली एखाद्या धर्माबद्दल त्यांच्यात टोकाचे वाईट विचार भरवले जातात आणि तेथूनच तरुणांची मानवतेशी लढाई सुरू होते. समस्या कुणाला नसतात? पण त्यांना उत्तरही असतंच! समस्या सोडविण्यासाठी गरज असते ती इच्छाशक्तीची! महादेवाच्या पिंडीवर विंचू बसला आणि तो केव्हाही विषारी डंख मारेल असं वाटत असेल, तर त्यावेळी ‘शिव-शिव’ करून उपयोग नसतो. त्या विंचवाची नांगी ठेचणे हेच त्यावेळी पहिले कर्तव्य ठरते. ते करताना एखादा फटका पिंडीला लागला तरी पाप-पुण्याचा विचार न करता, त्या विंचवाची नांगी ठेचण्यातच हित असते!