शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

नासरी चव्हाण

By admin | Updated: November 23, 2015 21:46 IST

नासरीला कुणाचे पाठबळ नाही. सामाजिक संस्था, सरकारची मदतही नाही. तिला अपेक्षाही नाही. ती शेतात कामावर जाते आणि त्यातून आलेल्या पैशातून शाळेतील मुलांना वही-पेन्सील घेऊन देते.

- गजानन जानभोरआपल्या समाजाच्या दारिद्र्याचे कारण तिला ठाऊक आहे. पिढ्यान्पिढ्यांपासून वनवासी, आदिवासी म्हणून उपेक्षित ठेवलेल्या या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न अजूनही होत नाहीत. हे समाजवास्तव तिला अस्वस्थ करायचे. ती व्यथित व्हायची. एके दिवशी शाळेतून घरी येत असताना रस्त्यात तिला खेळत असलेली मुले दिसली. खाऊचे आमिष दाखवून त्यांना ती घरी घेऊन आली आणि बाराखडी शिकवू लागली. तोपर्यंत त्या मुलाना शाळा ठाऊक नव्हती आणि अक्षरेही अनोळखी होती. अनेक दिवसांपासून भंडावून सोडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर तिनेच शोधले. आता ती मुले रोज शाळेत येतात. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बोरव्हा या आदिवासी खेड्यात नासरी शेकड्या चव्हाण या आदिवासी तरुणीने सुरू केलेल्या समाज शिक्षणाची आणि लोकजागराची ही गाथा आहे.अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात बोरव्हा हे १०० घरांचे गाव. पाच वर्षांपासून नासरीची ही बिनभिंतीची शाळा सुरू आहे. सध्या या शाळेत ३० विद्यार्थी (२० मुले आणि १० मुली) आहेत. हे तिचे एकल विद्यालय. विद्यार्थ्यांचा वयोगट नाही, वर्गाची अटही नाही. त्यांना शाळेची ओढ आणि अक्षरांची गोडी लागावी एवढीच तिची कळकळ. ‘त्यांना एकदा का अक्षरओढ लागली की त्यांचे आयुष्य आपसूक मातीसारखे आकार घेऊ लागेल. मी फक्त एक माध्यम’, नासरी सहजपणे बोलून जाते. दहावी झाल्यानंतर तिने पुढे शिकू नये, असे आई-वडिलांना वाटायचे. शिकून तरी उपयोग काय? त्यापेक्षा आमच्यासोबत कामावर चल! हा त्यांचा आग्रह असायचा. पण नासरीने हट्टाने अकरावीत प्रवेश घेतला. शाळा गावापासून १२ कि.मी. दूर हिवरखेडला. शाळेत ती रोज पायी जायची. नासरीसोबत शिकणाऱ्या मुलींची मात्र शाळा सुटली, त्या शेतात काम करू लागल्या. सकाळी नासरी शाळेसाठी घरून निघायची, त्याच वेळी तिच्या मैत्रिणी कामावर जायच्या. संध्याकाळी ती शाळेतून घरी परतायची आणि त्या शेतातून... नासरीच्या आयुष्याची वाट अशी बदलत होती आणि मैत्रिणींची विस्कटत... नासरी अस्वस्थ व्हायची. मग ती सुटीच्या दिवशी मैत्रिणींना घरी बोलावून शिकवू लागली.नासरीला कुणाचे पाठबळ नाही. सामाजिक संस्था, सरकारची मदतही नाही. तिला अपेक्षाही नाही. ती शेतात कामावर जाते आणि त्यातून आलेल्या पैशातून शाळेतील मुलांना वही-पेन्सील घेऊन देते. लोकजागराचे हे व्रत इथेच थांबत नाही. सरकारच्या योजनांचा लाभ आणि सरकारी अनुदान गावकऱ्यांना मिळवून देण्यासाठी ती धडपडत असते. मागील चार वर्षांत गावातील २३ कुटुंबांना ६९ शेळ्या, ४० कुटुंबांना कुक्कुटपालनासाठी ४०० कोंबड्या शासकीय योजनेतून मिळाल्या. त्यामागे प्रयत्न नासरीचेच. शेतकऱ्यांना घरीच सेंद्रीय खत तयार करायला तिने शिकविले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनाही ती मार्गदर्शन करीत असते. पिकांना बीज प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण ती शेतकऱ्यांना देते. कीटकनाशकाचे डबे पाणी घेण्यासाठी आणि धान्य काढण्यासाठी वापरले जातात. या विषारी डब्यांमुळे विषबाधा होऊन गावकरी आजारी पडतात, असे तिने कुठेतरी वाचले. त्यानंतर हे विषारी डबे गावकऱ्यांनी वापरू नयेत, यासाठी ती प्रबोधन करू लागली. यावर्षी संक्रांतीच्या वाणात नासरीने गृहिणींना प्लॅस्टिकचे पाण्याचे मग म्हणूनच भेट दिले. पोलिओ डोस आणि लसीकरणाबद्दल आदिवासींमध्ये प्रचंड गैरसमज आहेत. ते दूर करताना नासरीला अनेक दिव्यातून जावे लागते. गावकरी शासकीय अधिकाऱ्यांचे ऐकत नाहीत, पण नासरीचे ऐकतात. कारण ती त्यांच्या दु:खाशी एकरूप होते. आदिवासी भागात सरकारच्या योजना लवकर पोहोचत नाहीत. पण सर्व धर्माचे देव आणि त्या धर्माचे ठेकेदार वेगाने तिथे पोहोचतात. त्यांना आदिवासींच्या कल्याणापेक्षा धर्मांतराची अधिक काळजी असते. शिक्षण पोहोचविण्यासाठी मात्र कुणीच धडपडत नाही. ते तिथे पोहोचावे आणि नंतर अंकुरावे यासाठीच नासरी तळमळते.