शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

नक्षल्यांनो आता पुरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:24 IST

१९६७ साली पश्चिम बंगालच्या नक्षलबाडीतून नक्षल चळवळ उदयास आली तेव्हा या देशातील उपेक्षित, वंचितांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला होता.

१९६७ साली पश्चिम बंगालच्या नक्षलबाडीतून नक्षल चळवळ उदयास आली तेव्हा या देशातील उपेक्षित, वंचितांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला होता. आपल्या हक्कांसाठी लढणारेही कुणी आहे, असे त्यांना वाटले होते. परंतु ही चळवळ केवळ हिंसाचार आणि दहशतवाद माजविण्यापुरतीच मर्यादित राहिली. ज्यांना आपण मित्र समजतो ते नक्षलवादीच आपल्या जीवावर उठतील याचा विचारही त्यांनी त्यावेळी केला नसावा. त्यामुळेच गेली अनेक वर्षे नक्षल्यांचा हिंसाचार ते निमूटपणे सहन करीत राहिले. परंतु एकीकडे स्वत:ला उपेक्षितांचे कैवारी म्हणायचे आणि दुसरीकडे गावातील निष्पाप लोकांच्या कत्तली करायच्या, त्यांच्या मुलामुलींना बंदुकीच्या धाकावर नक्षली चळवळीत सामील करुन घ्यायचे, विरोध करणाºयांना जगणे मुष्किल करायचे, त्यांची घरेदारे, पिके जाळायची हे नक्षल्यांचे दुटप्पी धोरण आता नक्षलग्रस्त भागातील लोकांना चांगल्याने समजले आहे. म्हणूनच या नक्षलवाद्यांविरुद्ध त्यांनी रणशिंग फुंकले असून देशातील नक्षलवाद समूळ नष्ट करण्याच्या दृष्टीने लोकभावनांमधील हा बदल अत्यंत महत्त्वाचा ठरणारा आहे. नक्षल्यांकडून पाळल्या जाणाºया शहीद सप्ताहात गडचिरोली जिल्ह्यात या विरोधाचे प्रतिबिंब बघायला मिळाले. प्रथमच या सप्ताहात नक्षल्यांना लोकांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागतो आहे. जीवाची पर्वा न करता लोक रस्त्यावर उतरले आहेत. या लोकांनी नक्षल्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणे तर बंद केलेच शिवाय त्यांनी लावलेले बॅनर्सही जाळले. पोलिसांनी नक्षल्यांची दोन स्मारके उद्ध्वस्त केल्यानंतर एटापल्ली तालुक्यातील वेलमागड गावात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नक्षल स्मारक तोडून नक्षल्यांबद्दलची चीड व्यक्त केली तर भामरागड तालुक्याच्या १३ गावांतील नागरिकांनी त्यांची शस्त्रे पोलिसांच्या स्वाधीन केलीत. या क्रांतिकारक बदलात त्या भागात कार्यरत काही सामाजिक संघटनांचाही मोलाचा वाटा आहे. नक्षलविरोधातील हे क्रांतिकारी पाऊल म्हणावे लागेल. देशातील १० राज्यांमधील १८० जिल्हे नक्षली हिंसाचाराचा सामना करीत आहेत. ही समस्या सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांशी निगडित असल्याने केवळ बळाचा वापर करुन सुटणारी नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेसोबतच दुर्गम आदिवासी भागाचा सर्वांगीण विकासही तेवढाच महत्त्त्वाचा आहे. नक्षलवादी संघटना या केवळ समाजाच्या पोषणावरच जिवंत असतात, हे सुद्धा लक्षात घ्यायचा हवे. हे पोषण बंद झाले की त्यांचा बीमोड करणेही मग कठीण नाही. तळपत्या लोखंडावर हातोडा मारणे केव्हाही चांगले. लोकजागर आणि जनआंदोलनातून ते शक्य आहे.