शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

निलेकणी अभिनंदनास पात्र; पण अशी 'नंदन' वने फुलावी! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 10:21 IST

निलेकणी हे देशातील आघाडीच्या उद्योगपतींपैकी एक आहेत.

चक्रीवादळाचे थैमान, त्यामुळे देशभर लांबलेले मान्सूनचे आगमन, परिणामी चिंताक्रांत झालेला बळीराजा, मणिपूरमध्ये उफाळलेला हिंसाचाराचा डोंब, क्षुल्लक कारणांवरून निर्माण होत असलेले धार्मिक- जातीय तणाव, असे नकारात्मकतेचे मळभ दाटले असतानाच, मंगळवार एका आनंददायक बातमीची सुखद सर घेऊन आला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी कंपनी 'इन्फोसिस'चे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांनी मुंबईस्थित भारतीय तंत्रज्ञान संस्थेला (आयआयटी) तब्बल ३१५ कोटी रुपयांची देणगी दिली, ही ती बातमी निलेकणी यांना १९७३ मध्ये मुंबई आयआयटीत विद्युत अभियांत्रिकी शाखेला प्रवेश मिळाला होता. त्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कृतज्ञतेच्या भावनेतून त्यांनी ही भरीव देणगी दिली. 

निलेकणी हे देशातील आघाडीच्या उद्योगपतींपैकी एक आहेत. आज इन्फोसिसची वार्षिक उलाढाल अब्जावधी डॉलर्सच्या घरात आहे. त्यामुळे निलेकणी यांनी ज्या शैक्षणिक संस्थेतून पदवी घेतली, त्या संस्थेला देणगी दिली, तर त्यात काय मोठे? अशा नाक मुरडणाऱ्या प्रतिक्रिया उमटू शकतात; पण निलेकणी यांच्यापेक्षाही जास्त उत्पन्न मिळविणारे अनेक उद्योगपती भारतात आहेत आणि त्यांच्यापैकी किती जणांनी अशा मोठ्या देणग्या दिल्या आहेत? भारतीय संस्कृतीत दानधर्माला खूप महत्त्व दिले आहे. अनेकजण दानधर्म करतातही; पण दान सत्पात्री पडावे, याची काळजी किती जण घेतात? निलेकणी यांनी ती घेतली आहे आणि म्हणून त्यांच्या देणगीचे महत्त्व मोठे आहे. पाश्चात्य जग भौतिक सुखाला जास्त महत्त्व देते आणि आम्ही मात्र मोहमायेपासून दूर राहतो, असा अभिमान आपण भारतीय बाळगतो. तो सार्थ की वृथा, हे ज्याचे त्याने ठरवावे; पण पाश्चात्य जग आणि भारतातील धनाढ्य मंडळींकडून केल्या जाणाऱ्या परमार्थाची तुलना केल्यास, भारतीयांवर नक्कीच मान खाली घालण्याची वेळ येते. 

सात पिढ्यांसाठी तरतूद करून ठेवणे, हा वाक्प्रचार भारतात ठायीठायी वापरला जातो; पण सातच काय सत्तर पिढ्या काहीही न करता सुखात जगू शकतील, एवढी तरतूद करून ठेवल्यावरही पैशांची हाव सुटत नाही, अशी अनेक उदाहरणे प्रत्येकाच्या अवतीभवती असतात. दुसरीकडे आपण ज्यांच्यावर भौतिक सुखांच्या मागे धावण्याचा ठपका ठेवतो, ते पाश्चात्य मात्र आयुष्य सुखासमाधानात व्यतित केल्यावर आपल्या पुढील पिढ्यांची फार काळजी न करता, गाठीशी असलेला पैसा सत्कर्मी लावताता पाश्चात्य जगातील उद्योगपतींनी स्थापन केलेली विविध प्रतिष्ठाने आणि त्या माध्यमातून जगभरात वंचितांसाठी केली जाणारी कामे बघितली, तर डोळे फाटायला होतात. भारतातही काही उद्योगपती अशी कामे करतात; परंतु दुर्दैवाने त्यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येईल, एवढी कमी आहे. त्यामागचे कारण पाश्चात्य जग आणि भारताच्या भिन्न सांस्कृतिक व ऐतिहासिक जडणघडणीत दडलेले आहे. 

भारतातील सामाजिक चौकटीत पूर्वापार अध्यात्म, दानधर्म यावर जास्त जोर देण्यात आला आहे. त्यामुळे इहलोकात अवतीभवती दृष्टीस पडत असलेले दीनदुबळे, वंचित, पीडित यांच्याकडे दुर्लक्ष करून, स्वर्गलोकात स्थान मिळविण्यासाठी आमची सगळी धावपळ सुरू असते. इहलोकातील दीनदुबळ्यांच्या सेवेतच खरे स्वर्गसुख असल्याची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांची शिकवण कधीच आमच्या पचनी पडली नाही. आम्ही त्यांना केवळ त्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यापुरतेच मर्यादित करून ठेवले आहे. दुसरीकडे पाश्चात्य जगात वंचित घटकांसाठी सहाय्यभूत ठरतील, अशा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपाययोजनांवर भर देण्यात आला. त्यांच्या कडक नियामक धोरणांनीही त्यामध्ये मोठी भूमिका अदा केली. 

भारतात मात्र उद्योगांची सामाजिक बांधिलकी (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) ही संकल्पनाच पाश्चात्य जगाच्या तुलनेत खूप उशिरा म्हणजे पार २०१३ मध्ये आली. त्यानंतरच्या एक दशकातही सुस्पष्ट मार्गदर्शक तत्वे आणि कडक नियामक धोरणे अमलात आणण्यात आम्ही अपयशी ठरलो आहोत. बरेचदा भारतीय उद्योग आणि पाश्चात्य जगातील उद्योग यांची बरोबरी होऊ शकत नाही, अशी मांडणी केली जाते. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यामध्ये तथ्यही होते; पण अलीकडे भारतीय उद्योगांनी मोठी झेप घेतली आहे. सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रात मात्र ती झेप दुर्दैवाने दिसलेली नाही. देशाला पुढे न्यायचे असल्यास तंत्रज्ञानावरच जोर द्यावा लागणार आहे. ती जाणीव ठेवल्याबद्दल नंदन निलेकणी अभिनंदनास पात्र आहेत; पण अशी आणखी किती तरी 'नंदन'वने फुलणे आवश्यक आहे.

टॅग्स :Nandan Nilekaniनंदन निलेकणी