शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याच प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
3
Post Office च्या 'या' स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; गॅरंटीड रिटर्न सोबत बनेल पैसाच पैसा
4
'देश चालवण्यासाठी भीक मागावी लागते', युनूस यांनी विमान अपघाताबाबत केलेल्या पोस्टवर लोक संतापले
5
अरे देवा! ट्रेनमधून चोरीला गेल्या भाजपा नेत्याच्या आईच्या अस्थी; चोराला रंगेहाथ पकडलं अन्...
6
स्पेसमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यास NASA नं मनाई का केलीय, अंतराळात प्रेग्नेंट झाल्यास काय होईल?
7
Kanwar Yatra Accident: गंगेचं पाणी घेऊन निघाले अन् मृत्यूने गाठले; भाविकांच्या जत्थ्यात घुसली कार; ४ जागीच ठार
8
बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत मोठी बचत फिक्स
9
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
10
Deep Amavasya 2025 : दीप अमावस्येला मुलांना औक्षण करण्यामागे आहे 'ही' कृष्णकथा!
11
गुरुपुष्यामृतयोग: सद्गुरू सेवा शक्य नाही? १० मिनिटांत होणारे स्तोत्र म्हणा; पूर्ण पुण्य मिळवा
12
"आपणही विश्वास तोडला..."; रॅपिडो राइड दरम्यान महिलेनं स्वतःच रेकॉर्ड केला अपळा अॅक्सीडेंट - बघघा VIDEO
13
हॉलिवूडवर पसरली शोककळा, लोकप्रिय गायकाचं निधन; रणवीर सिंहनेही व्यक्त केली हळहळ
14
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
15
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी
16
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
17
घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले...
18
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर किती GST आकारणार? सरकारने संसदेत दिले उत्तर
19
गुन्हेगारांचे चेहरे स्केचमधून जिवंत करणारे आर्टिस्ट बनले ‘महाराज’, धमक्या, कुटुंबाच्या काळजीमुळे सोडली मुंबई 
20
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का

‘नसे भाग्यविधाता’!

By admin | Updated: August 10, 2016 04:12 IST

भारत हा नुसताच एक देश की ते एक राष्ट्रदेखील आहे, असा प्रश्न अधूनमधून डोके वर काढीत असतो. अशी शंका उपस्थित होण्याला बहुतेक वेळा कारणीभूत ठरत असते,

भारत हा नुसताच एक देश की ते एक राष्ट्रदेखील आहे, असा प्रश्न अधूनमधून डोके वर काढीत असतो. अशी शंका उपस्थित होण्याला बहुतेक वेळा कारणीभूत ठरत असते, ते ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रगान आणि ‘जन गण मन अधिनायक’ हे राष्ट्रगीत. सार्वजनिक स्तरावर या दोहोंचे गायन अनिवार्य केले जावे असा काहींचा आग्रह असतो तर या दोन्ही कवनांमधील अर्थ आणि भावार्थ आमच्या धर्माच्या शिकवणुकीच्या विरोधात असल्याने त्याला आमचा विरोध असल्याची देशातील काही मुस्लिसांची भूमिका. अधूनमधून असे वाद न्यायालयातही दाखल होत असतात. राष्ट्रगान किंवा राष्ट्रगीत उच्चारणे हेच केवळ देशभक्ती वा राष्ट्रभक्तीचे एकमात्र गमक नाही, असे निर्वाळेही मग न्यायालयांनी दिले आहेत. तरीही अधूनमधून वाद निर्माण होतच असतो, जसा तो आता उत्तर प्रदेशातील अलाहाबादच्या एका कॉन्व्हेन्ट स्कूलच्या व्यवस्थापकाच्या निर्णयामुळे निर्माण झाला आहे. झिया-उल-हक नावाच्या या व्यवस्थापकाच्या मते, ‘जन गण मन’ या राष्ट्रगीतामधील ‘भारत भाग्यविधाता’ ही संकल्पना आमच्या धर्माच्या शिकवणुकीच्या विरोधात आहे. त्याचे साधे कारण म्हणजे आमचा भाग्यविधाता परमेश्वर म्हणजे अल्ला आहे, देश कसा काय भाग्यविधाता असू शकतो? अर्थात ती या हक महोदयांची व्यक्तिगत भूमिका झाली. तिचा आदरच केला पाहिजे. पण तसा तो न करता त्यांना अटक करुन त्यांच्याविरुद्ध तेथील सरकार कारवाई करायला सज्ज झाले आहे. म्हणजे पुन्हा न्यायालयच निवाडा करणार. खरे तर प्रत्येक व्यक्तीचा भाग्यविधाता ती व्यक्ती स्वत:च असते, अशी शिकवण बव्हंशी धर्म देत असतात, पण तोही पुन्हा वादाचाच मुद्दा. पण यातील खरा गंभीर प्रकार पुढेच आहे. अलाहाबादच्या बघारा भागातील एम.ए.कॉन्व्हेन्ट स्कूल नावाची ही शाळा गेल्या तब्बल वीस वर्षांपासून तिथे अस्तित्वात आहे. तिथे शिकवण्याचे काम सुरु होते, विद्यार्थी प्रवेश घेत होते, माध्यमिक शालांत परीक्षांना बसत होते, काही उत्तीर्ण तर काही अनुत्तीर्णही होत होते, थोडक्यात सारे काही व्यवस्थित सुरु होते. पण शाळेचे व्यवस्थापक हक यांनी राष्ट्रगीतातील एका संकल्पनेवरुन त्यांची भूमिका मांडली आणि साऱ्यांचे लक्ष शाळेकडे वेधले गेले. दुसरे कारण म्हणजे हक यांच्या निर्णयाच्या विरोधात त्याच शाळेतील आठ शिक्षकांनी राजीनामे दिले. अर्थात हे शिक्षकदेखील अनधिकृत शाळेचेच सेवेकरी होते. साऱ्यांचे लक्ष वेधले गेल्याने एक महत्वाची माहिती उजेडात आली आणि ती म्हणजे कोणतीही सरकारी परवानगी न घेता दोन दशके ही शाळा खुशाल सुरु होती. या प्रदीर्घ काळात कोणाचेही आणि विशेषत: तथाकथित शिक्षण खात्याचे तिच्याकडे लक्ष जाऊ नये याला काय म्हणणार? आता सरकारने एकीकडे हक यांच्याविरुद्ध पोलीस कारवाई करतानाच दुसरीकडे ही शाळा कायमची बंद करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्या शाळेत जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांची सोय आता अन्य शाळांमध्ये करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. ‘चले थे रोजा बचाने उल्टे नमजा गले पडी’ अशी म्हणच आहे.