शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘नसे भाग्यविधाता’!

By admin | Updated: August 10, 2016 04:12 IST

भारत हा नुसताच एक देश की ते एक राष्ट्रदेखील आहे, असा प्रश्न अधूनमधून डोके वर काढीत असतो. अशी शंका उपस्थित होण्याला बहुतेक वेळा कारणीभूत ठरत असते,

भारत हा नुसताच एक देश की ते एक राष्ट्रदेखील आहे, असा प्रश्न अधूनमधून डोके वर काढीत असतो. अशी शंका उपस्थित होण्याला बहुतेक वेळा कारणीभूत ठरत असते, ते ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रगान आणि ‘जन गण मन अधिनायक’ हे राष्ट्रगीत. सार्वजनिक स्तरावर या दोहोंचे गायन अनिवार्य केले जावे असा काहींचा आग्रह असतो तर या दोन्ही कवनांमधील अर्थ आणि भावार्थ आमच्या धर्माच्या शिकवणुकीच्या विरोधात असल्याने त्याला आमचा विरोध असल्याची देशातील काही मुस्लिसांची भूमिका. अधूनमधून असे वाद न्यायालयातही दाखल होत असतात. राष्ट्रगान किंवा राष्ट्रगीत उच्चारणे हेच केवळ देशभक्ती वा राष्ट्रभक्तीचे एकमात्र गमक नाही, असे निर्वाळेही मग न्यायालयांनी दिले आहेत. तरीही अधूनमधून वाद निर्माण होतच असतो, जसा तो आता उत्तर प्रदेशातील अलाहाबादच्या एका कॉन्व्हेन्ट स्कूलच्या व्यवस्थापकाच्या निर्णयामुळे निर्माण झाला आहे. झिया-उल-हक नावाच्या या व्यवस्थापकाच्या मते, ‘जन गण मन’ या राष्ट्रगीतामधील ‘भारत भाग्यविधाता’ ही संकल्पना आमच्या धर्माच्या शिकवणुकीच्या विरोधात आहे. त्याचे साधे कारण म्हणजे आमचा भाग्यविधाता परमेश्वर म्हणजे अल्ला आहे, देश कसा काय भाग्यविधाता असू शकतो? अर्थात ती या हक महोदयांची व्यक्तिगत भूमिका झाली. तिचा आदरच केला पाहिजे. पण तसा तो न करता त्यांना अटक करुन त्यांच्याविरुद्ध तेथील सरकार कारवाई करायला सज्ज झाले आहे. म्हणजे पुन्हा न्यायालयच निवाडा करणार. खरे तर प्रत्येक व्यक्तीचा भाग्यविधाता ती व्यक्ती स्वत:च असते, अशी शिकवण बव्हंशी धर्म देत असतात, पण तोही पुन्हा वादाचाच मुद्दा. पण यातील खरा गंभीर प्रकार पुढेच आहे. अलाहाबादच्या बघारा भागातील एम.ए.कॉन्व्हेन्ट स्कूल नावाची ही शाळा गेल्या तब्बल वीस वर्षांपासून तिथे अस्तित्वात आहे. तिथे शिकवण्याचे काम सुरु होते, विद्यार्थी प्रवेश घेत होते, माध्यमिक शालांत परीक्षांना बसत होते, काही उत्तीर्ण तर काही अनुत्तीर्णही होत होते, थोडक्यात सारे काही व्यवस्थित सुरु होते. पण शाळेचे व्यवस्थापक हक यांनी राष्ट्रगीतातील एका संकल्पनेवरुन त्यांची भूमिका मांडली आणि साऱ्यांचे लक्ष शाळेकडे वेधले गेले. दुसरे कारण म्हणजे हक यांच्या निर्णयाच्या विरोधात त्याच शाळेतील आठ शिक्षकांनी राजीनामे दिले. अर्थात हे शिक्षकदेखील अनधिकृत शाळेचेच सेवेकरी होते. साऱ्यांचे लक्ष वेधले गेल्याने एक महत्वाची माहिती उजेडात आली आणि ती म्हणजे कोणतीही सरकारी परवानगी न घेता दोन दशके ही शाळा खुशाल सुरु होती. या प्रदीर्घ काळात कोणाचेही आणि विशेषत: तथाकथित शिक्षण खात्याचे तिच्याकडे लक्ष जाऊ नये याला काय म्हणणार? आता सरकारने एकीकडे हक यांच्याविरुद्ध पोलीस कारवाई करतानाच दुसरीकडे ही शाळा कायमची बंद करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्या शाळेत जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांची सोय आता अन्य शाळांमध्ये करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. ‘चले थे रोजा बचाने उल्टे नमजा गले पडी’ अशी म्हणच आहे.