शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांनो आता पुरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:24 IST

१९६७ साली पश्चिम बंगालच्या नक्षलबाडीतून नक्षल चळवळ उदयास आली तेव्हा या देशातील उपेक्षित, वंचितांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला होता.

१९६७ साली पश्चिम बंगालच्या नक्षलबाडीतून नक्षल चळवळ उदयास आली तेव्हा या देशातील उपेक्षित, वंचितांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला होता. आपल्या हक्कांसाठी लढणारेही कुणी आहे, असे त्यांना वाटले होते. परंतु ही चळवळ केवळ हिंसाचार आणि दहशतवाद माजविण्यापुरतीच मर्यादित राहिली. ज्यांना आपण मित्र समजतो ते नक्षलवादीच आपल्या जीवावर उठतील याचा विचारही त्यांनी त्यावेळी केला नसावा. त्यामुळेच गेली अनेक वर्षे नक्षल्यांचा हिंसाचार ते निमूटपणे सहन करीत राहिले. परंतु एकीकडे स्वत:ला उपेक्षितांचे कैवारी म्हणायचे आणि दुसरीकडे गावातील निष्पाप लोकांच्या कत्तली करायच्या, त्यांच्या मुलामुलींना बंदुकीच्या धाकावर नक्षली चळवळीत सामील करुन घ्यायचे, विरोध करणाºयांना जगणे मुष्किल करायचे, त्यांची घरेदारे, पिके जाळायची हे नक्षल्यांचे दुटप्पी धोरण आता नक्षलग्रस्त भागातील लोकांना चांगल्याने समजले आहे. म्हणूनच या नक्षलवाद्यांविरुद्ध त्यांनी रणशिंग फुंकले असून देशातील नक्षलवाद समूळ नष्ट करण्याच्या दृष्टीने लोकभावनांमधील हा बदल अत्यंत महत्त्वाचा ठरणारा आहे. नक्षल्यांकडून पाळल्या जाणाºया शहीद सप्ताहात गडचिरोली जिल्ह्यात या विरोधाचे प्रतिबिंब बघायला मिळाले. प्रथमच या सप्ताहात नक्षल्यांना लोकांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागतो आहे. जीवाची पर्वा न करता लोक रस्त्यावर उतरले आहेत. या लोकांनी नक्षल्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणे तर बंद केलेच शिवाय त्यांनी लावलेले बॅनर्सही जाळले. पोलिसांनी नक्षल्यांची दोन स्मारके उद्ध्वस्त केल्यानंतर एटापल्ली तालुक्यातील वेलमागड गावात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नक्षल स्मारक तोडून नक्षल्यांबद्दलची चीड व्यक्त केली तर भामरागड तालुक्याच्या १३ गावांतील नागरिकांनी त्यांची शस्त्रे पोलिसांच्या स्वाधीन केलीत. या क्रांतिकारक बदलात त्या भागात कार्यरत काही सामाजिक संघटनांचाही मोलाचा वाटा आहे. नक्षलविरोधातील हे क्रांतिकारी पाऊल म्हणावे लागेल. देशातील १० राज्यांमधील १८० जिल्हे नक्षली हिंसाचाराचा सामना करीत आहेत. ही समस्या सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांशी निगडित असल्याने केवळ बळाचा वापर करुन सुटणारी नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेसोबतच दुर्गम आदिवासी भागाचा सर्वांगीण विकासही तेवढाच महत्त्त्वाचा आहे. नक्षलवादी संघटना या केवळ समाजाच्या पोषणावरच जिवंत असतात, हे सुद्धा लक्षात घ्यायचा हवे. हे पोषण बंद झाले की त्यांचा बीमोड करणेही मग कठीण नाही. तळपत्या लोखंडावर हातोडा मारणे केव्हाही चांगले. लोकजागर आणि जनआंदोलनातून ते शक्य आहे.