शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाण्याच्या प्रथमेशचा ‘नेम’.. ग्रामीण जिद्दीला नवी आशा!

By किरण अग्रवाल | Updated: May 24, 2023 07:42 IST

प्रथमेश जावकारने मेहनत, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर जागतिक तिरंदाजीत सुवर्णवेध साधला. अशीच क्षमता ग्रामीण भागातल्या अनेक खेळाडूंकडे आहे..

- किरण अग्रवाल, कार्यकारी संपादक, लोकमत, अकोला

मनगटात रग असली, अडचणींना खांद्यावर घेण्याची हिंमत असली, काही करून दाखविण्याची धमक असली की साधनसंपन्नता नसली तरी त्या जिद्दीच्या बळावर ध्येयाचे शिखर गाठणे अवघड नसते. प्रतिकूलतेवर मात करीत जागतिक तिरंदाजीत विश्वविजेत्यास नमवून सुवर्णपदकावर नाव कोरलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील प्रथमेश जावकार या तरुणाच्या कामगिरीनेही तोच दृष्टांत दिला आहे.

क्रीडाक्षेत्रात, विशेषत: ग्रामीण भागातील मुले चमकदार कामगिरी करून भारताचे नाव उंचावत  असल्याची उदाहरणे कमी नाहीत. भाषेची समस्या, प्रशिक्षण व साधनांची कमतरता अशा अनेक अडचणींवर मात करीत ही मुले सातासमुद्रापार तिरंगा फडकवून येतात. लिंबाराम व मेरी कोम यांचीच नव्हे, आपल्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी भागातील सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत, चांदवडचा रोइंगपटू दत्तू भोकनळ, चाळीसगाव तालुक्यातील बेसबॉलपटू रेखा धनगर, अकोल्याची महिला बॉक्सर साक्षी गायधनी, अशी अनेक नावे यासंदर्भात घेता येतील; ज्यांनी ग्रामीण भागातून येत आपल्या यशाचा डंका वाजविला. नांदुरा तालुक्यातील अलमपूर या अतिशय छोट्याशा गावचा प्रथमेश हा त्यातलाच एक; ज्याने आत्मविश्वास व मेहनतीच्या बळावर जागतिक स्पर्धेवर आपले नाव कोरले. वडील प्रारंभी ‘एमआर’, म्हणजे वैद्यकीय प्रतिनिधी होते. चार एकरची कोरडवाहू शेती. कमाई ती कितीशी असणार? पण तरी या पित्याने पोटाला चिमटा घेत आपल्या पोराच्या गुणांना, मेहनतीला प्रोत्साहन दिले आणि या पोरानेही थेट विश्वविजेत्या नेदरलँडमधील माइक श्लोसरवर विजय मिळवीत जागतिक तिरंदाजीत सुवर्ण पटकावले.

ग्रामीण भागातून पुढे आलेला व जागतिक पातळीवर चमकलेला प्रथमेश हा काही पहिलाच खेळाडू नाही. अनेकांच्या अशा धडपडीच्या यशोकथा आहेत. प्रश्न एवढाच आहे की, शहरी झगमगाटापासून दूर असलेल्या ग्रामीण भागातील या अशा हिऱ्यांना जोखणारा जव्हेरी कसा लाभेल? ग्रामीण भागातील खेळाडूंचे सोडा,  शहरातील खेळाडूंनाही गॉडफादर लाभल्याखेरीज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंत मजल मारणे कठीण होऊन बसते. अशा वेळी ग्रामीण भागातील खेळाडूंची मेहनत व त्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष वेधले जाणे स्वाभाविक आहे.आदिवासी वाडे-पाड्यांवरील दगड-धोंड्यात सराव करणाऱ्या खेळाडूंची नैसर्गिक क्षमता हेरून त्यांना योग्य त्या प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे, अन्यथा गुणवत्ता असूनही ही मुले मुंबईदेखील गाठू शकत नाहीत. जिल्हा व राज्यस्तरापर्यंत ही मुले कशी तरी धडपडत येतात, पण योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणाअभावी ते तिथेच अडकून पडतात. धावपटू कविता राऊतला ज्याप्रमाणे विजेंद्रसिंह व तिरंदाज प्रथमेश जावकारला चंद्रकांत इलग यांच्यासारखे प्रशिक्षक लाभले, तसे सर्वांना लाभतील का, हा खरा प्रश्न आहे. 

आपल्याकडे क्रिकेटला जेवढे ग्लॅमर आहे, तेवढे अन्य खेळांना नाही ही वास्तविकता आहे. क्रिकेट संघटनांकडून खेळातील व्यावसायिकता जपली जाते. अन्य क्रीडा प्रकारांच्या संघटनांकडून ते होताना दिसत नाही. आपल्याकडे अनेक शहरांत क्रीडांगणे व हॉल आहेत. मात्र, तेथे क्रीडा सरावांपेक्षा लग्न सोहळेच अधिक उरकले जाताना दिसून येतात.  खेळांकडे करिअर म्हणून फारसे पाहिले जात नाही, त्यामुळे ही अनास्था दिसून येते.  क्रीडा नैपुण्यासाठी प्रशिक्षण हा भाग महत्त्वाचा आहेच; परंतु त्यासोबतच क्रीडा विज्ञानाचा विचार होणेही गरजेचे आहे. दुर्दैवाने आपल्याकडे त्याचा अभाव आहे. खेळाडूंचा आहार, औषधोपचार, मानसोपचार यासारख्या बाबी तर कोणाच्या खिजगिणतीतही नाहीत. खेळ व खेळाडूंच्या चहूमुखी विकासासाठी सर्वंकष पातळीवर प्रयत्नांची अपेक्षा आहे. आगामी आशियाई स्पर्धा व  ऑलिम्पिकची तयारी आतापासून करताना ग्रामीण भागातून पुढे आलेल्या खेळाडूंवर लक्ष केंद्रित केले तर पदक तालिकेतील आपला नंबर नक्कीच वाढू शकेल हे जावकारच्या उदाहरणाने स्पष्ट झाले आहे.    kiran.agrawal@lokmat.com