शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

रस्त्यावरची लढाई लढणारा शेवटचा मालुसरा काळाच्या पडद्याआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 05:28 IST

राज्यातल्या गोरगरिबांसाठी एन. डी. विधानसभेत लढले, रस्त्यावर लढले. ते गेले... आता रस्त्यावरच्या लढाईला कुणी वाली उरला नाही!

- मधुकर भावे, लोकमतचे निवृत्त संपादकएन. डी.  गेले. महाराष्ट्राच्या लढाऊ परंपरेतील शेवटचा मालुसरा धारातीर्थी पडला. गणपतराव देशमुख यांच्यापाठोपाठ एन. डी. यांनी जाणे म्हणजे अन्याय-अत्याचाराविरोधातील रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या सेनापतीनेच जाणे आहे. एन. डी. यांच्या निधनानंतर सामान्य माणसांचा आवाज बुलंद करून रस्त्यावर उतरण्याची हिंमत दाखवणारा आता कोणीही राहिला नाही. एन. डी. नावाचा हा योद्धा रस्त्यावरची सामान्य माणसाची लढाई लढतच राहिला.  त्याचवेळी वैचारिक आघाडीवर भल्या-भल्या बुद्धिवंतांची, विधानसभेत भल्या-भल्या मंत्र्यांची फटफजिती करण्याची वैचारिक ताकद एन. डी. यांच्या विचारांत होती. अभ्यासात, वागण्यात आणि चारित्र्यातही होती. त्यामुळेच शरद पवार यांचे सख्खे मेहुणे असतानाही आपल्या वैचारिक भूमिकेशी एन. डी. यांनी आयुष्यभर कधीच तडजोड केली नाही. जिथे लढा आहे तिथे एन. डी. आहेत. मग तो बेळगाव-कारवारचा सीमा लढा असो, महागाईविरोधातील लढा असो, संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो, सेझविरोधातील रायगडच्या शेतकऱ्यांचा लढा असो, नाहीतर कोल्हापूरच्या टोलनाक्याचा लढा असो; जाती-पातीची नात्यागोत्याची किंवा सत्तेची पर्वा एन. डी. यांनी कधीच केली नाही. भक्कम वैचारिक भूमिका, भरदार-पिळदार शरीरयष्टी... माईक असो किंवा नसो.... हजार-पाच हजार लोकांपर्यंत खणखणीतपणे ज्याचा शब्दन् शब्द पोहोचत होता, त्याचे नाव एन. डी. पाटील!

दोन हातात दोन दांडपट्टे घेऊन लढणारी एन. डी. यांची अनेक रूपे आज डोळ्यांसमोरून तरळतात. इस्लामपूरचा गोळीबार.... चार तरुण मृत्युमुखी पडलेले... त्यामध्ये एन. डी. यांचा सख्खा पुतण्या.... गणपतराव सांगतात, ‘मोर्चा थांबवूया’..... एन. डी. म्हणतात, ‘नाही... बिलकूल नाही... मोर्चा थांबणार नाही..’ आणि हजाराेंचा मोर्चा पुतण्याच्या प्रेताला आडवे जाऊन कचेरीवर धडकतो..... रायगडच्या सेझच्या शेतकऱ्यांचा लढा चिरडून टाकण्यासाठी मुकेश अंबानी यांनी सगळी ताकद पणाला लावली होती. शांततामय मार्गाने हजारो शेतकऱ्यांना नागोठणे-वडखळ रस्त्यावर उतरवून एन. डी. यांनी तो लढा  लढवला आणि अंबानींना पळता भुई थोडी केली.एन. डी. विधानसभेत लढले, रस्त्यावर लढले. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण त्यांना म्हणाले होते, ‘तुम्ही कितीही जोरात बोललात तरी बहुमत आमच्या मागे आहे.’ एन. डी. ताडकन् म्हणाले.... ‘होय... मुख्यमंत्रीसाहेब, बहुमत तुमच्या मागे आहे हे मला मान्य आहे म्हणून तर तुम्ही सत्तेवर आहात. लोकशाहीचा खेळ एकावन्न विरुद्ध एकोणपन्नास असाच असतो. त्या खेळात तुमच्यासोबत एकावन्न आहेत; पण आम्ही रस्त्यावर जेव्हा लढाई लढायला उतरतो तेव्हा आमच्यासोबत एकावन्न असतात, हे लक्षात ठेवा... डोकी मोजून सत्ता मिळत असली तरी रस्त्यावरच्या लढाईत आमचेच बहुमत आहे.आम्हाला सत्तेची पर्वा नाही...’ - एन. डी. यांना सत्तेची पर्वा कधीच नव्हती. रयत शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षपदाचा काळ सोडला तर एन. डी. यांनी सगळा महाराष्ट्र एस. टी.च्या लाल डब्यात बसूनच पिंजून काढला आहे. संपूर्ण महाराष्ट्र पायाखाली घातलेला एन.डी. यांच्यासारखा नेता दुसरा नाही.
सामान्य माणसांच्या बांधिलकीचे राजकारण गणपतराव देशमुख आणि एन. डी. यांच्यासोबतच संपले.  संप तोडून काढणारे आता सत्तेत आहेत आणि एस. टी. ने फिरणारे एन. डी. आता राहिले नाहीत. तो लढावू महाराष्ट्र आता संपलेला आहे. शेवटचा लढवय्या म्हणजे एन. डी. पाटील! गरीब माणसांच्या प्रश्नांशी महाराष्ट्रात आता कोणालाही काही पडलेले नाही. मुंबईचा गिरणी कामगार मॉलच्या अक्राळविक्राळ इमारतींखाली चिरडला गेला. शेतकऱ्यांचा वाली असलेला शेवटचा मालुसरा एन. डी. यांच्या रूपाने आता अस्तंगत पावला आहे. एन. डी. यांना त्यांच्या धर्मपत्नी माईंनी शेवटपर्यंत साथ दिली.  पेटलेला पदर आणि न विझलेला निखारा घेऊन माई आयुष्यभर एन. डी. यांच्या पाठीमागे चालत राहिल्या. एन. डी. यांची पत्नी होणे सोपे नव्हते. एन. डी. नाहीत, त्यांच्या पायावर नमन. माई, तुम्ही आहात; तुमच्याही पायावर नमन!

टॅग्स :N D Patilप्रा. एन. डी. पाटील