शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

गूढ अखेर उलगडले?

By admin | Updated: September 19, 2015 04:35 IST

धर्मनिरपेक्ष विवेकवाद्यांचा प्रथमपासूनच जो संशय होता, तो खरा ठरताना दिसतो आहे का? येथे प्रश्नचिन्ह वापरण्याचे एकमात्र कारण म्हणजे पोलीस दल वा विशेष तपासी दल

धर्मनिरपेक्ष विवेकवाद्यांचा प्रथमपासूनच जो संशय होता, तो खरा ठरताना दिसतो आहे का? येथे प्रश्नचिन्ह वापरण्याचे एकमात्र कारण म्हणजे पोलीस दल वा विशेष तपासी दल अजूनही गोविंदराव पानसरे यांच्या निर्घृण हत्त्येमागील गूढ उकलल्याचे स्पष्टपणे सांगायला तयार नाहीत. डॉ.नरेन्द्र दाभोलकर, गोविंदराव पानसरे आणि मल्लेशप्पा कलबुर्गी या तिघांच्या हत्त्येमागे कट्टरपंथी हिन्दुत्ववादी संघटनांचा आणि विशेष करुन सनातन संस्थेचा हात असल्याचा घट्ट दावा सातत्याने केला जात होता. या तिघांच्या हत्त्येपूर्वी काही घातपाती कारवायांमागे काही हिन्दुत्ववादी कट्टरपंथी मंडळी असल्याचे उघडकीस आले होते आणि संशयिताना पकडून त्यांच्याविरुद्ध खटलेही दाखल केले गेले. अर्थात कुणी वहीम वा संशय व्यक्त केला म्हणून संबंधितांविरुद्ध तडक कारवाई केली, असे पोलिसांना करता येत नाही. प्रसंगी तसे केले गेले आणि सावध झालेल्या प्रतिपक्षाने पुरावे नष्ट केले तर न्यायालयात पोलिसांचीच नाचक्की होते. परिणामी पानसरे यांच्या हत्त्या प्रकरणी ज्या समीर गायकवाड नावाच्या सनातनच्या कार्यकर्त्यास आता अटक केली गेली आहे, त्याच्यावर तब्बल सहा महिने पोलीस पाळत ठेऊन होते. मोबाईलवरील त्याच्या प्रत्येक संभाषणाची छाननी करीत होते आणि सकृतदर्शनी काही ठोस आढळले म्हणूनच त्याला ताब्यात घेतले गेले. तरीही अद्याप त्याची चौकशी पूर्ण झालेली नाही. ती पूर्ण होऊन जोवर या अटक केलेल्या तरुणाचा हत्त्येतील सहभाग नि:संदिग्धपणे उघड होत नाही, तोवर पोलीस सावध भूमिकाच घेतील हे उघड आहे. पण त्याचबरोबर हेही तितकेच खरे की ज्या तीन पुरोगामी विचारवंतांची हत्त्या केली गेली आहे तिच्यामागे अन्य कोणतेही नाही तर वैचारिक शत्रुत्ल वा वैमनस्य होते किंवा असले पाहिजे. साहजिकच मग समीर गायकवाडपेक्षा ज्या विचाराच्या लोकानी त्याच्या हाती शस्त्र दिले (त्यानेच हत्त्या केली असल्यास) किंवा त्याला या हत्त्या प्रकरणात गोवले, त्यांच्यापर्यंत पोहोचणे अधिक महत्वाचे आहे कारण या तिन्ही हत्त्या अन्य हत्त्यांप्रमाणे सामान्य नाहीत. कॉ.पानसरे यांच्या हत्त्येमागील गूढ पूर्णांशाने उलगडले गेले तर कदाचित दाभोलकर आणि कलबुर्गी यांच्या हत्त्यांमागील गूढदेखील उलगडले जाऊ शकेल, असे मानायला वाव आहे. ज्याअर्थी पोलीस समीरपर्यत जाऊन पोहोचले त्याअर्थी े महाराष्ट्रातील दोन्ही हत्त्यांची प्रकरणे वा त्यांचा तपास गुंडाळला गेला नव्हता, असेही म्हणता येईल. उभय विचारवंतांच्या कुटुंबियांनी आजवर दाखविलेला संयम अनन्यसाधारण असाच आहे, यात शंका नाही. पण तरीही समीरच्या अटकेबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली नाही म्हणून लगेच त्यांना दूषण बहाल करणे या संयमाला छेद देणारे ठरते.