शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

राष्ट्रीय प्रतिमांचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 03:55 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिमांचे फार मोठे आकर्षण आहे. स्वत:चीही प्रतिमा निर्माण करून राजकीय लाभ उठविण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न राहतो. सार्वजनिक जीवनातील व्यक्तिमत्त्वासाठी प्रतिमा निर्माण करणे आणि तिचा खुबीने वापर करून घेणे, यात तसे गैर काही नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिमांचे फार मोठे आकर्षण आहे. स्वत:चीही प्रतिमा निर्माण करून राजकीय लाभ उठविण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न राहतो. सार्वजनिक जीवनातील व्यक्तिमत्त्वासाठी प्रतिमा निर्माण करणे आणि तिचा खुबीने वापर करून घेणे, यात तसे गैर काही नाही. मात्र, हे करीत असताना वास्तव बदलण्याचा प्रयत्न केल्यास फसगत होते. ऐतिहासिक घटना, त्यांचे महत्त्व, व्यक्तींचे कर्तृत्व, आदी बदलता येत नाही. ३१ आॅक्टोबर रोजी असाच प्रयत्न करण्यात आला. त्यादिवशी भारताचे पहिले उपपंतप्रधान लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती होती. त्याच दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी होती. सरदार पटेल यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि स्वातंत्र्योत्तर तीन वर्षांतील त्यांची सरकारमधील भूमिका ही अत्यंत सेवाभावी देशभक्ताची होती. त्यांनी दिलेले योगदान भारतीय इतिहासाला नवे वळण देणारे होते. इंदिरा गांधी यांचा इतिहास तर प्रचंड घडामोडींनी भरलेला आहे. त्यात चढ-उतार आहेत. तसेच देशाला अभिमान वाटावा अशा अनेक घटनांची नोंद आहे. नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही महान नेत्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीला प्रतिमांचे राजकारण केले. सरदार पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्याचा आदेश त्यांनी काढला. खूप चांगली गोष्ट आहे. सरदार पटेल यांनी गृहखाते सांभाळताना अनेकवेळा कणखर भूमिका घेतली. देशाची घटना अद्याप तयार व्हायची होती, फाळणीची जखम ताजी होती, देशात सुमारे ५०० संस्थानिक आपले स्वतंत्र संस्थान पुनर्स्थापित होते का, या प्रयत्नात होते. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या झाली होती. अशा कठीण प्रसंगात त्यांनी ठोस भूमिका घेतल्या. गांधी हत्येप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदीसुद्धा घातली. अशा महान नेत्याचे उचित स्मरण होत राहणे आवश्यक आहे. काँग्रेस पक्षाचे आणि या पक्षाच्या सरकारचे नेतृत्व बहुतांश वर्षे नेहरू-गांधी घराण्याकडे राहिले. या पक्षाने सरदार पटेल यांच्याकडे दुर्लक्ष केले, हे मान्य करावेच लागेल. त्यात सुधारणा करण्याची संधी म्हणून सरदार पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी झाली पाहिजे. मात्र, केवळ काँग्रेसवर कुरघोडी करण्यासाठी गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरदार पटेल यांच्या प्रतिमेकडे पाहिले जाऊ नये. सरदार पटेल साºया हिंदुस्तानचे नेते होते. त्यांचे स्मरण करून चूक दुरुस्त करण्याचा आव आणणाºयांनी इंदिरा गांधी यांच्या स्मृतीकडे दुर्लक्ष करणेही चुकीचे ठरत नाही का? त्या १५ वर्षे देशाच्या पंतप्रधान होत्या. पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारून स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती त्यांनी केली. देशात दारिद्र्य, गरिबी, महागाई, अन्नधान्य टंचाई, दुष्काळ, आदी समस्या आ वासून उभ्या असताना ही देदीप्यमान कामगिरी करणे सोपे नव्हते. इंदिरा गांधी यांच्या धैर्याला, देशभक्तीला आपण सलाम करणारच नाही का? सरदार पटेल यांनी केलेली ऐतिहासिक कामगिरी विसरणे जसे चुकीचे ठरते तसे इंदिरा गांधी यांच्याविषयी घेतलेली भूमिकाही चुकीची ठरते. गुजरातच्या लोहपुरुषावर अन्याय झाला अशा पद्धतीची पंतप्रधानपदावरील व्यक्तीने मांडणी करणे उचित नाही. हा केवळ प्रतिमांचा स्वार्थी राजकारणासाठी वापर झाला. शेवटी एका गोष्टीची नोंद करायला हवी, सरदार वल्लभभाई पटेल कॉँग्रेसचेच ज्येष्ठ नेते होते. त्यांनी काँग्रेसचा विचार तसूभरही बाजूला ठेवला नाही आणि त्यांनीच संघावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता, हेही ऐतिहासिक सत्य सांगून टाकावे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी