शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आसामच्या प्रश्नांना समजून घेणे गरजेचे

By admin | Updated: October 23, 2014 01:48 IST

गेल्या वर्षी बोधगया येथील महाबोधी मंदिरावर दहशतवाद्यांचा हल्ला झाला. या हल्ल्याची चौकशी करीत असताना लक्षात आले,

डॉ. अलका सरमाआसाममधील राजकीय कार्यकर्त्यागेल्या वर्षी बोधगया येथील महाबोधी मंदिरावर दहशतवाद्यांचा हल्ला झाला. या हल्ल्याची चौकशी करीत असताना लक्षात आले, की या स्फोटासाठी वापरण्यात आलेली साधने आसाममधील गुवाहाटी येथून आणण्यात आली होती. या दहशतवादी हल्ल्यात म्यानमारमधून हकालपट्टी झालेल्या रोहंगिया मुसलमानांचा हात होता हेही उघड झाले. या मुसलमानांवर म्यानमारने कारवाई केल्यामुळे त्यांना देश सोडावा लागला. त्यांना स्वीकारण्यास बांगलादेश तयार नाही; कारण ते काही बांगलादेशचे नागरिक नाहीत. वास्तविक त्यांना कोणतेही राष्ट्र स्वीकारायला तयार नाही. तरीही त्यांनी आपले वेगळेपण जपले आहे आणि आसामची सरहद्द त्यांना प्रवेश करण्यास सुलभ वाटते, म्हणून त्यांनी आसामात आश्रय घेतला आहे. अशा तऱ्हेने ३० हजार रोहंगिया मुसलमानांनी आसामात आश्रय घेतला आहे.काही आठवड्यांपूर्वी ‘खलिस्तान झिंदाबाद फोर्सचा’ महत्त्वाचा घटक असलेल्या दिलबागसिंग याला गुवाहाटी येथे अटक करण्यात आली. खलिस्तान चळवळीसाठी शस्त्रास्त्रे संपादन करण्यासाठी दिलबागसिंग गुवाहाटीत होता. पंजाब पोलिसांकडून समजले की जे तीन दहशतवादी गट खलिस्तान निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत, त्यांपैकी एका गटाचा दिलबागसिंग हा कमांडर होता. ईशान्येकडील भागातील, विशेषत: आसामातील जे दहशतवादी गट आहेत त्यांच्यापाशी शस्त्रास्त्रांचा विपुल साठा आहे. त्यामुळे ते इतर दहशतवादी गटांना शस्त्रास्त्रे विकत असतात. ही शस्त्रास्त्रे चीनमधून आणण्यात येतात. भारताची म्यानमारसोबत असलेली सीमारेषा ही दहशतवाद्यांसाठी स्वर्ग ठरली आहे. या सीमेवरून भारतात शस्त्रे आणणे अत्यंत सुलभ असते. नागालँड येथील दिमापूर हे शहर शस्त्रास्त्रांच्या विक्रीचे मोठे केंद्र आहे. अलीकडे दिमापूरहून आसामात आणण्यात येत असलेले शस्त्रास्त्रांचे साठे सुरक्षा दलाने ताब्यात घेतले.प. बंगालमध्ये बरद्वान येथे अलीकडे झालेल्या स्फोटाची चौकशी करताना बांगलादेशमधून आसामात दहशतवादी कशा पद्धतीने घुसखोरी करतात हे पाहायला मिळाले. बांगलादेश आणि आसाम येथे राहणाऱ्या लोकांच्या खाण्याच्या सवयी, पोशाख, भाषा, इ.मध्ये इतका सारखेपणा आहे, की त्यांना वेगळे काढणे कठीण होते. त्यामुळे भारताच्या सुरक्षिततेला फार मोठा धोका निर्माण झाला आहे. बोधगया मंदिरावर झालेला हल्ला असो, की बरद्वान येथे झालेला स्फोट असो, त्यामागे आसामातील लोकांचा हात असल्याचे दिसून आले आहे. दारिद्र्यामुळे हे तरुण गांजलेले असल्याने ते सहज दहशतवादी कृत्यांकडे आकृष्ट होतात. त्यांना आसामात शस्त्रास्त्रे तयार करण्याचेही शिक्षण देण्यात येते.आसाम आणि ईशान्य भारतातील इतर प्रदेशात वंश, धर्म, जात, भाषा आणि राष्ट्रीयत्व यांची विविधता आढळते. त्यामुळे एका गटाला दुसऱ्या गटाविरुद्ध संघर्ष करण्यास चिथावणी देणे येथे सोपे झाले आहे. त्यातूनच येथे हिंसाचाराच्या घटना घडत असतात. ब्रिटिशांनी फोडा, झोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबिली होती. आसामातही तोच प्रकार सुरू आहे. परस्परांविरुद्ध द्वेषाची भावना पसरविण्याचे पोषक वातावरण आसामात पाहावयास मिळते. त्यामुळे या भागात वांशिक भेदाची मुळे खोलवर रुजली असून, त्यातूनच शांतताभंगाची कृत्ये घडत असतात.अशा परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस किंवा लष्कर काहीच करू शकत नाही. केवळ जमाती-जमातीतील सलोखा हा घटकच सौहार्दाचे वातावरण निर्माण करू शकतो. बदला घेण्याची भावना येथील प्रत्येक जमातीत आढळते. पण चांगल्या भवितव्याची प्रत्येक जमात आशा बाळगून आहे. भारतासारख्या विशाल देशाला संघराज्याचे स्वरूप अत्यंत उपयोगी ठरते. येथील प्रादेशिक पक्ष, प्रादेशिकतेची भावना, प्रादेशिकतेचे स्वरूप समजून घेऊन अन्य समाजघटकांनी ते स्वीकारायला हवे. तरच राष्ट्रही त्या समाजघटकांना स्वीकारू शकेल. याबाबतीत मीडिया महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. या प्रदेशाला एकूण भारतात सामावून घेण्याची प्रक्रिया वेगाने व्हायला हवी. त्यासाठी देशप्रेमाची भावना या समाजघटकात दृढ करावी लागेल. ती जबाबदारी देशाच्या मुख्य भागाने पार पाडायला हवी. त्यासाठी या भागाने कार्यक्रम आखावा. आसाम आणि ईशान्येकडील राज्ये यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी संपूर्ण भारताने आसामकडे लक्ष पुरवायला हवे. आसामच्या प्रश्नांविषयी भारतीय जनतेने काळजी करणे त्यासाठी अत्यंत गरजेचे झाले आहे.