शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

असहिष्णू परिस्थिती बदलण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 07:24 IST

एकेकाळी भारतातील नागरिकांना आपण सहिष्णू असल्याचा गर्व असे. मात्र गेल्या काही काळात ही परिस्थिती बदलू लागली आहे. समाजातील असहिष्णुता मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.

एकेकाळी भारतातील नागरिकांना आपण सहिष्णू असल्याचा गर्व असे. मात्र गेल्या काही काळात ही परिस्थिती बदलू लागली आहे. समाजातील असहिष्णुता मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. समाज मोठ्या प्रमाणात स्वार्थी व असहिष्णू होत चालला आहे. देश जेव्हा पारतंत्र्यात होता त्या वेळी समाज सहिष्णू व नि:स्वार्थी होता. त्यामुळे देशातून परकीय सत्तेला देशाबाहेर घालवणे शक्य झाले. मात्र, आता बदललेल्या परिस्थितीत समाजाचा कट्टरपणा, स्वार्थीपणा व असहिष्णुता सातत्याने वाढत चालल्याने देशाची वाटचाल विनाशाकडे चालली आहे. ही परिस्थिती तातडीने बदलण्याची व देशाला वाचवण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्या समाजात असहिष्णुता वाढत असते तो समाज टिकू शकत नाही व देशावर आघात होऊ लागतात. त्यामुळे देशाला वाचवण्यासाठी सर्वांनी सक्रिय होण्याची गरज आहे.

सध्या देशात बापूजींना प्रत्येक बॅनरवर स्थान दिले जात आहे. मात्र बॅनरवर बापूजींची छबी झळकवताना त्यांच्या विचारांवर आचरण करण्याकडे मात्र सर्वांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत आहे. याकडे कुणाचेच लक्ष नाही. बापूंना बॅनरवर स्थान देताना प्रत्यक्षात मनात मात्र बापूंच्या छबीऐवजी बापूंचा मारेकरी असलेल्या नथुरामची छबी आहे. बापूंचा केवळ दिखाव्यासाठी वापर करण्याऐवजी बापूंच्या आचारविचारांवर आचरण करण्याची गरज आहे. बापूंना स्वच्छता अत्यंत प्रिय होती. मात्र स्वच्छतेचा आग्रह धरताना बापू आत्मिक शुद्धी करण्याकडे जास्त लक्ष देत असत. सध्या मात्र त्याच्या विपरीत घडत आहे. गांधीवाद अंगीकारला जातो की नाही हे महत्त्वाचे आहे.

सध्या स्वच्छतेचे नाटक केले जात आहे. ज्या ठिकाणी खरोखर स्वच्छतेची गरज असते त्या ठिकाणी स्वच्छता करण्याऐवजी पूर्ण स्वच्छता असलेल्या ठिकाणीच स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. सत्ताधाऱ्यांना स्वच्छतेबाबत खरोखरच आस्था असेल तर आजही देशात अनेक ठिकाणी सफाईसाठी कामगारांना गलिच्छ गटारात उतरावे लागते. त्यांना पुरेशी साधनसामग्री पुरवली जात नाही. मनुष्याने केलेली घाण साफ करायला दुसºया मनुष्याला गटारात उतरावे लागणे यापेक्षा अधिक वाईट बाब नाही. मात्र त्याकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नाही. गटारात काम करणाºयांना विविध व्याधींमुळे हकनाक जीव गमवावा लागतो. मात्र त्यांच्या मृत्यूचे कोणालाही सोयरसुतक पडलेले नाही.

२ आॅक्टोबरला गांधीजींच्या मूर्तीसमोर केवळ हात जोडल्याने गांधीजींच्या विचारांचे पाईक होता येत नाही. त्यासाठी गांधीजींनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याची धमक दाखवावी लागते. परंतु, सध्या सर्व जण दुटप्पी भूमिकेत जगत असल्याने किती गंभीरतेने बापूंचे विचार अमलात आणले जात आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे. गांधीवादावर आता कोणाची श्रद्धा राहिली आहे, हाच आता प्रश्न निर्माण झाला आहे. राजकीय स्वार्थासाठीच बापूंचा उपयोग झाला आहे व होत आहे. सध्या समाजाचा प्रत्यक्ष कार्यापेक्षा प्रतिमेवर जास्त विश्वास असल्याने प्रतिमानिर्मिती करण्याकडे सर्वांचा कल आहे. भिंतीवर महापुरु षांची तसबीर टांगली की आपली जबाबदारी संपली, असा विचार केला जात आहे. मात्र, प्रतिमेच्या प्रेमात पडण्याऐवजी व भिंतीवर तसबिरी टांगण्याऐवजी हृदयात महापुरुषांची प्रतिमा कोरली जावी यासाठी प्रयत्न करण्याची खरी गरज आहे. हृदयात प्रतिमा कोरली गेल्यावर त्या महापुरुषाच्या विचारांवर आपोआप आचरण केले जाते. एकीकडे बापूंचे नाव, त्यांची प्रतिमा वापरली जात असताना प्रत्यक्षात बापूंच्या मारेकºयांचे उदात्तीकरण केले जात आहे. नथुरामचे मंदिर उभारले जात आहे. मात्र आता या बाबीचे जास्त आश्चर्य आम्हाला वाटत नाही व त्यांचा द्वेष वाटत नाही. कारण मारेकºयांची पूजा करणे ही त्यांची संस्कृती आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम त्यांना आवडत नाहीत, त्यांना रावणाचा वध करणारे रामच आवडतात. हा प्रकार वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. नथुरामभक्तीमध्ये ते प्रामाणिक आहेत. त्यामध्ये दांभिकता दिसत नाही.

सध्या देशभक्तीलादेखील दिखाऊपणा आला आहे. आपली देशभक्ती नाटकी, प्रचारकी पद्धतीची झाली आहे. समाजाची एकरूपता कमी झाली आहे. नेहमी सुप्तावस्थेत असणारी आपली देशभक्ती पाकिस्तानसोबत युद्ध झाले किंवा भारत-पाक सामना असेल तर उफाळून येते. समाजातील जातीयता, धर्मांधता वाढू लागली आहे. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत स्थानिक व परप्रांतीय असा भेद निर्माण करणे हा याच भूमिकेचा परिपाक आहे. प्रांतीयवाद, जातीयवाद, धर्मांधता यांचा कहर वाढून शेवटी देश-राष्ट्र म्हणून आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची भीती असते, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. राजकीय लाभाच्या हेतूने विविध राजकीय पक्षांकडून अशा प्रवृत्तींना जाणीवपूर्वक वाढवले जात आहे. त्यामुळे समाजात विष पेरले जात आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या धुव्रीकरणामुळे समाज विभागला जात आहे. याचा नेमका लाभ नाझी-फॅसिस्ट शक्तींना मिळत आहे. राजकीय इच्छाशक्तीपुढे सामाजिक सलोखा नष्ट होत आहे. महापुरुषाचे अनुयायी बनण्याची पात्रता आपल्यात उरली आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. सत्ताधाºयांचे आदर्श कोण आहेत हे जगजाहीर आहे. मात्र तरीही बापू त्यांची मजबुरी आहेत. त्यांना वगळून पुढे जाता येणे अशक्य झाले आहे, ही गांधीवादाची शक्ती आहे.- तुषार गांधीमहात्मा गांधीजींचे पणतू,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी