शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

वाहनचालकांच्या मानसिक बदलाची गरज; सरकारी स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 03:12 IST

गेल्या २० वर्षांत मोबाइल फोनला आपल्या सर्वांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. जवळजवळ प्रत्येक व्यक्ती आज मोबाइल वापरते. मोबाइल वाजला रे वाजला की त्यावर त्वरित बोलण्याची निकड प्रत्येकाला असते. 

- अशोक दातार (वाहतूकतज्ज्ञ)गेल्या २० वर्षांत मोबाइल फोनला आपल्या सर्वांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. जवळजवळ प्रत्येक व्यक्ती आज मोबाइल वापरते. मोबाइल वाजला रे वाजला की त्यावर त्वरित बोलण्याची निकड प्रत्येकाला असते. एरव्ही काही आक्षेप असायचे काहीच कारण नाही. परंतु जेव्हा वाहनचालक असे करतात, तेव्हा ते नक्कीच आक्षेपार्ह व धोकादायक आहे.अनेकांना वाटते की वाहन चालवणे हा वेळेचा अपव्ययच आहे. तेव्हा जर फोन केल्यास हा वेळ सत्कारणी लागू शकतो. असे करणे काही गैर नाही. आता दुर्दैवाने पोलिसांच्या नियमानुसार वाहन चालवताना फोन करणे हा गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी शिक्षेचीही तरतूद आहे. मात्र पदोपदी पोलीस नसल्यामुळे वाहनचालक या संधीचा पुरेपूर फायदा घेताना दिसतात. औद्योगिक व व्यावसायिकदृष्ट्या अग्रेसर असलेले महाराष्ट्र राज्य वाहतूक करताना फोनचा वापर करण्याच्या गुन्ह्यात दुसऱ्या स्थानावर आहे. या परिस्थितीला कारणीभूत कोण? महाराष्ट्र पोलीस? कारण अतिशय उद्यमशील असे महाराष्ट्रातील लोक आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी फोनचा वापर सदोदित करत असतात. असा फोनचा वापर अपघाताला कारणीभूत ठरतो हा मुद्दा अलाहिदा.आपल्याकडे लोकलच्या डब्यावर चढून प्रवास करणारे स्टंटबाज जसे आहेत, त्याहून खूपच सोपा स्टंट म्हणजे, दुचाकी चालवताना हेल्मेटच्या आत कानावर खोचून फोनचा वापर करणारेही आहेत. दुचाकी वाहनांना ट्रॅफिकमधून मार्ग काढायला आवडते. विशेषत: बसेस व फुटपाथ यांच्यामधील चिंचोळ्या जागेतून निसटून जाताना, कानावर हेडफोन लावून संगीताचा आस्वाद घेताना आजूबाजूच्या वाहतुकीचे भान न राहिल्यामुळे अपघतात घडतात. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हाही आहे. अशा गुन्ह्यांचे प्रमाण जर १ टक्का असेल तर ते खूपच जास्त आहे.सध्या मोबाइल क्षेत्रातील क्रांतीमुळे इंटरनेटची सुविधा जवळजवळ सर्व मोबाइल कंपन्यांमार्फत ग्राहकांना दिली जाते. ज्यामुळे अनेक दृक्श्राव्य माध्यमांद्वारे मालिका, क्रीडा स्पर्धा, चित्रपट आदींचे प्रक्षेपण ग्राहकांना सहज उपलब्ध होते. परिणामी मोबाइलचा वापर अधिक होणे स्वाभाविकच आहे. वाहन चालवताना हे सर्व बघण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे अपघातही वाढले आहेत.मात्र हे सर्व रोखण्याची वेळ आता आली आहे. यासाठी सर्वांगाने प्रयत्न व्हायल हवेत. एक म्हणजे दंडात्मक कारवाई प्रभावीपणे करायला हवी. त्यासाठी ठोस उपाययोजना करायला हव्यात.दुसरे म्हणजे नवे तंत्रज्ञान शोधायला हवे, जसे की वेग मर्यादित ठेवण्यासाठी स्पीडो मीटरचा वापर करण्यात आला. त्याचप्रमाणे मोबाइल वापरावर बंदी आणण्यासाठी प्रवासात जॅमर किंवा अन्य पर्याय शोधायला हवा. याचे संशोधन राष्ट्रीय पातळीवर व्हायला हवे. तसेच वाहनांच्या व फोनच्या तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती होत आहे. मात्र चालकांच्या मानसिकतेमध्ये आवश्यक तो बदल होताना दिसत नाही. हा बदल घडवण्यासाठी सामाजिक व सरकारी स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत. तरच भविष्यात मोबाइलवर बोलून वाहन चालवणा-यांचे अपघात होणार नाहीत.

टॅग्स :carकार