शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

ललित मोदी प्रकरणी नरेन्द्र मोदींचे मौन का?

By admin | Updated: June 27, 2015 00:25 IST

ललित मोदींना राजेशाही पद्धतीने जगणे आवडते. २०१० सालच्या ‘इंडियन प्रिमिअर लीग’ आधी मी त्यांची मुलाखत घेण्यासाठी मुंबईतल्या एका हॉटेलच्या आलीशान

राजदीप सरदेसाई, (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक) -

ललित मोदींना राजेशाही पद्धतीने जगणे आवडते. २०१० सालच्या ‘इंडियन प्रिमिअर लीग’ आधी मी त्यांची मुलाखत घेण्यासाठी मुंबईतल्या एका हॉटेलच्या आलीशान सदनिकेत गेलो होतो. एका खोलीत मी त्यांची वाट बघत असताना तेथे संघ मालक, उद्योजक, अभिनेते, राजकारणी आणि क्रि केट बोर्डाचे अधिकारीसुद्धा उपस्थित होते. ललित मोदींनी तिथे येताच ऐटीत माझ्याकडे बघत ‘हे सगळे माझे मित्र आहेत, बघितले तुम्ही’ असे म्हटले होते. पाच वर्षानंतर आज त्यातले बरेचसे मित्र शत्रू आहेत. क्रि केटमधील आयपीएलची मालकी भारतीय क्रि केट नियामक मंडळाकडे आहे. क्रीडा जगतातल्या या सर्वात श्रीमंत मंडळाच्या आर्थिक व्यवहारासंबंधी संसदेत २०१०-११ साली एक खळबळजनक अहवाल सादर करण्यात आला होता. पण आयकर खाते आणि सक्तवसुली संचालनालयाच्या त्यासंबंधीच्या चौकश अहवालांवर आता धूळ साचली आहे. ललित मोदींनी मंडळाचे सर्व नियम मोडत आयपीएल नावाची व्यक्तिगत जहागीर निर्माण केली आणि उच्च राहणीमानाच्या जीवनाची जबर किंमतही मोजली.आयपीएलचा राजकीय अवतारसुद्धा प्रभावी लोकांनी भरलेला आहे. त्यात काही आघाडीचे नेते सुद्धा आहेत. हे लोक फायद्याच्या वेळी नि:पक्षपातीपणे एकत्र येतात, परस्पर सहकार्याची आणि संरक्षणाची भावना ठेवतातव परस्परांच्या नातेवाईकांच्या आर्थिक भल्याकडेही पुरेपूर लक्ष देतात. संकटाच्या काळी हेच लोक कायदेशीर यंत्रणेलाही रोखून धरतात. गुप्ततेचा संकेत कुठल्याही प्रकारे मोडला जाणार नाही, यासाठी हे लोक कमालीचे प्रयत्नशील असतात. पण ललित मोदी प्रकरणाने गुप्ततेचा हा संकेतच उधळून टाकला आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आपले कौटुंबिक मित्र आहेत आणि त्यांचे पती स्वराज कौशल यांनी आपल्याला मोफत कायदेविषयक सहाय्य केले असल्याचे ललित मोदींनी अगदी सहज उघड करून टाकले. सुषमा स्वराज यांना असे कधीच वाटले नसेल की, राजशिष्टाचार डावलून मोदींच्या पासपोर्टची जप्ती रद्द करण्यास सांगण्याने त्यांना अडचणीत पडावे लागेल. मोदींनी वसुंधरा राजे यांच्याशी असलेले मैत्री-संबंधही लपवून ठेवले नाहीत. त्यांनी हेही लक्षात आणून दिले आहे की शरद पवार, प्रफुल पटेल, राजीव शुक्ला आणि अशा इतर लोकांनीही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. यातून हे स्पष्ट होते की मोदींचे मित्र केवळ भगव्या समूहापर्यंत मर्यादित नव्हते. त्यातून हेही स्पष्ट झाले की, राजकारणी वर्ग परस्पर सहकार्यानेच वागत असतो. कॉंग्रेसचा रोख भले आज भाजपाच्या दिशेने तीव्र असला तरी प्रत्यक्षात २०१० ते २०१४ या चार वर्षात संपुआ सरकारनेही ललित मोदींच्या इंग्लंडमधील तडीपारी संदर्भात बऱ्यापैकी पाठपुरावा केला होता. २०१३ साली तत्कालीन अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी त्या संदर्भात इंग्लंड सरकारला दोन पत्रेही पाठवली होती. खरे तर तेव्हां मोदी फरार होते आणि त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई आवश्यक होती. नरेंद्र मोदी सरकारने तर हा मुद्दा दुय्यम स्थानीच ठेवला. उच्च न्यायालयाने गेल्या आॅगस्टमध्ये ललित मोदींना पासपोर्ट देण्याची अनुमती दिली, पण सरकारने अपील केलेच नाही. आता सक्तवसुली संचालनालयाकडून रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची भीती घालणे म्हणजे वराती मागचे घोडेच म्हणायचे. सक्तवसुली संचालनालय आणि आयकर विभागाच्या भूमिका बऱ्याच वेळा हातच्या बाहुल्यासारख्या राहिल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून नेहमीच स्वकीयांच्या अपसंपदेचे संरक्षण आणि विरोधकांशी ठराविक वादांवर सामंजस्य निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे एक तर ललित मोदींच्या विरोधात खंबीर असे पुरावेच नाहीत किंवा हे प्रकरण जाणीवपूर्वक डळमळीत अवस्थेत ठेवण्यात आले आहे. आयपीएल क्लबचे सदस्य म्हणून विशेष सवलती प्राप्त होण्याची दोन उदाहरणे आहेत, रॉबर्ट वाड्रा आणि दुष्यंत सिंह. पहिले कॉंग्रेस अध्यक्षांचे जावई तर दुसरे राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र. दोघांनीही सत्तास्थानांशी असलेली निकटता आणि अप्रत्यक्ष गुंतवणुकीच्या जोरावर प्रचंड नफा कमावला आहे. मागील वर्षी हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या आधी भाजपाने वाड्रा प्रकरण धसास लावण्याचे आश्वासन दिले होते, पण सत्तेत येताच चौकशीचा काटा जागेवरून तसूभरसुद्धा सरकला नाही. २००८ साली राजस्थानात सत्तेत येण्याआधी कॉंग्रेसने सुद्धा वसुंधरा-दुष्यंत-ललित मोदी यांचे लागेबांधे उघड करण्याचे आश्वासन दिले होते, पण अशोक गेहलोत सरकारने त्या मु्द्याला बगल दिली, कदाचित चौकशीत त्यावेळी मुख्यमंत्र्यांचे पुत्र सुद्धा अडकले असते. नरेंद्र मोदींचे पाठीराखे असा दावा करतात की त्यांना आयपीएलच्या सत्तेवरची घट्ट पकड सोडवायची आहे आणि ललित मोदी प्रकरण उघड होणे ही त्याची सुरुवात आहे. हे जर खरे असेल तर इतरवेळी बोलघेवडापणा करणारे पंतप्रधान मौन का बाळगून आहेत? ताजा कलम: मॉन्टेग्रोे येथे ललित मोदींची मुलाखत घेत असताना मला त्यांच्या मित्र वर्तुळात डोकावून बघायची संधी मिळाली. त्यांची नावे उघड न करता मी एवढेच म्हणेन की २०१० साली त्यांचा प्रभावशाली मित्र समूह प्रामुख्याने एतद्देशीय होता आणि आता त्यांचा मित्र समूह आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे.