शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

वाहनचालकांच्या मानसिक बदलाची गरज; सरकारी स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 03:12 IST

गेल्या २० वर्षांत मोबाइल फोनला आपल्या सर्वांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. जवळजवळ प्रत्येक व्यक्ती आज मोबाइल वापरते. मोबाइल वाजला रे वाजला की त्यावर त्वरित बोलण्याची निकड प्रत्येकाला असते. 

- अशोक दातार (वाहतूकतज्ज्ञ)गेल्या २० वर्षांत मोबाइल फोनला आपल्या सर्वांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. जवळजवळ प्रत्येक व्यक्ती आज मोबाइल वापरते. मोबाइल वाजला रे वाजला की त्यावर त्वरित बोलण्याची निकड प्रत्येकाला असते. एरव्ही काही आक्षेप असायचे काहीच कारण नाही. परंतु जेव्हा वाहनचालक असे करतात, तेव्हा ते नक्कीच आक्षेपार्ह व धोकादायक आहे.अनेकांना वाटते की वाहन चालवणे हा वेळेचा अपव्ययच आहे. तेव्हा जर फोन केल्यास हा वेळ सत्कारणी लागू शकतो. असे करणे काही गैर नाही. आता दुर्दैवाने पोलिसांच्या नियमानुसार वाहन चालवताना फोन करणे हा गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी शिक्षेचीही तरतूद आहे. मात्र पदोपदी पोलीस नसल्यामुळे वाहनचालक या संधीचा पुरेपूर फायदा घेताना दिसतात. औद्योगिक व व्यावसायिकदृष्ट्या अग्रेसर असलेले महाराष्ट्र राज्य वाहतूक करताना फोनचा वापर करण्याच्या गुन्ह्यात दुसऱ्या स्थानावर आहे. या परिस्थितीला कारणीभूत कोण? महाराष्ट्र पोलीस? कारण अतिशय उद्यमशील असे महाराष्ट्रातील लोक आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी फोनचा वापर सदोदित करत असतात. असा फोनचा वापर अपघाताला कारणीभूत ठरतो हा मुद्दा अलाहिदा.आपल्याकडे लोकलच्या डब्यावर चढून प्रवास करणारे स्टंटबाज जसे आहेत, त्याहून खूपच सोपा स्टंट म्हणजे, दुचाकी चालवताना हेल्मेटच्या आत कानावर खोचून फोनचा वापर करणारेही आहेत. दुचाकी वाहनांना ट्रॅफिकमधून मार्ग काढायला आवडते. विशेषत: बसेस व फुटपाथ यांच्यामधील चिंचोळ्या जागेतून निसटून जाताना, कानावर हेडफोन लावून संगीताचा आस्वाद घेताना आजूबाजूच्या वाहतुकीचे भान न राहिल्यामुळे अपघतात घडतात. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हाही आहे. अशा गुन्ह्यांचे प्रमाण जर १ टक्का असेल तर ते खूपच जास्त आहे.सध्या मोबाइल क्षेत्रातील क्रांतीमुळे इंटरनेटची सुविधा जवळजवळ सर्व मोबाइल कंपन्यांमार्फत ग्राहकांना दिली जाते. ज्यामुळे अनेक दृक्श्राव्य माध्यमांद्वारे मालिका, क्रीडा स्पर्धा, चित्रपट आदींचे प्रक्षेपण ग्राहकांना सहज उपलब्ध होते. परिणामी मोबाइलचा वापर अधिक होणे स्वाभाविकच आहे. वाहन चालवताना हे सर्व बघण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे अपघातही वाढले आहेत.मात्र हे सर्व रोखण्याची वेळ आता आली आहे. यासाठी सर्वांगाने प्रयत्न व्हायल हवेत. एक म्हणजे दंडात्मक कारवाई प्रभावीपणे करायला हवी. त्यासाठी ठोस उपाययोजना करायला हव्यात.दुसरे म्हणजे नवे तंत्रज्ञान शोधायला हवे, जसे की वेग मर्यादित ठेवण्यासाठी स्पीडो मीटरचा वापर करण्यात आला. त्याचप्रमाणे मोबाइल वापरावर बंदी आणण्यासाठी प्रवासात जॅमर किंवा अन्य पर्याय शोधायला हवा. याचे संशोधन राष्ट्रीय पातळीवर व्हायला हवे. तसेच वाहनांच्या व फोनच्या तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती होत आहे. मात्र चालकांच्या मानसिकतेमध्ये आवश्यक तो बदल होताना दिसत नाही. हा बदल घडवण्यासाठी सामाजिक व सरकारी स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत. तरच भविष्यात मोबाइलवर बोलून वाहन चालवणा-यांचे अपघात होणार नाहीत.

टॅग्स :carकार