शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

गूढ अखेर उलगडले?

By admin | Updated: September 19, 2015 04:35 IST

धर्मनिरपेक्ष विवेकवाद्यांचा प्रथमपासूनच जो संशय होता, तो खरा ठरताना दिसतो आहे का? येथे प्रश्नचिन्ह वापरण्याचे एकमात्र कारण म्हणजे पोलीस दल वा विशेष तपासी दल

धर्मनिरपेक्ष विवेकवाद्यांचा प्रथमपासूनच जो संशय होता, तो खरा ठरताना दिसतो आहे का? येथे प्रश्नचिन्ह वापरण्याचे एकमात्र कारण म्हणजे पोलीस दल वा विशेष तपासी दल अजूनही गोविंदराव पानसरे यांच्या निर्घृण हत्त्येमागील गूढ उकलल्याचे स्पष्टपणे सांगायला तयार नाहीत. डॉ.नरेन्द्र दाभोलकर, गोविंदराव पानसरे आणि मल्लेशप्पा कलबुर्गी या तिघांच्या हत्त्येमागे कट्टरपंथी हिन्दुत्ववादी संघटनांचा आणि विशेष करुन सनातन संस्थेचा हात असल्याचा घट्ट दावा सातत्याने केला जात होता. या तिघांच्या हत्त्येपूर्वी काही घातपाती कारवायांमागे काही हिन्दुत्ववादी कट्टरपंथी मंडळी असल्याचे उघडकीस आले होते आणि संशयिताना पकडून त्यांच्याविरुद्ध खटलेही दाखल केले गेले. अर्थात कुणी वहीम वा संशय व्यक्त केला म्हणून संबंधितांविरुद्ध तडक कारवाई केली, असे पोलिसांना करता येत नाही. प्रसंगी तसे केले गेले आणि सावध झालेल्या प्रतिपक्षाने पुरावे नष्ट केले तर न्यायालयात पोलिसांचीच नाचक्की होते. परिणामी पानसरे यांच्या हत्त्या प्रकरणी ज्या समीर गायकवाड नावाच्या सनातनच्या कार्यकर्त्यास आता अटक केली गेली आहे, त्याच्यावर तब्बल सहा महिने पोलीस पाळत ठेऊन होते. मोबाईलवरील त्याच्या प्रत्येक संभाषणाची छाननी करीत होते आणि सकृतदर्शनी काही ठोस आढळले म्हणूनच त्याला ताब्यात घेतले गेले. तरीही अद्याप त्याची चौकशी पूर्ण झालेली नाही. ती पूर्ण होऊन जोवर या अटक केलेल्या तरुणाचा हत्त्येतील सहभाग नि:संदिग्धपणे उघड होत नाही, तोवर पोलीस सावध भूमिकाच घेतील हे उघड आहे. पण त्याचबरोबर हेही तितकेच खरे की ज्या तीन पुरोगामी विचारवंतांची हत्त्या केली गेली आहे तिच्यामागे अन्य कोणतेही नाही तर वैचारिक शत्रुत्ल वा वैमनस्य होते किंवा असले पाहिजे. साहजिकच मग समीर गायकवाडपेक्षा ज्या विचाराच्या लोकानी त्याच्या हाती शस्त्र दिले (त्यानेच हत्त्या केली असल्यास) किंवा त्याला या हत्त्या प्रकरणात गोवले, त्यांच्यापर्यंत पोहोचणे अधिक महत्वाचे आहे कारण या तिन्ही हत्त्या अन्य हत्त्यांप्रमाणे सामान्य नाहीत. कॉ.पानसरे यांच्या हत्त्येमागील गूढ पूर्णांशाने उलगडले गेले तर कदाचित दाभोलकर आणि कलबुर्गी यांच्या हत्त्यांमागील गूढदेखील उलगडले जाऊ शकेल, असे मानायला वाव आहे. ज्याअर्थी पोलीस समीरपर्यत जाऊन पोहोचले त्याअर्थी े महाराष्ट्रातील दोन्ही हत्त्यांची प्रकरणे वा त्यांचा तपास गुंडाळला गेला नव्हता, असेही म्हणता येईल. उभय विचारवंतांच्या कुटुंबियांनी आजवर दाखविलेला संयम अनन्यसाधारण असाच आहे, यात शंका नाही. पण तरीही समीरच्या अटकेबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली नाही म्हणून लगेच त्यांना दूषण बहाल करणे या संयमाला छेद देणारे ठरते.