शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

रस्त्यावरची लढाई लढणारा शेवटचा मालुसरा काळाच्या पडद्याआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 05:28 IST

राज्यातल्या गोरगरिबांसाठी एन. डी. विधानसभेत लढले, रस्त्यावर लढले. ते गेले... आता रस्त्यावरच्या लढाईला कुणी वाली उरला नाही!

- मधुकर भावे, लोकमतचे निवृत्त संपादकएन. डी.  गेले. महाराष्ट्राच्या लढाऊ परंपरेतील शेवटचा मालुसरा धारातीर्थी पडला. गणपतराव देशमुख यांच्यापाठोपाठ एन. डी. यांनी जाणे म्हणजे अन्याय-अत्याचाराविरोधातील रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या सेनापतीनेच जाणे आहे. एन. डी. यांच्या निधनानंतर सामान्य माणसांचा आवाज बुलंद करून रस्त्यावर उतरण्याची हिंमत दाखवणारा आता कोणीही राहिला नाही. एन. डी. नावाचा हा योद्धा रस्त्यावरची सामान्य माणसाची लढाई लढतच राहिला.  त्याचवेळी वैचारिक आघाडीवर भल्या-भल्या बुद्धिवंतांची, विधानसभेत भल्या-भल्या मंत्र्यांची फटफजिती करण्याची वैचारिक ताकद एन. डी. यांच्या विचारांत होती. अभ्यासात, वागण्यात आणि चारित्र्यातही होती. त्यामुळेच शरद पवार यांचे सख्खे मेहुणे असतानाही आपल्या वैचारिक भूमिकेशी एन. डी. यांनी आयुष्यभर कधीच तडजोड केली नाही. जिथे लढा आहे तिथे एन. डी. आहेत. मग तो बेळगाव-कारवारचा सीमा लढा असो, महागाईविरोधातील लढा असो, संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो, सेझविरोधातील रायगडच्या शेतकऱ्यांचा लढा असो, नाहीतर कोल्हापूरच्या टोलनाक्याचा लढा असो; जाती-पातीची नात्यागोत्याची किंवा सत्तेची पर्वा एन. डी. यांनी कधीच केली नाही. भक्कम वैचारिक भूमिका, भरदार-पिळदार शरीरयष्टी... माईक असो किंवा नसो.... हजार-पाच हजार लोकांपर्यंत खणखणीतपणे ज्याचा शब्दन् शब्द पोहोचत होता, त्याचे नाव एन. डी. पाटील!

दोन हातात दोन दांडपट्टे घेऊन लढणारी एन. डी. यांची अनेक रूपे आज डोळ्यांसमोरून तरळतात. इस्लामपूरचा गोळीबार.... चार तरुण मृत्युमुखी पडलेले... त्यामध्ये एन. डी. यांचा सख्खा पुतण्या.... गणपतराव सांगतात, ‘मोर्चा थांबवूया’..... एन. डी. म्हणतात, ‘नाही... बिलकूल नाही... मोर्चा थांबणार नाही..’ आणि हजाराेंचा मोर्चा पुतण्याच्या प्रेताला आडवे जाऊन कचेरीवर धडकतो..... रायगडच्या सेझच्या शेतकऱ्यांचा लढा चिरडून टाकण्यासाठी मुकेश अंबानी यांनी सगळी ताकद पणाला लावली होती. शांततामय मार्गाने हजारो शेतकऱ्यांना नागोठणे-वडखळ रस्त्यावर उतरवून एन. डी. यांनी तो लढा  लढवला आणि अंबानींना पळता भुई थोडी केली.एन. डी. विधानसभेत लढले, रस्त्यावर लढले. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण त्यांना म्हणाले होते, ‘तुम्ही कितीही जोरात बोललात तरी बहुमत आमच्या मागे आहे.’ एन. डी. ताडकन् म्हणाले.... ‘होय... मुख्यमंत्रीसाहेब, बहुमत तुमच्या मागे आहे हे मला मान्य आहे म्हणून तर तुम्ही सत्तेवर आहात. लोकशाहीचा खेळ एकावन्न विरुद्ध एकोणपन्नास असाच असतो. त्या खेळात तुमच्यासोबत एकावन्न आहेत; पण आम्ही रस्त्यावर जेव्हा लढाई लढायला उतरतो तेव्हा आमच्यासोबत एकावन्न असतात, हे लक्षात ठेवा... डोकी मोजून सत्ता मिळत असली तरी रस्त्यावरच्या लढाईत आमचेच बहुमत आहे.आम्हाला सत्तेची पर्वा नाही...’ - एन. डी. यांना सत्तेची पर्वा कधीच नव्हती. रयत शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षपदाचा काळ सोडला तर एन. डी. यांनी सगळा महाराष्ट्र एस. टी.च्या लाल डब्यात बसूनच पिंजून काढला आहे. संपूर्ण महाराष्ट्र पायाखाली घातलेला एन.डी. यांच्यासारखा नेता दुसरा नाही.
सामान्य माणसांच्या बांधिलकीचे राजकारण गणपतराव देशमुख आणि एन. डी. यांच्यासोबतच संपले.  संप तोडून काढणारे आता सत्तेत आहेत आणि एस. टी. ने फिरणारे एन. डी. आता राहिले नाहीत. तो लढावू महाराष्ट्र आता संपलेला आहे. शेवटचा लढवय्या म्हणजे एन. डी. पाटील! गरीब माणसांच्या प्रश्नांशी महाराष्ट्रात आता कोणालाही काही पडलेले नाही. मुंबईचा गिरणी कामगार मॉलच्या अक्राळविक्राळ इमारतींखाली चिरडला गेला. शेतकऱ्यांचा वाली असलेला शेवटचा मालुसरा एन. डी. यांच्या रूपाने आता अस्तंगत पावला आहे. एन. डी. यांना त्यांच्या धर्मपत्नी माईंनी शेवटपर्यंत साथ दिली.  पेटलेला पदर आणि न विझलेला निखारा घेऊन माई आयुष्यभर एन. डी. यांच्या पाठीमागे चालत राहिल्या. एन. डी. यांची पत्नी होणे सोपे नव्हते. एन. डी. नाहीत, त्यांच्या पायावर नमन. माई, तुम्ही आहात; तुमच्याही पायावर नमन!

टॅग्स :N D Patilप्रा. एन. डी. पाटील